शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

धरणांना पावसाची अद्यापही प्रतीक्षाच

By admin | Updated: June 22, 2016 00:15 IST

पाणी जमिनीतच मुरले : पाणीसाठ्यात किंचित वाढ

प्रकाश वराडकर -- रत्नागिरी जिल्ह्यातील पाटबंधारेच्या मध्यम व लघु धरणांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा आहे. मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने या धरणांमधील पाणीसाठ्यात किंचित वाढ झाली आहे. मान्सूनपूर्व पावसाचे पाणी जमिनीतच मुरले असून, धरणात झिरपलेले नाही. त्यामुळे धरणांमधील पाणीपातळी वाढलेली नाही. मात्र, मान्सूनपूर्व पावसाने टंचाईचा प्रश्न काही प्रमाणात सुटला आहे. जिल्ह्यात पाटबंधारेच्या मध्यम व लघु अशा ६३ धरणांमध्ये २१ जून २०१६ रोजी १९२.७७ दशलक्ष घनमीटर अर्थात ४३.३८ टक्के पाणीसाठा आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस झाला. मात्र, धरण क्षेत्रात हा पाऊस न झाल्याने पाणीसाठ्यात वाढ झालेली नाही. यावर्षी मान्सूनने कोकणला चकवा दिला आहे. कोकणमार्गे मान्सून न येता अन्य मार्गाने विदर्भात पोहोचला आहे. मंगळवारी जिल्ह्याच्या काही भागात पाऊस झाला. हा पाऊस म्हणजे मान्सूनची हजेरी असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, दमदार पावसाची जिल्हावासीयांना अजूनही प्रतीक्षाच आहे. जिल्ह्यात ६३ धरण प्रकल्पांपैकी २८ प्रकल्पांमध्ये २० टक्केपेक्षाही कमी पाणीसाठा आहे. त्यामध्ये चिंचाळी, तुळशी, सोंडेघर, सुकोंडी, आवाशी, टांगर, पंचनदी, नातूवाडी मध्यम धरण प्रकल्प, तिवरे, फणसवाडी, असुर्डे, राजेवाडी, साखरपा, निवे, गवाणे, बेणी, पन्हाळे, बेर्डेवाडी, हर्दखळे, कशेळी, तळवडे, दिवाळवाडी, परुळे, कोंड्ये, काकेवाडी, गोपाळवाडी, जुवाठी या धरणांचा समावेश आहे. १२ धरणांमध्ये पाण्याची स्थिती चांगली असून, त्यामध्ये ५१ टक्के ते ९४ टक्के या दरम्यान पाणीसाठा आहे. या धरणांमध्ये मुचकुंदी, अर्जुना, चिंचवाडी, पणदेरी, शेलारवाडी, मालघर, अडरे, खोपड, आंबतखोल, तेलेवाडी, गडनदी, रांगव या धरणांचा समावेश आहे. लांज्यातील केळंबा व राजापूर तालुक्यातील ओझर ही धरणे कोरडी आहेत. यातील काही धरण प्रकल्प अजूनही पूर्णत्वास न गेल्याने त्यामध्ये पाणीसाठा नाही. पाटबंधारे धरणांच्या क्षेत्रात मान्सूनपूर्व पावसाची हजेरी अत्यल्प आहे. १ जून २०१६पासून आत्तापर्यंत या ६३ पैकी ६२ धरणांच्या क्षेत्रात एकूण १०८७१ मिलिमीटर पर्जन्यवृष्टी झाली आहे. आंबतखोल धरण क्षेत्रात अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही. धरण क्षेत्रातील पर्जन्यमान मोजण्यासाठी पर्जन्यमापक बसविण्यात आले आहेत. त्यामुळे दररोज पडणाऱ्या पावसाची माहिती ही त्या-त्या दिवशीच उपलब्ध होणार आहे.पाणीकपात मात्र बंद : पाच प्रकल्पांमध्ये पाण्याचा ओघ सुरुविहिरी, नळांना पाणी...धरणांमध्ये पाणीसाठा मोठ्या प्रमाणात झाला नसला तरी पावसाचे पाणी जमिनीत मुरले आहे. त्यामुळे आटलेल्या विहिरींना पाणी आले आहे. पाटबंधारे धरणांच्या बाजूला उभारलेल्या जॅकवेलवर अवलंबून असलेल्या जिल्ह्यातील ९२ नळपाणी योजनांच्या पाण्यात याआधी कपात करण्यात आली होती. मात्र, आता नळ योजनांना पूर्ववत पाणीपुरवठा होत असल्याचे सांगण्यात येत आहे. हरचिरी धरण पातळीत वाढरत्नागिरी तालुक्यातील पाच ग्रामपंचायती व नगर परिषदेच्या नळ योजनांना पाणीपुरवठा करणाऱ्या एमआयडिसीच्या हरचिरीसह पाच कोल्हापूर धरण प्रकल्पांमध्ये पाण्याचा ओघ सुरू झाला आहे. चार धरणांमधील पाणी मे अखेरीस संपले होते. केवळ हरचिरी धरणातील पाणी योजनांना पुरवठा केला जात होता. मान्सूनपूर्व पावसाच्या हजेरीनंतर पाण्यात केलेली कपात रद्द करण्यात आली आहे. कुवारबाव, नाचणे, मिरजोळे, कर्ला, आंबेशेत, शिरगाव या गावांना एमआयडिसीकडून पाणीपुरवठा केला जातो. तसेच रत्नागिरी नगर परिषदेला अंशत: पाणीपुरवठा केला जातो.