शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
2
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
3
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
4
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
5
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
6
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
7
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
8
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
9
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
10
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
11
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
12
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता
13
'फॅमिली मॅन' फेम अभिनेत्याची हत्या? मित्रांसोबत गेला होता पिकनिकला, कुटुंबियांनी व्यक्त केला संशय
14
पाकिस्तानने भारतासाठी हवाई क्षेत्र बंद केले, परंतू भारताचे वापरतोय; ते ही बंद करण्याचा विचार...
15
आप पदाधिकाऱ्याच्या मुलीचा कॅनडामध्ये संशयास्पद मृत्यू; आठवडाभरापासून होती बेपत्ता
16
"गावातल्या मुलाला आपण स्वीकारणारच नाही का?"; 'झापुक झुपूक'च्या ट्रोलिंगबद्दल केदार शिंदे स्पष्टच बोलले
17
'भालू' फेम अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक प्रकाश भेंडे यांचं निधन
18
कॅनडामध्ये ट्रम्प विरोधाने निवडणूक फिरली; ट्रुडोंच्या पक्षाचे मार्क कार्नी नवे पंतप्रधान होणार
19
Akshaya Tritiya 2025: सोने खरेदी शक्य नाही? मग अक्षय्य तृतीयेला घरी आणा कामधेनुची मूर्ती!
20
वैभव सूर्यवंशीच्या तुफान फटकेबाजीवर बॉलिवूडकरही फिदा! युवा क्रिकेटपटूवर केला कौतुकाचा वर्षाव

एक हजार वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट

By admin | Updated: October 8, 2015 00:29 IST

रत्नागिरी तालुका : ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे ठरणार

रत्नागिरी : पावसाचे तीन महिने कोरडेच गेले असल्याने संभाव्य पाणी टंचाईची टांगती तलवार जिल्ह््यावर आहे. यातून मार्ग काढण्यासाठी तहसील प्रशासनाने लोकचळवळीच्या माध्यमातून तालुक्यात १००० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे. त्यानुसार वाटद येथे या बंधाऱ्यांचा शुभारंभ प्रभारी तहसीलदार हेमंत साळवी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. इतरही गावांमध्ये सुरू झालेल्या या उपक्रमासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे ठरत आहे.संभाव्य पाणी टंचाईचा सामना करण्यासाठी तहसीलदार हेमंत साळवी यांनी तालुक्यात १००० वनराई बंधाऱ्यांचे उद्दिष्ट ठेवले आहे. लोकचळवळीच्या माध्यमातून १५ आॅक्टोबरपर्यंत तालुक्यातील प्रत्येक ग्रामपंचायतीने शासनाकडून आर्थिक मदत मिळेल, याची अपेक्षा न करता किमान पाच बंधारे बांधल्यास गावातील पाण्याची पातळी वाढण्यास मदत होणार आहे. तालुका प्रशासनातर्फे वाटद येथे बंधाऱ्याच्या कामाला प्रारंभ करण्यात आला. त्याचबरोबर तोणदे, पाली आदी गावांमध्येही बंधाऱ्यांना सुरूवात झाली आहे. या बंधाऱ्यासाठी प्लास्टिकच्या पिशव्या उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुका प्रशासनाने घेतली आहे. यासाठी रिकामी पोती काही कंपन्यांतर्फे उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. सध्या विविध गावांमध्ये तलाठी, ग्रामसेवक यांच्या माध्यमातून तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत बंधाऱ्यांच्या कामाला सुरूवात झाली आहे. यासाठी ग्रामस्थांचे योगदान महत्वाचे असल्याने ग्रामस्थांनी यात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, तसेच ज्यांच्याकडे रिकामी पोती उपलब्ध आहेत, त्यांनी ती पोती तालुका प्रशासनाला उपलब्ध करून द्यावीत, असे आवाहन प्रभारी तहसीलदार साळवी यांनी केले. (प्रतिनिधी)