शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारमध्ये केव्हा होणार विधानसभा निवडणूक? CEC ज्ञानेश कुमार यांची घोषणा; SIR संदर्भातही मोठं विधान
2
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
3
अनिल परबांचे आरोप, ज्योती रामदास कदम पहिल्यांदाच मीडियासमोर आल्या; आगीची घटना कशी घडली?
4
"केस ओढले, इस्रायलच्या ध्वजाला किस करायला लावलं"; ग्रेटा थनबर्गला अमानुष वागणुकीचा आरोप, प्रकरण काय?
5
अनर्थ टळला! लँडिंगपूर्वी एअर इंडिया विमानाचं RAT एक्टिव्ह; बर्मिघम रनवेवर विमान सुरक्षित उतरवलं
6
देशातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी खिशात किती कॅश ठेवतात? स्वतःच केला खुलासा
7
रोहित शर्माला कर्णधार पदावरून हटवण्यामागचं 'गंभीर' कनेक्शन; जाणून घ्या सविस्तर
8
Rape Case: पार्टीसाठी बोलावलं, शिक्षकेवर चार जीम ट्रेनर्संनी केला सामूहिक बलात्कार; आरोपींची नावे आली समोर
9
रशियाकडून पाकिस्तानला फायटर जेट इंजिनचा पुरवठा? काँग्रेसच्या दाव्यावर भाजपचा पलटवार...
10
आधार अपडेटसंदर्भात सरकारचा मोठा निर्णय, देशभरातील 6 कोटी मुलांना होणार फायदा
11
गुडन्यूज! ५८व्या वर्षी दुसऱ्यांदा बाबा झाला अरबाज खान, पत्नी शूराने दिला गोंडस बाळाला जन्म
12
पश्चिम बंगालमध्ये पावसाचा हाहाकार, दार्जिलिंगमध्ये पूल कोसळला, 6 जणांचा मृत्यू; बघा Video 
13
पुण्यात NCP शरद पवार गटाच्या आमदाराला मारहाण; सत्ताधारी अजित पवारांच्या समर्थकांसोबत वाद
14
पेट्रोलची चिंता मिटली! 2026 मध्ये येणार मारुतीची पहिली फ्लेक्स-फ्युएल कार, जाणून घ्या डिटेल्स...
15
गेल्या ७ वर्षात किती वाढला भारतीयांचा पगार?; सरकारी रिपोर्टमधील आकडेवारी पाहून व्हाल हैराण
16
Viral Video: दोघे भिडले, लाथा-बुक्क्या मारत एकमेकांवर तुटून पडले; मेट्रोतील राडा व्हायरल
17
Napal Landslide: निसर्ग कोपला! नेपाळमध्ये ढगफुटी, भूस्खलनामुळे २२ जणांचा मृत्यू, विमानतळं महामार्ग बंद
18
केजरीवालांनी खासदार होणं टाळलं! उद्योगपती राजिंदर गुप्तांना राज्यसभेचे तिकीट, गुप्तांबद्दल जाणून घ्या
19
विषारी 'Coldrif' कफ सिरपने घेतला 14 बालकांचा जीव; महाराष्ट्रासह 6 राज्यांमध्ये तपास सुरू
20
नकाशावरून भारताचा इशारा, आता पाकिस्तानी सैन्यानं दिली पोकळ धमकी: "यापुढे युद्ध झालं तर..."

एक हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट

By admin | Updated: October 8, 2015 00:29 IST

रत्नागिरी तालुका : ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार

रत्नागिरी : पावसाचे तीन महिने कोरडेच गेले असल्याने संभाव्य पाणी टंचाईची टांगती तलवार जिल्ह््यावर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तहसील प्रशासनाने लोकचळवळीच्या माध्यमातून तालुक्यात १००० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वाटद येथे या बंधाऱ्यांचा शुभारंभ प्रभारी तहसीलदार हेमंत साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. इतरही गावांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे ठरत आहे.संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी तहसीलदार हेमंत साळवी यांनी तालुक्यात १००० वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून १५ आॅक्टोबरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाकडून आर्थिक मदत मिळेल, याची अपेक्षा न करता किमान पाच बंधारे बांधल्यास गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तालुका प्रशासनातर्फे वाटद येथे बंधाऱ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर तोणदे, पाली आदी गावांमध्येही बंधाऱ्यांना सुरूवात झाली आहे. या बंधाऱ्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुका प्रशासनाने घेतली आहे. यासाठी रिकामी पोती काही कंपन्यांतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या विविध गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे असल्याने ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, तसेच ज्यांच्याकडे रिकामी पोती उपलब्ध आहेत, त्यांनी ती पोती तालुका प्रशासनाला उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन प्रभारी तहसीलदार साळवी यांनी केले. (प्रतिनिधी)