शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
4
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
5
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
6
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
7
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
8
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
9
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
10
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
11
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
12
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
13
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
14
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
15
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
16
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
17
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
18
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
19
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

निळवणेतील ‘त्या’ १२ घरांना न्याय मिळवून देणार : याेगेश कदम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2021 04:21 IST

खेड : गेली पंधरा वर्षे निळवणे गावातील शेतकरी कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू ...

खेड : गेली पंधरा वर्षे निळवणे गावातील शेतकरी कुटुंब न्यायाच्या प्रतीक्षेत आहेत़ त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत़ त्यासाठी मदत व पुनर्वसन मंत्री यांच्याशी चर्चा केली असून, त्यांना नक्की न्याय मिळेल, असा विश्वास आमदार योगेश कदम यांनी व्यक्त केला.

जुलै २००५ मध्ये झालेल्या अतिवृष्टीमध्ये निळवणे चिंचवाडीतील ३० घरांचे पुनर्वसन करण्यात आले होते. या सर्व बाधित घरांच्या पुनर्वसनासाठी शासनाने एक लाख रुपयांचा निधी देण्याची घोषणा केली. यापैकी १८ घरांना हा निधी पूर्ण मिळाला मात्र शिवाजीनगर येथील उर्वरित १२ घरांना केवळ चाळीस हजार रुपये मिळाले आहेत. या निधीसाठी शासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही या बाधित घरांचे पुनर्वसन करण्यासाठी आवश्यक उर्वरित ६० हजार रुपयांचा निधी मिळाला नाही. या १२ कुटुंबीयांवर शासनाकडून अन्याय झाला आहे. या १२ अन्यायग्रस्त कुटुंबाना न्याय मिळवून देण्यासाठी आमदार कदम यांनी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली़ यावेळी सविस्तर वृतांत लेखी स्वरुपात दिला आहे. या प्रकरणी मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी तातडीने जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्याकडून अहवाल मागवून घेण्याचे आदेश दिले आहेत.