शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

चाैपदरीकरणाच्या कामात गटारे बुजल्याने हाेणार त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:33 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क अनिल कासारे लांजा : मुंबई-गाेवा महामार्गाचे लांजा येथे कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

अनिल कासारे

लांजा : मुंबई-गाेवा महामार्गाचे लांजा येथे कामकाज सुरू असल्याने गटारे पूर्णतः बुजली आहेत. गटारे नसल्याने पावसाच्या पाण्याचा प्रचंड त्रास बाजारपेठेला होत आहे. या वर्षी पूर्णतः गटारे बुजल्याने संपूर्ण बाजारपेठेत पावसाचे पाणी घुसणार आहे. मुळात बाजारपेठेतील दोन किलोमीटरच्या टप्प्यात रस्ताच गायब झाला आहे. चक्रीवादळामुळे झालेल्या मुसळधार पावसामुळे संपूर्ण महामार्ग पाण्याखाली जाऊन नदीचे स्वरूप आले होते. यावरून येथील बिकट परिस्थितीची कल्पना येते, अशी माहिती महामार्ग संघर्ष समितीचे प्रमुख महंमद रखांगी यांनी दिली.

महंमद रखांगी पुढे म्हणाले की, चार वर्षांहून अधिक काळ मुंबई-गोवा महामार्गाचे काम सुरू आहे. हे चौपदरीकरण २०१८ ला पूर्णत्वास जाईल, असे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, आज २०२१ चा मे महिना संपत आला तरीही महामार्गाच्या कामाला कोणतीही गती प्राप्त झालेली नाही. लांजा तालुक्यातील वाकेड ते आरवली हा जवळपास ८९ किलोमीटरचा टप्पा पूर्णतः रखडलेला आहे. अवघे १० टक्के थातूरमातूर काम झाले आहे. या टप्प्यात येणाऱ्या लांजा बाजारपेठेत मात्र चौपदरीकरणाचा पूर्णतः बोजवारा उडाला आहे.

नगरपंचायत नळपाणी योजनेच्या अंडरग्राउंड पाइपलाइनचे काम, महावितरणचे विद्युत पोल आणि विद्युत लाइनचे काम, साइडपट्टीचे कोणतेही नियोजन नाही. उड्डाणपुलाला लागून ॲप्रोच रोड तयार करण्याबाबत महामार्ग विभाग आणि संबंधित ठेकेदार कंपनी यांच्यात उदासीनता दिसून येत आहे.

पक्क्या स्वरूपाचे सर्व्हिस, ॲप्रोच, डायवर्जन रोड करण्यात आलेले नसल्याने संपूर्ण बाजारपेठ आणि लांजा शहर धुळीच्या त्रासाने हैराण झाले आहे. महामार्गावरून मोठमोठाल्या वाहनांची नियमितपणे वाहतूक होत असल्याने या धुळीचा प्रचंड त्रास होत आहे. रेस्ट हाउस ते बसवेश्वर चौक असा सर्व्हिस रोड पूर्ण शहरात तयार होणे गरजेचे आहे. हा सर्व्हिस रोड पक्क्या स्वरूपाचा म्हणजेच डांबरीकरणाचा होणे आवश्यक असताना, संबंधित ठेकेदार कंपनीने केवळ मलमपट्टी करून, खडी पसरवून कच्चा मातीचा हा रस्ता केला आहे. हा रस्ता जाग्यावर राहिलेला नाही. यामुळे बाजारपेठेत महामार्गावरील रस्ता शोधणे अवघड बनले आहे. पावसाळ्यात तर यामुळे अनेक समस्या निर्माण होणार आहेत.

लांजा बाजारपेठेला वाचविण्यासाठी बायपास असावा, अशी भूमिका घेऊन महामार्ग प्रकल्पबाधित संघर्ष समितीने आवाज उठविला होता. परंतु भर बाजारपेठेतूनच महामार्ग नेण्याचा निर्णय झाल्यानंतर या शहरात उड्डाणपूल उभारण्याचा निर्णय राष्ट्रीय महामार्ग विभागाने घेतला. मात्र हा निर्णय सर्वार्थाने चुकीचा ठरत असून, बजेटच्या दृष्टीनेही हा ओव्हरब्रिज परवडणारा नाही, हे स्पष्ट झाले असल्याचे रखांगी यांनी सांगितले.