शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

जिल्ह्यातील पतसंस्थांचे तीन कोटी रूपयांचे व्यवहार पूर्ण थंडावले!

By admin | Updated: November 15, 2016 23:27 IST

दीपक पटवर्धन : नोटा रद्द करण्याच्या निर्णयामुळे दैनंदिन ५0 लाखांचे सोनेतारण व्यवहार ठप्प

रत्नागिरी : पतसंस्थांमध्ये सोनेतारण व्यवहाराला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. मात्र, नोटा बदलाच्या निर्णयानंतर चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्यास पतसंस्थांना मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील पतसंस्थांचे सुमारे तीन कोटी रूपयांचे व्यवहार थंडावले आहेत. कदाचित या व्यवहारांचा तोटा भरून निघेल. पण ५० लाखांचा दैनंदिन सोनेतारण व्यवहार यामुळे ठप्प झाला आहे आणि ते पतसंस्थांसाठी नुकसानदायक ठरत आहे, अशी प्रतिक्रिया रत्नागिरी जिल्हा पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष, राज्य पतसंस्था फेडरेशनचे तज्ज्ञ संचालक आणि सहकार भारतीचे जिल्हाध्यक्ष तसेच स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. दीपक पटवर्धन यांनी व्यक्त केली. राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांना नोटा बदलण्याचे, चलनातून रद्द झालेल्या नोटा स्वीकारण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. मात्र, पतसंस्थांना तसे अधिकार नाहीत. त्यामुळे पतसंस्थांमधील बहुतांश व्यवहार ठप्प झाल्याचे त्यांनी सांगितले. चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था आणि स्वामी स्वरूपानंद सहकारी पतसंस्था या जिल्ह्यातील मोठ्या पतसंस्था आहेत. त्यांच्याप्रमाणेच अन्य २४-२५ पतसंस्थांचे दैनंदिन कामकाजही मोठे आहे. मात्र, सध्या या सर्वांनाच नोटा बदलाची झळ पोहोचली आहे. पतसंस्था सुरू आहेत, १०० किंवा ५० रूपयांच्या नोटा घेऊन येणाऱ्या लोकांचे आर्थिक व्यवहार सुरू आहेत. मात्र, ५०० आणि हजार रूपयांच्या नोटा स्वीकारण्यास पतसंस्थांना परवानगी नसल्याने ९५ टक्के व्यवहार बंद झाले आहेत, असे त्यांनी सांगितले. ज्यांना ठेवी ठेवायच्या आहेत, कर्ज घ्यायचे आहे ते चार दिवसांनी येतील. पण सोनेतारण व्यवहाराला मात्र याचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात सर्व पतसंस्थांमध्ये मिळून दररोज ५० लाख रूपयांचे सोनेतारण कर्ज दिले जाते. मात्र, सध्या ही कर्ज प्रकरणे बंद आहेत. नव्या चलनातील इतकी मोठी रक्कम पतसंस्थांकडे नाही. त्यामुळे हे व्यवहार थंडावले आहेत. जोपर्यंत सोनेतारण व्यवहाराला गती येत नाही, तोपर्यंत हे नुकसान होत राहणार असल्याचे ते म्हणाले. मान्यता नसतानाही पतसंस्थांनी ५०० किंवा १००० रूपयांच्या नोटा स्वीकारल्या तर ती चूक ठरेल. यामुळे संबंधित पतसंस्थेची आणि नोटा भरणाऱ्याची चौकशी सुरू होऊ शकते. बँका या नोटा स्वीकारत आहेत, ही सरकार व रिझर्व्ह बँकेने दिलेली सुविधा आहे. त्यामुळे पतसंस्थांनी अशा नोटा स्वीकारू नयेत, असे मत त्यांनी मांडले. सद्यस्थितीत या निर्णयाचा लोकांना त्रास सहन करावा लागत असला तरी हा निर्णय अतिशय धाडसी आणि उपयुक्त असल्याची प्रतिक्रियाही त्यांनी व्यक्त केली. यामुळे झालेले सकारात्मक परिणाम येत्या काही कालावधीतच सर्वांसमोर येतील, असे सांगितले. (प्रतिनिधी)