शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंच्या ताफ्याला जालना पोलिसांचा 40 अटींसह हिरवा कंदील, ड्रोनद्वारे राहणार नजर
2
भारतासमोर 'ट्रम्प'नीती अयशस्वी; मोदी फोन न उचलण्याचं कारण काय, अमेरिकन एक्सपर्ट सांगतात..
3
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
4
ट्रम्प टॅरिफचा भारताच्या कोण-कोणत्या क्षेत्रांवर परिणाम होणार? 'या' सेक्टरला बसू शकतो सर्वाधिक फटका!
5
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
6
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
7
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
8
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
9
गणेश चतुर्थी २०२५: गणपतीच्या नावापुढे 'बाप्पा' आणि 'मोरया' हे शब्द का आणि कसे जोडले गेले? वाचा!
10
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
11
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
12
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
13
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
14
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
15
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
16
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
17
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
18
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
19
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
20
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण

मोबाईल चोरीप्रकरणी रत्नागिरीत तिघांना अटक

By admin | Updated: August 24, 2014 00:37 IST

वर्षभरानंतर यश : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : शहराजवळील खेडशी येथील दुकानाचे छप्पर फोडून दुकानातील १३ मोबाईल व रोख रक्कमेसह १७ हजार रुपये किंमतीचा ऐवज वर्षभरापूर्वी चोरी केली होती. या चोरीप्रकरणी रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तिघा चोरट्यांना आज शनिवारी अटक केली.दि. २९ जुलै, २०१३ रोजी रात्री सुशांत सुधीर रसाळ (पाली, ता. रत्नागिरी) यांचे खेडशीनाका येथील मोबाईल दुकानाचे छप्पराचा सिमेंटचा पत्रा कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील १३ मोबाईल हॅण्डसेट व ६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १७ हजार रुपयांचा माल चोरीस गेला होता. त्याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक डॉ. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी मामा कदम, जमीर पटेल, सुशिल पंडीत, उदय वाझे, संदिप मालप, प्रविण बर्गे, गुरु महाडीक, रमिझ शेख, राजू गमरे यांचे खास पोलीस पथक तयार करुन या प्रकरणी चोरट्यांचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत होते. पोलीस अधिक्षक डॉ. शिंदे, पोलीस निरिक्षक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन, पोलीस पथकाने किरण फुंडलिक गोसावी (२०, जाकादेवी, रत्नागिरी), प्रथमेश ऊर्फ संकेत मोहन शिवगण (२२, जाकादेवी, रत्नागिरी) आणि गणेश प्रविण भागवत (१७, पानवल) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून चोरीचे ४ मोबाईल व रोख रक्कम ११ हजार रुपये असा एकूण १५ हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत केला. तसेच आरोपी संकेत शिवगण याचे राहत्या घरातून चायना कंपनीचे अन्य एकूण २१ मोबाईल हॅण्डसेट पोलीसांनी हस्तगत केले. पोलीस तपास करत आहेत. (शहर वार्ताहर)