शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवी यात्रा चेंगराचेंगरी: यात्रेला आले अन् काकू-पुतण्याने गमावला जीव, मृतांची नावे आली समोर
2
Pune Crime: 'कोयता काढला अन्...'; पुण्यातील बिबवेवाडीत भररस्त्यात थरकाप उडवणारी घटना, व्हिडीओ व्हायरल
3
IPO आणण्याची तयारी करतेय कंपनी; बुमराह, रोहित शर्मा, आमिर खान यांनीही केली गुंतवणूक; जाणून घ्या 
4
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
5
अक्षय्य तृतीयेला येणार होते, पण अजून ‘लाडकी बहीण’चे पैसे आले नाहीत; नेमका का होतोय उशीर?
6
"हेच कारण आहे पहलगाममध्ये जे झालं ते..," असं काय म्हणाला सोनू निगम; दाखल झाला FIR
7
५०० वर्षांनी गुरु अतिचारी गोचर: ६ राशींना लाभ, गुरु करेल मालामाल; अच्छे दिन येणार, शुभ घडणार!
8
मस्क यांच्या स्टारलिंक कंपनीचं पाकिस्तान-बांगलादेश कनेक्शन; भारतानं मागवली कामकाजाची माहिती, प्रकरण काय?
9
दहशतवाद्यांना पोसल्याचा पाकला त्रास; माझ्या आईला त्यांनीच गोळ्या घातल्या
10
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
11
Home Loan: १५ लाखही वाचतील आणि ६० महिने आधीच होम लोनचं टेन्शन संपेल, कसं? जाणून घ्या
12
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
13
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
14
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
15
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
16
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
17
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
18
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
19
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
20
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट

‘त्या’ दाेघांनी केले कोरोनाबाधित मृतावर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:33 IST

राजापूर : कोरोनाच्या काळात रक्‍ताच्या नात्यामधील व्यक्तीही कोरोना रुग्णावर अंतिम संस्कार करण्यासाठी घाबरतात. मृत व्यक्‍तीच्या अंत्यसंस्कारासाठीही कोणी समोर येत ...

राजापूर : कोरोनाच्या काळात रक्‍ताच्या नात्यामधील व्यक्तीही कोरोना रुग्णावर अंतिम संस्कार करण्यासाठी घाबरतात. मृत व्यक्‍तीच्या अंत्यसंस्कारासाठीही कोणी समोर येत नसल्याच्या घटना सातत्याने समोर येत आहेत. या कठीण काळात राजापुरातील विनय गुरव व विजय गुरव या जोडीने गुरववाडी भागातील एका कोरोनाबाधित रुग्णाला आधी पीपीई किट घालून धाडसाने ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेलेच, शिवाय त्या बाधिताचा मृत्यू झाल्यावर मृतदेहावर अंत्यसंस्कारही केले. धाडसाने कोरोनाच्या कठीण काळात गुरव द्वयींच्या या सामाजिक सेवेने माणुसकी देखील झळाळली आहे.

राजापूर शहरातील एस. टी. आगारानजीकच्या गुरववाडी भागात सध्या वीस कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. मात्र, तत्पूर्वी काही दिवसांपूर्वी या भागातील एका पंचावन्न वर्षीय नागरिकाला चार दिवस कोरोनाच्या लक्षणांनी ग्रासलेले होते. मात्र, घरापासून ग्रामीण रुग्णालयापर्यंत उपचारासाठी त्याला नेण्यासाठी कोणीही धजावत नव्हते. अखेर नगरसेवक विनय गुरव व माजी नगरसेवक विजय गुरव यांनी धारिष्ट्य दाखवत पीपीई किट परिधान करून त्या रुग्णाला एका रिक्षातून ग्रामीण रुग्णालयात नेऊन दाखल केले. यानंतर या द्वयींनी नदीकिनारी जात पीपीई किट जाळून टाकले व रिक्षा सॅनिटाइज केली.

यादरम्यानच ग्रामीण रुग्णालयात दाखल केलेल्या त्या रुग्णाचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे निष्पन्न झाले आणि तेथेच त्याचे निधन झाले. ग्रामीण रुग्णालयातून याबाबत गुरव द्वयींना दूरध्वनी आला. आता प्रश्‍न होता मृतदेह ताब्यात घेण्याचा. मात्र, त्यासाठी कोणीही पुढाकार घेण्यास तयार नव्हते. त्यातच मृतदेहाचे सोपस्कार करून मृतदेह देण्यासाठी रुग्णालयातही एकच कर्मचारी असल्याने पुन्हा या दोन्ही आजी-माजी नगरसेवकांनी पीपीई किट चढवले आणि मृतदेह बांधून घेत रुग्णवाहिकेतून स्मशानभूमीपर्यंत नेऊन अंत्यसंस्कारही केले.