शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: सीएसएमटी स्थानकात प्लॅटफॉर्म क्लिनिंग मशीन रेल्वे रुळावर कोसळली, मोटरमननं दाखवलं प्रसंगावधान!
2
पाकिस्तानने केलेला एअरबेस उडवल्याचा दावा; PM मोदी तिथेच पोहोचले, जवानांशी साधला संवाद
3
दोन दिवसांत बॉम्बस्फोट घडवण्याची धमकी; महाराष्ट्र पोलीस कंट्रोल रुमला ई-मेल, शोधमोहीम सुरू
4
SSC Result 2025: दहावीचा निकाल ९४.१० टक्के; पहिला नंबर कोकणचाच, पाठोपाठ कोल्हापूर! इथे पाहा निकाल
5
वादळ वारं सुटलं गं! पुण्यात बहुतांश भागात पावसाची हजेरी; दुचाकीचालकांनो, जरा सांभाळूनच...
6
CBSE board 12th Result 2025: सीबीएसई बोर्डाचाही १२ वीचा निकाल जाहीर; महाराष्ट्राची आकडेवारी आली, ९०.९३ टक्के निकाल
7
निवृत्तीच्या दुसऱ्याच दिवशी विराट कोहली पत्नीसह प्रेमानंद महाराजांच्या चरणी नतमस्तक...
8
प्रेग्नंट गर्लफ्रेंडला खायला लावली अबॉर्शनची गोळी, प्रकृती बिघडताच बॉयफ्रेंड पसार! तरुणीचा दुर्दैवी अंत
9
कोच गंभीरमुळे हिटमॅन रोहितसह किंग कोहलीवर आली कसोटीतून निवृत्ती घेण्याची वेळ?
10
मोक्ष प्राप्तीच्या शोधात लंडनवरून काशीमध्ये आली ही मुस्लीम महिला; 27 वर्षांपूर्वी घडला होता मोठा अपराध, आता हिंदू धर्म स्वीकारला?
11
ना सिक्स पॅक अ‍ॅब्स ना फिल्मी बॅकग्राऊंड, बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर देणारा हा अभिनेता कोण?
12
शेअर बाजारात अप्पर सर्किट आणि लोअर सर्किट म्हणजे काय? त्याने काय फरक पडतो?
13
जम्मू काश्मीरमध्ये चकमक सुरु; सैन्याने लष्कर ए तोयबाच्या दहशतवाद्यांना घेरले, एक ठार
14
अखेर ट्रम्पनी नांगी टाकलीच; झोळीत काय हे न पाहताच चीनविरोधात उगाचच वटारलेले डोळे; वाचा इन्साईड स्टोरी
15
सूरजचे असंख्य चाहते असूनही 'झापुक झुपूक' अपयशी का झाला? अंकिता वालावलकर म्हणाली- "त्याचे फॅन.."
16
भारताच्या हल्ल्यात पाकचे ११ सैन्य अधिकारी ठार, ७८ हून अधिक जखमी; पाकिस्तानची कबुली
17
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा शोध सुरूच; नाक्यांवर लागले पोस्टर,माहिती देणाऱ्यास मिळणार २० लाखांचं बक्षीस
18
टाटाने आणले Altroz चे नवीन फेसलिफ्ट मॉडेल; मिळतील एकापेक्षा एक दमदार फिचर्स, पाहा...
19
Beed Crime: वाल्मीक कराडच्या दुसऱ्या मोठ्या टोळीवर MCOCA; खंडणी, मारहाण सारखे गुन्हे
20
शेपूट वाकडं ते...! भारतानं झोडल्यानंतर, पाकिस्तानी लष्करप्रमुखांची पहिली प्रतिक्रिया; झालेली बदनामी लपवण्याचा प्रयत्न, म्हणाले...

