शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
2
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
3
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
4
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
5
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
6
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
7
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
8
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
9
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
10
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
11
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
12
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
13
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
14
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
15
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
16
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
17
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
18
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
19
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यात हजारोंचे नुकसान; अनेक भागात पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

रत्नागिरी : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ...

रत्नागिरी : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसाचा जोर सध्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण ९४२.९० मिलीमीटर (सरासरी १०४.७७ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. सर्वाधिक १५८ मिलीमीटर पाऊस संगमेश्वर आणि त्याखालोखाल रत्नागिरी तालुक्यात १५२.५० मिलीमीटर झाला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात उन्हवरे येथील खाडीचे पाणी आत शिरल्याने अंदाजे १३ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. कुमवे येथील रावजी धनकुळवे यांच्या घराचे अंशत: १ हजार ४०० रुपयांचे, सतीश काष्टे यांच्या घराचे १ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. फरारे येथील फरीदा खाते, महमद नाईक, सुलेमान अ. लतिफ खाते, नासीर हसन पेसकर, आसिफ खाते , इब्राहिम अ. काझी खाते यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले. फरारे येथे आयुक अब्बास खाते यांच्या घराचा बांध पावसामुळे कोसळला. करजे येथील प्रकाश टेमकर यांच्या घरावरील छताचे अंशत: ४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. पाजपांजरी येथील हिराबाई पावसे यांच्या घराच्या बाजूची भिंत पावसामुळे पडली असून इतर भितींना तडा गेल्याने २ लाख २ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. भोजन चाईलनगर येथील इब्राहिम अंतुले यांच्या घराची भिंत कोसळून अंशत: नुकसान झाले आहे.

खेड तालुक्यात होडखाड येथे राकेश तांबे यांची २ जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असून अंशत:

१५ हजार रुपयाचे नुकसान झाले. सवणस येथील सुप्रिया अ. हमिद यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ७४

हजार ८०० रुपयाचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात वाघिवरे येथे विकास खडपेकर यांचा पऱ्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. आगवे येथील विलास जाधव यांच्या घराचे अंशत: ५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यात नावडी येथील जनता स्टोअर्स मेडिकलमध्ये पाणी जाऊन औषधांचे अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.