शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेची सक्ती कुणी केली? अजित पवार आणि एकनाथ शिंदेंचं नाव घेत सुप्रिया सुळे म्हणाल्या...
2
विधानसभेचे विरोधी पक्षनेते पद रिक्त, विरोधकांची सरकारवर टीका; विधिमंडळात पायऱ्यांवर आंदोलन
3
बाबर आझम, मोहम्मद रिझवानचं T20 करियर संपलं? नव्या पाकिस्तानी कोचने संघातून काढलं बाहेर
4
बैल पाठवतो म्हटला होता, मदत केली का? नेटकऱ्याच्या प्रश्नावर सोनू सूदनं बँक स्टेटमेंट केलं शेअर
5
अहमदाबाद विमान अपघात, एअर इंडियाचा संसदीय समितीसमोर जबाब, ड्रिमलायनरबाबत दिली अशी माहिती
6
'मुख्यमंत्री फडणवीस सुद्धा वैतागले'; प्रताप सरनाईकांनी सांगितलं 'मराठी मोर्चा'चा मुद्दा का चिघळला?
7
“हिंदी सक्तीच्या मुद्द्यावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका दुटप्पी”: हर्षवर्धन सपकाळ
8
भाजप आमदाराच्या मुलाच्या गाडीची दुचाकीला धडक; रुग्णालयात नेईपर्यंत तरुणाने सोडले प्राण
9
"जनसुरक्षा कायदा हा हुकूमशाहीचा परमोच्च बिंदू, फडणविसांचे हुकूमशाही मनसुबे हाणून पाडा", जनसुरक्षा कायद्याला काँग्रेसचा विरोध
10
MS धोनीच्या मार्गात आला अडथळा! Captain Cool Trademark अर्जावर आक्षेप, कारण...
11
म्हणे, यांना इंग्रजी येत नाही, त्यांच्या देशात परत पाठवा; ब्रिटिश महिलेची भारतीय कर्मचाऱ्यांवर आगपाखड
12
ट्रम्प टॅरिफचा बाजारावर परिणाम नाही? कोटक महिंद्रात सर्वाधिक वाढ, तर घसरणाऱ्यांमध्ये टाटाचा शेअर
13
ट्रम्प यांनी १४ देशांवर लावलं टॅरिफ, द.कोरिया-जपानलाही सोडलं नाही; पण भारत-चीनला हातही लावला नाही, कारण काय?
14
Air India विमान अपघाताचे कारण लवकरच समोर येणार; तपास पथकाने सादर केला प्राथमिक अहवाल
15
आता मागणीनुसार बदलणार ओला-उबरचे भाडे! सरकारचे नवीन नियम, आता 'या' गोष्टी बदलणार!
16
तुम्हाला माहिती नसेल... सर्वाधिक पगार कोणत्या देशातील लोकांना मिळतो, तो किती आहे?
17
“विधानसभा निवडणुकीतील दस्तावेज नष्ट करण्याचे निवडणूक आयोगाचे परिपत्रक मतचोरी केल्याचाच पुरावा”
18
लय भारी! एकही पैसा खर्च न करता इन्स्टाग्रामवर कसे वाढवायचे फॉलोअर्स? 'ही' आहे सोपी पद्धत
19
रेखा झुनझुनवालांना ₹१००० कोटींचं नुकसान; Tata Group चा हा शेअर जोरदार आपटला, कारण काय?
20
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरु स्वामींचे दैवी शिष्यगण, आजही करतात मार्गदर्शन; सार्थक होते जीवन

मिऱ्याला सागरी आक्रमणाचा धोका

By admin | Updated: June 11, 2014 00:43 IST

बंधारा नादुरुस्त : पौर्णिमेला सागरी उधाणाचे पाणी

रत्नागिरी : तालुक्यातील जाकीमिऱ्या या सागरी किनाऱ्यावरील धूपप्रतिबंधक बंधारा अनेक ठिकाणी कोसळलेला आहे. काही ठिकाणी दुरूस्तीच न झाल्याने पावसाळ्यात या गावातील किनाऱ्यावरील घरांना धोका निर्माण झाला आहे. येत्या पौर्णिमेला (१२ जून) येणाऱ्या सागरी उधाणाचे पाणी गावात घुसण्याची शक्यता असल्याने किनाऱ्यावर घरे असलेल्या लोकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांपासून सागरातील पाणी खवळले असून, तुफानी लाटांचे तडाखे जाकीमिऱ्या भागाला बसत आहेत. विश्वदत्त पाटील यांच्या घराजवळील दगडी धूपबंधारा जागोजागी कोसळला आहे. त्यामुळे सध्या याठिकाणी असलेल्या घरांच्या आवारात सागरी लाटांचे पाणी घुसत असल्याचे पाटील यांनी या धूपबंधाऱ्याच्या पाहणीवेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, जाकीमिऱ्या भागात किनारपट्टीवर सुमारे साडेचारशे घरे आहेत. त्यातील सुमारे ५० घरे ही किनाऱ्याच्या खूप जवळ असून, त्यांना पावसाळ्यात सागरी आक्रमणाचा अधिक धोका आहे. नऊ वर्षांपूर्वी येथे धूपबंधारा उभारण्यात आला. मात्र, तो योग्यप्रकारे न उभारल्याने व अत्यंत लहान दगड वापरले गेल्याने जागोजागी कोसळला आहे. सागरी लाटांचा मारा सहन करण्याची ताकद या लहान दगडांमध्ये नाही. त्यामुळे लाटांच्या धडकेने हे दगड पाण्यात वाहून गेले आहेत.परिणामी जागोजागी बंधाऱ्याला भगदाडे पडली आहेत, असे पाटील यांनी सांगितले. गेल्या आॅक्टोबर महिन्यात पालकमंत्री उदय सामंत यांना या बंधाऱ्याची पाहणी करण्यासाठी बोलावले होते. त्यांनी पाहणी केल्यानंतर या बंधाऱ्याच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न करू, असे त्यावेळी सांगितले होते. मात्र, त्यानंतरही येथे दुरुस्तीबाबत काहीच घडले नाही. त्यामुळे किनारपट्टीवरील घरात पावसाळ्याच्या उधाणामध्ये पाणी शिरण्याची भीती निर्माण झाल्याचे पाटील यांनी सांगितले. जाकीमिऱ्यातील सागरी किनाऱ्यावरील धूप प्रतिबंधक बंधाऱ्याची डागडुजी काही ठिकाणी झालेली नाही. त्यामुळे अनेक ठिकाणी बंधारा कोसळला आहे. बागकरवाडी व मुरुगकरवाडी येथे मोठ्या प्रमाणात बंधारा कोसळला असल्याने पावसाळ्यात सागरी उधाणाचे पाणी गावात शिरण्याची भीती जाकीमिऱ्याचे सरपंच नार्वेकर यांनी व्यक्त केली. (प्रतिनिधी)