शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!
2
स्विस बँकांमध्ये भारतीयांच्या ठेवींमध्ये तीन पट वाढ! २०२१ नंतर विक्रमी पातळी गाठली
3
"तुम्ही फोन करा आम्ही तयार आहोत"; ऑपरेशन सिंदूरला घाबरलेल्या पाकिस्तानने युद्धबंदीसाठी घेतली सौदीची मदत
4
Air India Plane Crash: विमान अपघातातील २१५ मृतांची ओळख पटली, १९८ मृतदेह कुटुंबांकडे
5
Share Market Today: आधी फ्लॅट सुरुवात, नंतर Sensex ची २५५ अंकांनी उसळी; PSU बँकांमध्ये जोरदार खरेदी
6
इराणच्या अस्थिरतेला पाकिस्तान घाबरला! म्हणाला,'इस्रायली हल्ला आंतरराष्ट्रीय कायद्याचे उल्लंघन'
7
पॅन कार्ड बनवण्यासाठी आता आवश्यक झालं 'हे' डॉक्युमेंट, आधार लिंक करायची अखेरची तारीखही जाणून घ्या
8
झोपडपट्टीधारकांना मुंबईबाहेर काढू शकत नाही- मुंबई उच्च न्यायालय
9
Air India Plane Crash: एअर होस्टेस रोशनीच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार!
10
Eknath Shinde: "...हे पाप तुमचे आहे!" एकनाथ शिंदे यांचा उद्धव ठाकरेंवर प्रहार
11
आमिर खानसोबत फोटोसाठी पोझ देत होती जिनिलीया, बाजूला उभा राहून बघत होता रितेश, अन् मग...
12
"शिवसेनाप्रमुखांचा ब्रँड पुसून टाकण्याचा प्रयत्न कराल तर नामोनिशान पुसून टाकू"
13
भाषेवरून राजकारण पेटले, उद्धव ठाकरेंची सडकून टीका, एकनाथ शिंदेंचा जोरदार पलटवार!
14
Mumbai Local: मुंबईकरांचा प्रवास आणखी सुखकर होणार, रेल्वेमंत्र्यांची लोकल ट्रेनबाबत मोठी घोषणा
15
आजचे राशीभविष्य : २० जून २०२५; विनाकारण खर्च वाढतील, प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल
16
रॅपिडो, उबर बाइक टॅक्सीविरुद्ध गुन्हा, नेमकं प्रकरण काय?
17
निधनानंतर ७ दिवसांनी संजय कपूर यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, भावुक झाली करिश्मा, मुलांना अश्रू अनावर
18
samruddhi mahamarg Accident: समृद्धी महामार्गावर अपघातात दोघांचा मृत्यू, जीपचालकाला डुलकी लागल्याने दुर्घटना!
19
Bombay High Court: ‘त्या’ एसआरए योजनेत ३५ टक्के जागा खुल्या ठेवा
20
MSRTC: ऐन हंगामात एसटीकडे प्रवाशांची पाठ, उत्पन्नात मोठी घट!

पावसाच्या तडाख्याने जिल्ह्यात हजारोंचे नुकसान; अनेक भागात पुराचे पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 04:22 IST

रत्नागिरी : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली ...

रत्नागिरी : गेल्या चार-पाच दिवसांपासून जिल्ह्यात पावसाची संततधार सुरू आहे. जोरदार कोसळणाऱ्या पावसामुळे जिल्ह्यात अनेक नद्यांनी इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे काही तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी पडझड झाली आहे. पावसाचा जोर सध्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत.

जिल्ह्यात गेल्या २४ तासात एकूण ९४२.९० मिलीमीटर (सरासरी १०४.७७ मिलीमीटर) पावसाची नोंद जिल्हा नियंत्रण कक्षात झाली आहे. सर्वाधिक १५८ मिलीमीटर पाऊस संगमेश्वर आणि त्याखालोखाल रत्नागिरी तालुक्यात १५२.५० मिलीमीटर झाला आहे.

जिल्हा नियंत्रण कक्षाकडून सकाळी १० वाजेपर्यंत प्राप्त झालेल्या माहितीनुसार, दापोली तालुक्यात उन्हवरे येथील खाडीचे पाणी आत शिरल्याने अंदाजे १३ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. कुमवे येथील रावजी धनकुळवे यांच्या घराचे अंशत: १ हजार ४०० रुपयांचे, सतीश काष्टे यांच्या घराचे १ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. फरारे येथील फरीदा खाते, महमद नाईक, सुलेमान अ. लतिफ खाते, नासीर हसन पेसकर, आसिफ खाते , इब्राहिम अ. काझी खाते यांच्या घरामध्ये पुराचे पाणी शिरले. फरारे येथे आयुक अब्बास खाते यांच्या घराचा बांध पावसामुळे कोसळला. करजे येथील प्रकाश टेमकर यांच्या घरावरील छताचे अंशत: ४ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले. पाजपांजरी येथील हिराबाई पावसे यांच्या घराच्या बाजूची भिंत पावसामुळे पडली असून इतर भितींना तडा गेल्याने २ लाख २ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. भोजन चाईलनगर येथील इब्राहिम अंतुले यांच्या घराची भिंत कोसळून अंशत: नुकसान झाले आहे.

खेड तालुक्यात होडखाड येथे राकेश तांबे यांची २ जनावरे पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली असून अंशत:

१५ हजार रुपयाचे नुकसान झाले. सवणस येथील सुप्रिया अ. हमिद यांच्या घराचे पावसामुळे अंशत: ७४

हजार ८०० रुपयाचे नुकसान झाले आहे. चिपळूण तालुक्यात वाघिवरे येथे विकास खडपेकर यांचा पऱ्याच्या पाण्यात पडून मृत्यू झाला. आगवे येथील विलास जाधव यांच्या घराचे अंशत: ५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

संगमेश्वर तालुक्यात नावडी येथील जनता स्टोअर्स मेडिकलमध्ये पाणी जाऊन औषधांचे अंदाजे २ लाख ५० हजार रुपयांचे नुकसान झाले.