शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

मिऱ्याला सागरी आक्रमणाचा धोका

By admin | Updated: June 11, 2014 00:43 IST

बंधारा नादुरुस्त : पौर्णिमेला सागरी उधाणाचे पाणी

रत्नागिरी : तालुक्यातील जाकीमिऱ्या या सागरी किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारा अनेक ठिकाणी कोसळलेला आहे. काही ठिकाणी दुरूस्तीच न झाल्याने पावसाळ्यात या गावातील किनाऱ्यावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. येत्या पौर्णिमेला (१२ जून) येणाऱ्या सागरी उधाणाचे पाणी गावात घुसण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यावर घरे असलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सागरातील पाणी खवळले असून, तुफानी लाटांचे तडाखे जाकीमिऱ्या भागाला बसत आहेत. विश्वदत्त पाटील यांच्या घराजवळील दगडी धूपबंधारा जागोजागी कोसळला आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी असलेल्या घरांच्या आवारात सागरी लाटांचे पाणी घुसत असल्याचे पाटील यांनी या धूपबंधाऱ्याच्या पाहणीवेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, जाकीमिऱ्या भागात किनारपट्टीवर सुमारे साडेचारशे घरे आहेत. त्यातील सुमारे ५० घरे ही किनाऱ्याच्या खूप जवळ असून, त्यांना पावसाळ्यात सागरी आक्रमणाचा अधिक धोका आहे. नऊ वर्षांपूर्वी येथे धूपबंधारा उभारण्यात आला. मात्र, तो योग्यप्रकारे न उभारल्याने व अत्यंत लहान दगड वापरले गेल्याने जागोजागी कोसळला आहे. सागरी लाटांचा मारा सहन करण्याची ताकद या लहान दगडांमध्ये नाही. त्यामुळे लाटांच्या धडकेने हे दगड पाण्यात वाहून गेले आहेत.परिणामी जागोजागी बंधाऱ्याला भगदाडे पडली आहेत, असे पाटील यांनी सांगितले. गेल्या आॅक्टोबर महिन्यात पालकमंत्री उदय सामंत यांना या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करू, असे त्यावेळी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही येथे दुरुस्तीबाबत काहीच घडले नाही. त्यामुळे किनारपट्टीवरील घरात पावसाळ्याच्या उधाणामध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याचे पाटील यांनी सांगितले. जाकीमिऱ्यातील सागरी किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची डागडुजी काही ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बंधारा कोसळला आहे. बागकरवाडी व मुरुगकरवाडी येथे मोठ्या प्रमाणात बंधारा कोसळला असल्याने पावसाळ्यात सागरी उधाणाचे पाणी गावात शिरण्याची भीती जाकीमिऱ्याचे सरपंच नार्वेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)