‘तंटामुक्त’ लोकचळवळ व्हावी

By admin | Updated: September 11, 2014 23:11 IST

बहुउद्देशीय मोहीम : खाडीपट्ट्यातील काही तंटामुक्त समित्या नावापुरत्या

खाडीपट्टा : गावागावात किरकोळ कारणावरून निर्माण होणारे वाद तंट्याचे रुप धारण करतात, असे तंटे समूळ नष्ट करण्यासाठी राज्य सरकारने काही वर्षांपूर्वी तंटामुक्त गाव मोहीम सुरु केली. आता सर्वच तंटे सोडवण्यासाठी ही समिती परिश्रम घेत आहे. मात्र, याला मर्यादा पडत आहेत. ही मोहीम लोकचळवळ म्हणून राबवल्यास गाव तंटामुक्त होण्यास अधिकच बळकटी येणार आहे. पूर्ववैमनस्य आणि किरकोळ मतभेदांमधून तंट्यांची निर्मिती होत असल्याचे गृहमंत्रालयाच्या निदर्शनास आले होते. त्यामुळे राज्य सरकारने आपल्या अखत्यारित बहुउद्देशीय अशी तंटामुक्त मोहीम सुरु केली. राज्यातील संपूर्ण गावे तंटामुक्त व्हावीत, हा त्यामागील हेतू होता. परंतु, ग्रामीण भागातील अनेक गावात तंटे आणि अवैध व्यवसाय राजरोस सुरु असतानाही केवळ बक्षिसाच्या लालसेपोटी पोलिसांच्या मदतीने खोटी कागदपत्र तयार करुन गाव तंटामुक्त झाल्याचे अहवाल शासन दरबारी सादर करण्यात आले. काही गावांमध्ये ग्रामस्थांनी सरपंचाविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. खाडीपट्ट्यातील बहुतांश तंटामुक्त समित्यांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे सदस्य काम करीत आहेत. एवढेच नव्हे तर या समित्यांमधील सदस्य नेमून दिलेल्या प्रवर्गामधील नसल्याचे आढळून आले आहे. हा प्रकार नागरिकांना असह्य होत आहे. मात्र, या साऱ्या प्रकाराबद्दल पोलिसांसह प्रशासनातील कोणतीही यंत्रणा तंटामुक्त समित्यांचा कारभार कोणत्या दिशेने चालला आहे, याची साधी चौकशी करीत नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. काही गावे तंटामुक्त गाव होण्यासाठी खडतर मेहनत घेत आहेत. मात्र हे प्रमाण खूपच कमी आहे. ज्या गावांना आणि तंटामुक्त समित्यांना पारितोषिके प्राप्त झाली आहेत. त्यांचा शासनाने एकदा सर्वे करण्याची मागणी होऊ लागली आहे. समाजातील कोणाही व्यक्तीचे आर्थिक नुकसान होऊ नये. कुटुंबाची, समाजाची व गावाची शांतता धोक्यात येऊ नये, यासाठी तंटे सामोपचाराने व आवश्यक अशा यंत्रणेमार्फत मिटविणे आवश्यक आहे. त्यानंतर नव्याने तंटे निर्माण होणार नाहीत, याची दक्षता घेणे हे मोहिमेचे तीन भाग आहेत. या तिन्ही भागांतील कार्यवाही व तंटे मिटवण्याची मोहीम ही लोकचळवळ म्हणून राबवली जावी. त्यामधून गावे तंटामुक्त व्हावीत, यासाठी मोहीम राबवल्यानंतर तंटामुक्त झालेल्या गावांना पुरस्काराने सन्मानित करण्यात येते. त्यामुळे महालोक अदालतीला तंटामुक्त समितीची सांगड घालून राबवल्यास अधिक चांगला प्रतिसाद मिळू शकतो. (वार्ताहर)समित्यांचे फलित काय ?गावात तंटे आणि अवैध धंदे सुरू असतानाही केवळ बक्षिसाच्या लालसेपोटी पोलिसांच्या मदतीने खोटी कागदपत्र बनवून गाव तंटामुक्त असल्याचा अहवाल शासन दरबारी सादर केल्याची अनेक उदाहरणे आहेत.काही गावांमध्ये तंटामुक्त समितीवर गुन्हेगारी प्रवृत्तीच्या सदस्यांचा समावेश असल्याचा आरोप.प्रशासनातील कोणत्याही यंत्रणेचे तंटामुक्त समितीकडे लक्ष नाही.