शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

हजारो व्यक्ती अन् कुटुंबांचा आधारवडच कोसळला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2021 04:31 IST

रत्नागिरी : समाजसेवेची नुसती आवड असून चालत नाही, ती व्रत म्हणून अंगात भिनावी लागते. त्यासाठी कशाचीही तमा न ...

रत्नागिरी : समाजसेवेची नुसती आवड असून चालत नाही, ती व्रत म्हणून अंगात भिनावी लागते. त्यासाठी कशाचीही तमा न बाळगता अहोरात्र काम करण्याची तयारी लागते. देवरुखमधील मातृमंदिरचा आधारवड असलेल्या शांता नारकर याही याच मुशीतून तयार झालेल्या. म्हणूनच असंख्य व्यक्तींचे, कुटुंबांचे आयुष्य सुकर करण्याचे काम त्यांच्या हातून घडले. शुक्रवार ,दि. १६ रोजी हा आधारवड कोसळला.

हजारो मुली, महिलांना त्यांनी आत्मविश्वासाने जगण्याची ताकद दिली. इतकी क्षमता त्यांच्यामध्ये आली ती त्यांच्यावर झालेल्या संस्कारातून. मातृमंदिर रुग्णालयाची स्थापना करणाऱ्या इंदिराबाई तथा मावशी हळबे यांची मानसकन्या ही शांता नारकर यांची पहिली ओळख. मावशींच्या देखरेखीत त्यांचे शालेय शिक्षण झालेच, पण इथेच मुळात त्यांच्यावर संस्कार सुरू झाले. गोपुरी आश्रमचे आप्पा पटवर्धन, ना. ग. गोरे, मधू दंडवते अशा खऱ्याखुऱ्या ‘समाजसेवकां’चा मातृमंदिरमध्ये सततचा वावर होता. त्यांच्या समाजवादी विचारसरणीचा खूप मोठा पगडा शांता नारकर यांच्यावर झाला. त्यामुळेच साधी राहणी आणि उच्च कोटीतील काम हा त्यांचा आयुष्याच्या अखेरपर्यंतचा अविभाज्य भाग होता.

मातृमंदिरसाठी अत्यंत तळमळीने काम करणारे विजय तथा भाऊ नारकर त्यांचे सहचर झाले. या जोडीने मातृमंदिरच्या कामाला, मावशींच्या स्वप्नाला वेगळ्याच उंचीवर नेले. ग्रामीण भागातील महिलांना ताठ मानेने जगता यावे, यासाठी त्यांना आर्थिक स्थैर्य देणे गरजेचे आहे, हे ओळखून शांता नारकर यांनी आतापर्यंत सुमारे ५८७ महिला बचत गटांची निर्मिती केली आहे. या बचत गटांचे फेडरेशन करून त्यांच्या चळवळीला पुढे नेण्याचे कार्य शांता नारकर यांनी केले आहे. बचत गटाच्या माध्यमातून अनेक गावांमध्ये महिलांना स्वयंरोजगाराचे साधन मिळाले आहे. शेती विकासाबरोबरच गावांमध्ये बालवाड्या निर्माण केल्या आहेत. अनाथ मुलींसाठी सुरू केलेल्या गोकुळ या बालगृहात आज ५० मुली शिकत आहेत. पाणीटंचाईचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी पाणी योजनांसाठी अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांना प्रोत्साहित केले. त्यामुळे अनेक ठिकाणची समस्या सुटली. कामाचा हा उत्साह त्यांनी अखेरपर्यंत टिकवून ठेवला.