शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
4
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
5
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
6
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
7
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
8
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
9
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
10
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
11
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
12
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?
13
जीवघेण्या फंगसचा अलर्ट! वाढत्या तापमानामुळे येईल नवं संकट; तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा
14
पाकिस्तानने मर्यादा ओलांडल्या, आता अद्दल घडवावी लागेल..; काश्मीरमधून ओवेसींचा निशाणा
15
महापालिका, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका महायुती एकत्र लढणार का? CM फडणवीस म्हणाले...
16
कोहलीच्या पोस्टरसमोर बकऱ्याचा बळी, आरसीबीच्या ३ चाहत्यांना अटक, कारण ऐकूण पोलीसही चक्रावले
17
चीनचा पाकिस्तानसोबत डबल गेम! UN परिषदेत भेटी-गाठींचा देखावा; पण बाजूने एक शब्दही नाही बोलला
18
'ही' आहेत पाकिस्तानातील श्रीमंत शहरं? मुंबई-दिल्लीशी तुलना करायची झाली तर...
19
भीषण अपघात! कार चालवताना रील पाहत होता ड्रायव्हर; नवरदेवाच्या भाचीचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
20
पाकिस्तानातून भारतात आलेल्या २२ महिलांनी वाढवलं सरकारचं टेन्शन! जन्माला घातली ९५ मुलं अन्...

नमन मंडळांमध्ये अजूनही संभ्रमावस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2021 04:32 IST

असगोली : काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिमगाेत्सव साजरा करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत नवनवीन अध्यादेश काढले जात असल्याने नमन ...

असगोली : काेराेनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिमगाेत्सव साजरा करण्याबाबत निर्बंध घालण्यात आले आहेत. याबाबत नवनवीन अध्यादेश काढले जात असल्याने नमन मंडळांमध्ये अजूनही संभ्रमावस्था आहे.

कोकणातील पारंपरिक आणि कोकणवासियांचा आवडता सण म्हणजे शिमगोत्सव. हा शिमगोत्सव दोन दिवसांवर येऊन ठेपला आला आहे. या शिमगोत्सवात संकासूर अर्थात खेळे हे परंपरेनुसार गावोगावी गावभोवनीसाठी फिरतात. परंतु, कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शिमगोत्सवाबाबत काही अटी व शर्ती घालण्यात आल्या आहेत. फाक पंचमीला पहिली होळी जाळली जाते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी नमन मंडळ आपापले खेळे घेऊन गावभोवनीसाठी बाहेर पडतात. काही खेळे गाव भोवनीसाठी बाहेर पडले की, मोठ्या होळीच्या आदल्या दिवशी आपापल्या गावात जातात. परंतु सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शासनाने नियमावलीची भलीमोठी यादी जाहीर केली आहे. त्यामुळे शिमगोत्सवात गावभोवनीला बाहेर पडावे की नाही, या संभ्रमात नमन मंडळ आहेत.

शासनाच्या नियमावलीनुसार २५ लोकांसमवेत सण साजरे करावेत, असे म्हटले जात आहे. पण, नमन मंडळांनी प्रशासनाकडे विचारणा केली असता प्रशासन कोणतीही जबाबदारी घ्यायला तयार नाही. त्यामुळे शिमगोत्सव दोन दिवसांवर आला असून, काय निर्णय घ्यावा, या विचारात नमन मंडळे आहेत.