शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे हजारो वीज ग्राहक अंधारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

राजापूर : महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी करायची देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत न केल्याने, काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे कामे ...

राजापूर : महावितरण कंपनीने पावसाळ्यापूर्वी करायची देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत न केल्याने, काम करणाऱ्या ठेकेदाराकडून अधिकाऱ्यांनी योग्य प्रकारे कामे करून न घेतल्याने आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पुढाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे राजापूर - लांजासह जिल्ह्यातील हजारो ग्राहक चार दिवस अंधारात आहेत, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते राजन देसाई यांनी केला आहे. पावसाळ्यापूर्वीची देखभाल दुरुस्तीची कामे वेळेत झाली असती तर तौक्ते चक्रीवादळात महावितरणला कमी झळ बसली असती. त्यामुळे या परिस्थितीला महावितरणच्या अधिकाऱ्यांची मनमानी आणि पुढाऱ्यांच्या सोयीचे राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.

रविवारी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाचा महावितरणला सर्वाधिक फटका बसला आहे. राजापूर व लांजा तालुक्यात चार दिवस उलटले तरी अनेक गावांमध्ये अंधार आहे. मोठ्या प्रमाणावर खांब पडले आहेत, वीजवाहिन्या, कंडक्टरही तुटले आहेत. राजापूर व लांजा तालुक्यासह रत्नागिरी जिल्ह्यातील अन्य तालुक्यांमध्येही हीच परिस्थिती आहे. याला सर्वस्वी महावितरणचे अधिकारी आणि कोकणातील फोटो काढून प्रसिध्दीची चमकोगिरी करणारे पुढारी कारणीभूत असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे. तौक्ते चक्रीवादळात महावितरणच्या कामाच्या कार्यकक्षा उघड झाल्या आहेत. झाल्या प्रकाराला महावितरणच्या अधिकाऱ्यांचा बेजबाबदार कारभार आणि पुढाऱ्यांची मनमानी कारणीभूत असल्याचा आरोप देसाई यांनी केला आहे.

पावसाळ्यापूर्वी महावितरणकडून आवश्यक ती कामे पूर्ण करणे गरजेचे आहे. मात्र, दरवर्षीच पावसाळ्यात महावितरणच्या कारभाराची लक्तरे वेशीवर टांगली जातात. यावर्षी पावसाळ्यापूर्वी झालेल्या तौक्ते चक्रीवादळाने महावितरणला पुरते उघडे केले आहे. अनेक भागात महावितरणचे खांब बदलणे, वीजवाहिन्या बदलणे, कंडक्टर बदलणे, ट्रान्सफॉर्मर बदलणे ही कामे ठेकेदार पध्दतीने दिली जातात. मात्र, ठेकेदार काय करतात, याकडे ना महावितरणच्या अधिकाऱ्यांचे, ना पुढाऱ्यांचे लक्ष आहे. त्यामुळे काम शून्य आणि बिल अदा अशीही काही ठिकाणी परिस्थिती असल्याचा घणाघात देसाई यांनी केला आहे.

राजापूर तालुक्यात व रत्नागिरी जिल्ह्यात खासकरून समुद्र किनाऱ्यालगत असलेले खोब गंजतात, वीजवाहिन्या तुटण्याचे प्रमाण जास्त असते. त्याबाबत नियोजन करून ते बदलणे आवश्यक आहे. मात्र, तसे होत नाही, लोक, सामाजिक कार्यकर्ते वारंवार याकडे लक्ष वेधतात. पण महावितरणचे अधिकारी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष करतात, असा टोला देसाई यांनी लगावला आहे. या संकटातही महावितरणचा प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून, खांबावर चढून काम करणारा कर्मचारी मात्र जीवाची बाजी लावून काम करत आहे. मात्र तोही कंत्राटी म्हणूनच कामावर आहे. त्याच्या जीवाची आणि भविष्याची त्याला चिंता आहे. त्यामुळे विकासाच्या पोकळ गप्पा मारणाऱ्या पुढाऱ्यांनी त्यांच्या प्रश्नांकडेही लक्ष द्यावे, अशी मागणी देसाई यांनी केली आहे.