शहरं
Join us  
Trending Stories
1
"पाकिस्तानच्या काही क्षेत्रावर भारत कधीही हल्ला करू शकतो, आमच्याकडे ठोस पुरावे"
2
...तर सीमा हैदरला हा नियम लागू नाही का?; सपा नेते अबु आझमींनी केंद्र सरकारला घेरलं
3
दादा, तुम्ही नाहीतर कर्ज माफीचे आश्वासन दिले कोणी?
4
भारत-पाक तणावावर मोठी अपडेट; देशभरातील आयुध निर्माणीतील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द
5
आजचे राशीभविष्य, ४ मे २०२५: धनप्राप्तीसह आर्थिक स्तर मजबूत होईल, मान, प्रतिष्ठा वाढेल
6
पाकिस्तानमधून आयातीवर भारताची संपूर्ण बंदी; टपाल, पार्सल सेवा केल्या स्थगित 
7
समृद्धीच्या अंतिम टप्प्यास मुहूर्त कधी? १ मे रोजीचा मुहूर्त हुकला
8
पर्यटकच टार्गेटवर... गुप्तचरांचा होता इशारा; शोधमोहीम थांबविली त्याच दिवशी झाला हल्ला 
9
आज देशभर ‘नीट-यूजी’ परीक्षा : गैरप्रकार कराल तर कायदेशीर कारवाईसह तीन वर्षे बंदी
10
तीन मुलींची हत्या करून आईने घेतला गळफास ; भिवंडीतील हृदयद्रावक घटना, कारण अस्पष्ट 
11
पुरंदर विमानतळाला विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांवर लाठीमार; अनेक जखमी
12
नव्या डम्पिंगसाठी लागतील दोन वर्षे; सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा किंवा पर्यायी जागेसाठी मुदतवाढ हाच महापालिकेकडे पर्याय 
13
७२ तासांच्या ‘त्या’ शपथेनंतर मजबूत राज्याची मुहूर्तमेढ : देवेंद्र फडणवीस
14
विमानांना पक्षी धडकण्याची शक्यता, उघड्यावरील प्राण्यांची कत्तल थांबवा; नवी मुंबई विमानतळ कंपनीला ‘डीजीसीए’चे आदेश
15
सात वर्षांची असताना आला बहिरेपणा, आता  २८ वर्षांनंतर ती पहिल्यांदाच ऐकणार आवाज
16
गोव्यात लईराईच्या जत्रेत चेंगराचेंगरी, ६ भाविक ठार
17
नळजोडण्या दिल्या; मात्र पाण्याचा  एक थेंबही मिळेनासा झाला...
18
ए. आर. रहमान यांच्या लाइव्ह कॉन्सर्टमुळे नेरूळकरांची कोंडी
19
ऐकणारेही चकित... भारतीयांनी वर्षभरात ओटीटीवर पाहिले ३० लाख तासांचे कंटेंट 
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

मोबाईल चोरीप्रकरणी रत्नागिरीत तिघांना अटक

By admin | Updated: August 24, 2014 00:37 IST

वर्षभरानंतर यश : स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेची कारवाई

रत्नागिरी : शहराजवळील खेडशी येथील दुकानाचे छप्पर फोडून दुकानातील १३ मोबाईल व रोख रक्कमेसह १७ हजार रुपये किंमतीचा ऐवज वर्षभरापूर्वी चोरी केली होती. या चोरीप्रकरणी रत्नागिरीच्या स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने तिघा चोरट्यांना आज शनिवारी अटक केली.दि. २९ जुलै, २०१३ रोजी रात्री सुशांत सुधीर रसाळ (पाली, ता. रत्नागिरी) यांचे खेडशीनाका येथील मोबाईल दुकानाचे छप्पराचा सिमेंटचा पत्रा कोणीतरी अज्ञात चोरट्याने फोडून दुकानात प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील १३ मोबाईल हॅण्डसेट व ६ हजार रुपये रोख रक्कम असा एकूण १७ हजार रुपयांचा माल चोरीस गेला होता. त्याबाबत रत्नागिरी ग्रामीण पोलिस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.पोलीस अधिक्षक डॉ. संजय शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक एस. एल. पाटील यांनी मामा कदम, जमीर पटेल, सुशिल पंडीत, उदय वाझे, संदिप मालप, प्रविण बर्गे, गुरु महाडीक, रमिझ शेख, राजू गमरे यांचे खास पोलीस पथक तयार करुन या प्रकरणी चोरट्यांचा व चोरीस गेलेल्या मालाचा शोध घेत होते. पोलीस अधिक्षक डॉ. शिंदे, पोलीस निरिक्षक पाटील यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरुन, पोलीस पथकाने किरण फुंडलिक गोसावी (२०, जाकादेवी, रत्नागिरी), प्रथमेश ऊर्फ संकेत मोहन शिवगण (२२, जाकादेवी, रत्नागिरी) आणि गणेश प्रविण भागवत (१७, पानवल) यांना ताब्यात घेतले. त्यांचेकडून चोरीचे ४ मोबाईल व रोख रक्कम ११ हजार रुपये असा एकूण १५ हजार रुपये किंमतीचा चोरीचा माल हस्तगत केला. तसेच आरोपी संकेत शिवगण याचे राहत्या घरातून चायना कंपनीचे अन्य एकूण २१ मोबाईल हॅण्डसेट पोलीसांनी हस्तगत केले. पोलीस तपास करत आहेत. (शहर वार्ताहर)