शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

चाैपदरीकरणाच्या कामात गटारे बुजल्याने हाेणार त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अनिल कासारे लांजा : मुंबई-गाेवा महामार्गाचे लांजा येथे कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अनिल कासारे

लांजा : मुंबई-गाेवा महामार्गाचे लांजा येथे कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे नसल्याने पावसाच्या पाण्याचा प्रचंड त्रास बाजारपेठेला होत आहे. या वर्षी पूर्णतः गटारे बुजल्याने संपूर्ण बाजारपेठेत पावसाचे पाणी घुसणार आहे. मुळात बाजारपेठेतील दोन किलोमीटरच्या टप्प्यात रस्ताच गायब झाला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महामार्ग पाण्याखाली जाऊन नदीचे स्वरूप आले होते. यावरून येथील बिकट परिस्थितीची कल्पना येते, अशी माहिती महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख महंमद रखांगी यांनी दिली.

महंमद रखांगी पुढे म्हणाले की, चार वर्षांहून अधिक काळ मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. हे चौपदरीकरण २०१८ ला पूर्णत्वास जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज २०२१ चा मे महिना संपत आला तरीही महामार्गाच्या कामाला कोणतीही गती प्राप्त झालेली नाही. लांजा तालुक्यातील वाकेड ते आरवली हा जवळपास ८९ किलोमीटरचा टप्पा पूर्णतः रखडलेला आहे. अवघे १० टक्के थातूरमातूर काम झाले आहे. या टप्प्यात येणाऱ्या लांजा बाजारपेठेत मात्र चौपदरीकरणाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.

नगरपंचायत नळपाणी योजनेच्या अंडरग्राउंड पाइपलाइनचे काम, महावितरणचे विद्युत पोल आणि विद्युत लाइनचे काम, साइडपट्टीचे कोणतेही नियोजन नाही. उड्डाणपुलाला लागून ॲप्रोच रोड तयार करण्याबाबत महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यात उदासीनता दिसून येत आहे.

पक्क्या स्वरूपाचे सर्व्हिस, ॲप्रोच, डायवर्जन रोड करण्यात आलेले नसल्याने संपूर्ण बाजारपेठ आणि लांजा शहर धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहे. महामार्गावरून मोठमोठाल्या वाहनांची नियमितपणे वाहतूक होत असल्याने या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. रेस्ट हाउस ते बसवेश्वर चौक असा सर्व्हिस रोड पूर्ण शहरात तयार होणे गरजेचे आहे. हा सर्व्हिस रोड पक्क्या स्वरूपाचा म्हणजेच डांबरीकरणाचा होणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार कंपनीने केवळ मलमपट्टी करून, खडी पसरवून कच्चा मातीचा हा रस्ता केला आहे. हा रस्ता जाग्यावर राहिलेला नाही. यामुळे बाजारपेठेत महामार्गावरील रस्ता शोधणे अवघड बनले आहे. पावसाळ्यात तर यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत.

लांजा बाजारपेठेला वाचविण्यासाठी बायपास असावा, अशी भूमिका घेऊन महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने आवाज उठविला होता. परंतु भर बाजारपेठेतूनच महामार्ग नेण्याचा निर्णय झाल्यानंतर या शहरात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला. मात्र हा निर्णय सर्वार्थाने चुकीचा ठरत असून, बजेटच्या दृष्टीनेही हा ओव्हरब्रिज परवडणारा नाही, हे स्पष्ट झाले असल्याचे रखांगी यांनी सांगितले.