शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

एक हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट

By admin | Updated: October 8, 2015 00:29 IST

रत्नागिरी तालुका : ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार

रत्नागिरी : पावसाचे तीन महिने कोरडेच गेले असल्याने संभाव्य पाणी टंचाईची टांगती तलवार जिल्ह््यावर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तहसील प्रशासनाने लोकचळवळीच्या माध्यमातून तालुक्यात १००० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वाटद येथे या बंधाऱ्यांचा शुभारंभ प्रभारी तहसीलदार हेमंत साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. इतरही गावांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे ठरत आहे.संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी तहसीलदार हेमंत साळवी यांनी तालुक्यात १००० वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून १५ आॅक्टोबरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाकडून आर्थिक मदत मिळेल, याची अपेक्षा न करता किमान पाच बंधारे बांधल्यास गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तालुका प्रशासनातर्फे वाटद येथे बंधाऱ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर तोणदे, पाली आदी गावांमध्येही बंधाऱ्यांना सुरूवात झाली आहे. या बंधाऱ्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुका प्रशासनाने घेतली आहे. यासाठी रिकामी पोती काही कंपन्यांतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या विविध गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे असल्याने ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, तसेच ज्यांच्याकडे रिकामी पोती उपलब्ध आहेत, त्यांनी ती पोती तालुका प्रशासनाला उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन प्रभारी तहसीलदार साळवी यांनी केले. (प्रतिनिधी)