शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
2
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
3
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
4
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
5
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
6
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
7
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
8
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
9
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
10
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
11
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
12
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
13
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
14
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
15
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
16
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 
17
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
18
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
19
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
20
पत्नीच्या डोक्यात शिरलं 'प्रेमाचं भूत', प्रियकरासोबत गेली हॉटेलवर, पाठलाग करत पतीही पोहोचला अन् मग...!

निळवणेतील ‘त्या’ १२ घरांना न्याय मिळवून देणार : याेगेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

खेड : गेली पंधरा वर्षे निळवणे गावातील शेतकरी कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ...

खेड : गेली पंधरा वर्षे निळवणे गावातील शेतकरी कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ त्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याशी चर्चा केली असून, त्यांना नक्की न्याय मिळेल, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.

जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये निळवणे चिंचवाडीतील ३० घरांचे पुनर्वसन करण्यात आले होते. या सर्व बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी शासनाने एक लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यापैकी १८ घरांना हा निधी पूर्ण मिळाला मात्र शिवाजीनगर येथील उर्वरित १२ घरांना केवळ चाळीस हजार रुपये मिळाले आहेत. या निधीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही या बाधित घरांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक उर्वरित ६० हजार रुपयांचा निधी मिळाला नाही. या १२ कुटुंबीयांवर शासनाकडून अन्याय झाला आहे. या १२ अन्यायग्रस्त कुटुंबाना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कदम यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली़ यावेळी सविस्तर वृतांत लेखी स्वरुपात दिला आहे. या प्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडून अहवाल मागवून घेण्याचे आदेश दिले आहेत.