शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

चाैपदरीकरणाच्या कामात गटारे बुजल्याने हाेणार त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अनिल कासारे लांजा : मुंबई-गाेवा महामार्गाचे लांजा येथे कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अनिल कासारे

लांजा : मुंबई-गाेवा महामार्गाचे लांजा येथे कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे नसल्याने पावसाच्या पाण्याचा प्रचंड त्रास बाजारपेठेला होत आहे. या वर्षी पूर्णतः गटारे बुजल्याने संपूर्ण बाजारपेठेत पावसाचे पाणी घुसणार आहे. मुळात बाजारपेठेतील दोन किलोमीटरच्या टप्प्यात रस्ताच गायब झाला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महामार्ग पाण्याखाली जाऊन नदीचे स्वरूप आले होते. यावरून येथील बिकट परिस्थितीची कल्पना येते, अशी माहिती महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख महंमद रखांगी यांनी दिली.

महंमद रखांगी पुढे म्हणाले की, चार वर्षांहून अधिक काळ मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. हे चौपदरीकरण २०१८ ला पूर्णत्वास जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज २०२१ चा मे महिना संपत आला तरीही महामार्गाच्या कामाला कोणतीही गती प्राप्त झालेली नाही. लांजा तालुक्यातील वाकेड ते आरवली हा जवळपास ८९ किलोमीटरचा टप्पा पूर्णतः रखडलेला आहे. अवघे १० टक्के थातूरमातूर काम झाले आहे. या टप्प्यात येणाऱ्या लांजा बाजारपेठेत मात्र चौपदरीकरणाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.

नगरपंचायत नळपाणी योजनेच्या अंडरग्राउंड पाइपलाइनचे काम, महावितरणचे विद्युत पोल आणि विद्युत लाइनचे काम, साइडपट्टीचे कोणतेही नियोजन नाही. उड्डाणपुलाला लागून ॲप्रोच रोड तयार करण्याबाबत महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यात उदासीनता दिसून येत आहे.

पक्क्या स्वरूपाचे सर्व्हिस, ॲप्रोच, डायवर्जन रोड करण्यात आलेले नसल्याने संपूर्ण बाजारपेठ आणि लांजा शहर धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहे. महामार्गावरून मोठमोठाल्या वाहनांची नियमितपणे वाहतूक होत असल्याने या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. रेस्ट हाउस ते बसवेश्वर चौक असा सर्व्हिस रोड पूर्ण शहरात तयार होणे गरजेचे आहे. हा सर्व्हिस रोड पक्क्या स्वरूपाचा म्हणजेच डांबरीकरणाचा होणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार कंपनीने केवळ मलमपट्टी करून, खडी पसरवून कच्चा मातीचा हा रस्ता केला आहे. हा रस्ता जाग्यावर राहिलेला नाही. यामुळे बाजारपेठेत महामार्गावरील रस्ता शोधणे अवघड बनले आहे. पावसाळ्यात तर यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत.

लांजा बाजारपेठेला वाचविण्यासाठी बायपास असावा, अशी भूमिका घेऊन महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने आवाज उठविला होता. परंतु भर बाजारपेठेतूनच महामार्ग नेण्याचा निर्णय झाल्यानंतर या शहरात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला. मात्र हा निर्णय सर्वार्थाने चुकीचा ठरत असून, बजेटच्या दृष्टीनेही हा ओव्हरब्रिज परवडणारा नाही, हे स्पष्ट झाले असल्याचे रखांगी यांनी सांगितले.