शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यात मदत पोहचणार; पुढच्या आठवड्यात घोषणा करू - CM देवेंद्र फडणवीस
2
पाकिस्तान: क्वेट्टा येथे लष्करी मुख्यालयाजवळ आत्मघाती हल्ला; १० ठार, ३२ हून अधिक जखमी
3
"शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून लक्ष हटवण्यासाठी अहिल्यानगरमध्ये सरकार पुरस्कृत दंगल झाली’’ काँग्रेसचा गंभीर आरोप
4
डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय, युट्यूब देणार २१७ कोटी रुपये; फेसबुक आणि ट्विटरने किती दिलेले?
5
चीनची चौथी सर्वात मोठी कार कंपनी भारतात येणार? Tiggo SUV चा डिझाइन पेटंट दाखल 
6
दागिने घालून जिममध्ये जायची सून, अद्दल घडवण्यासाठी सासूने रचला कट; लोकेशन पाठवलं अन्...
7
Social Viral: मज्जा नि लाईफ! विमान ५ तास लेट; प्रवाशांनी एअरपोर्टवर फेर धरला थेट! 
8
Illegal U Turn : पावती फाडण्यासाठी पोहोचले पोलीस, पण रिकाम्या हातानं परतावं लागलं; कारमध्ये डोकावून बघितलं तर...! नेमकं काय घडलं?
9
टाटा, बाय बाय...! आशिया कपमध्ये हरले, बिल या खेळाडूवर फाडले; दक्षिण आफ्रिकेविरोधातील मालिकेसाठी संघातून बाहेर काढले...
10
देवी बनून 'बाहुबली' साम्राज्य उभारण्याचं स्वप्न; कोट्यवधी लोकांची अब्जावधी डॉलर्सची फसवणूक
11
गेमचेंजर! भारतात सापडला 'व्हाइट गोल्ड'चा खजिना; चीनवरील निर्भरता संपणार, नवी क्रांती घडणार
12
"मी आजपर्यंत एकाही कंत्राटदाराकडून कधी..."; भ्रष्टाचार, इथेनॉलच्या आरोपांवर गडकरींनी सोडलं मौन
13
'शालार्थ आयडी' नंतर आणखी एक शिक्षण घोटाळा ! क्षमता नसताना शाळेत १८ शिक्षकांची नियुक्ती कशाला ?
14
MP Accident: देवदर्शनावरून येताना टूरिस्ट बसनं उडवलं, तिघांचा मृत्यू; सणासुदीच्या दिवशी कुटुंबावर शोककळा
15
TCS Layoffs: 'स्वतःहून राजीनामा द्या किंवा टर्मिनेट व्हा'; टीसीएसमध्ये ३० हजार कर्मचाऱ्यांची कपात? TATA समूहाच्या आयटी कंपनीत भीतीचं वातावारण
16
सूत जुळलं! १२वीच्या विद्यार्थिनीचं शिक्षकावर प्रेम जडलं, लग्न केलं अन् आता पतीसाठी मागतेय सुरक्षा
17
दीपिकाला अनफॉलो केलं? चर्चांवर अखेर फराह खानने सोडलं मौन, म्हणाली, "आम्ही दोघींनी..."
18
टाटाच्या शेअरनं घेतलाय रॉकेट स्पीड, आता होणार स्प्लीट; १०००% हून अधिक परतावा देत लोकांना केलंय मालामाल!
19
GST कपातीचा फायदा ग्राहकांना नाही! कंपन्या फसवणूक करत असल्याच्या ३००० हून अधिक तक्रारी दाखल
20
Video: भारताविरोधातील पराभव सहन झाला नाही; पाकिस्तानी खेळाडूने रडत रडत बनवला व्हिडिओ अन्...

धरणांना पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

By admin | Updated: June 22, 2016 00:15 IST

पाणी जमिनीतच मुरले : पाणीसाठ्यात किंचित वाढ

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारेच्या मध्यम व लघु धरणांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने या धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाचे पाणी जमिनीतच मुरले असून, धरणात झिरपलेले नाही. त्यामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढलेली नाही. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. जिल्ह्यात पाटबंधारेच्या मध्यम व लघु अशा ६३ धरणांमध्ये २१ जून २०१६ रोजी १९२.७७ दशलक्ष घनमीटर अर्थात ४३.३८ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र, धरण क्षेत्रात हा पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. यावर्षी मान्सूनने कोकणला चकवा दिला आहे. कोकणमार्गे मान्सून न येता अन्य मार्गाने विदर्भात पोहोचला आहे. मंगळवारी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे मान्सूनची हजेरी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दमदार पावसाची जिल्हावासीयांना अजूनही प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात ६३ धरण प्रकल्पांपैकी २८ प्रकल्पांमध्ये २० टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. त्यामध्ये चिंचाळी, तुळशी, सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, टांगर, पंचनदी, नातूवाडी मध्यम धरण प्रकल्प, तिवरे, फणसवाडी, असुर्डे, राजेवाडी, साखरपा, निवे, गवाणे, बेणी, पन्हाळे, बेर्डेवाडी, हर्दखळे, कशेळी, तळवडे, दिवाळवाडी, परुळे, कोंड्ये, काकेवाडी, गोपाळवाडी, जुवाठी या धरणांचा समावेश आहे. १२ धरणांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असून, त्यामध्ये ५१ टक्के ते ९४ टक्के या दरम्यान पाणीसाठा आहे. या धरणांमध्ये मुचकुंदी, अर्जुना, चिंचवाडी, पणदेरी, शेलारवाडी, मालघर, अडरे, खोपड, आंबतखोल, तेलेवाडी, गडनदी, रांगव या धरणांचा समावेश आहे. लांज्यातील केळंबा व राजापूर तालुक्यातील ओझर ही धरणे कोरडी आहेत. यातील काही धरण प्रकल्प अजूनही पूर्णत्वास न गेल्याने त्यामध्ये पाणीसाठा नाही. पाटबंधारे धरणांच्या क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी अत्यल्प आहे. १ जून २०१६पासून आत्तापर्यंत या ६३ पैकी ६२ धरणांच्या क्षेत्रात एकूण १०८७१ मिलिमीटर पर्जन्यवृष्टी झाली आहे. आंबतखोल धरण क्षेत्रात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. धरण क्षेत्रातील पर्जन्यमान मोजण्यासाठी पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज पडणाऱ्या पावसाची माहिती ही त्या-त्या दिवशीच उपलब्ध होणार आहे.पाणीकपात मात्र बंद : पाच प्रकल्पांमध्ये पाण्याचा ओघ सुरुविहिरी, नळांना पाणी...धरणांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरींना पाणी आले आहे. पाटबंधारे धरणांच्या बाजूला उभारलेल्या जॅकवेलवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील ९२ नळपाणी योजनांच्या पाण्यात याआधी कपात करण्यात आली होती. मात्र, आता नळ योजनांना पूर्ववत पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हरचिरी धरण पातळीत वाढरत्नागिरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व नगर परिषदेच्या नळ योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडिसीच्या हरचिरीसह पाच कोल्हापूर धरण प्रकल्पांमध्ये पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. चार धरणांमधील पाणी मे अखेरीस संपले होते. केवळ हरचिरी धरणातील पाणी योजनांना पुरवठा केला जात होता. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनंतर पाण्यात केलेली कपात रद्द करण्यात आली आहे. कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, कर्ला, आंबेशेत, शिरगाव या गावांना एमआयडिसीकडून पाणीपुरवठा केला जातो. तसेच रत्नागिरी नगर परिषदेला अंशत: पाणीपुरवठा केला जातो.