शहरं
Join us  
Trending Stories
1
"नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
2
"भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
3
“नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
4
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
5
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
6
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
7
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
8
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
9
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
10
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
11
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात
12
  ब्रिटनमध्ये ज्यूंच्या प्रार्थनास्थळावर भीषण हल्ला, २ जणांचा मृत्यू, तिघे गंभीर जखमी, संशयित ठार   
13
IND vs WI, 1st Test Day 1 Stumps : KL राहुल लंगडताना दिसला; कुलदीप पॅड बांधून बॅटिंगसाठी नटला,पण...
14
Manoj Jarange Patil : "मी थोड्या दिवसांचा पाहुणा..."; मनोज जरांगे पाटील यांना अश्रू अनावर, मराठ्यांना भावनिक साद
15
उल्हासनगरात गरब्याच्या ठिकाणी शिवसेना शाखाप्रमुखावर पिस्तूल रोखून गोळीबार करणारा गजाआड 
16
दसरा मेळाव्यात मनोज जरांगेंनी दिली पुढील आंदोलनाची हाक; म्हणाले, “सरकारला १ महिन्याची मुदत”
17
"सर्व प्रॉपर्टी देऊन टाका…!" निर्दयी सुनेची वृद्ध सासूला अमानुष मारहाण, केस ओढत केली शिवीगाळ; VIDEO पाहून तुमचाही संताप उडेल
18
Chaitanyananda Saraswati : डर्टी गेम! चैतन्यनंद सरस्वतीच्या मठात सेक्स टॉय, अश्लील CD; दिल्ली ते दुबईपर्यंत नेटवर्क
19
Zubeen Garg : स्कूबा डायव्हिंगमुळे नाही तर.... कसा झाला सिंगर झुबीन गर्गचा मृत्यू? आता मोठा खुलासा
20
VIDEO: बापरे... अगदी सहज उंच बिल्डिंगवरून तरूणाने स्विमिंग पूलमध्ये मारली उडी अन् मग...

राजापूर तालुक्यात केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, ...

राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, तालुक्यामध्ये केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. या रायपाटण कोविड केअर सेंटरची बेड क्षमता ही फक्त १०० रुग्णांची आहे़ अद्यापही रायपाटण व ओणी या ठिकाणी कोविड रुग्णालय प्रस्तावित आहे. ही दोन्ही कोविड रुग्णालये अद्यापही सुरू न झाल्याने तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे उपचार मिळताना राजापूर तालुक्यातील रुग्णांना विलंब होत आहे.

राजापूर तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा ताेकडी पडत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल हाेत आहेत़ मंगळवारअखेर राजापूर तालुक्यात १६६९ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे़ त्यातील ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण ७६८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असले तरी सध्या राजापूर तालुक्यात ८५६ रुग्ण कोरोनाचा सामना करत आहेत. तालुक्यातील भाैगोलिक परिस्थितीचा विचार करता बहुतांश भाग दुर्गम आहे़ त्यामुळे तिथपर्यंत आराेग्य यंत्रणा पाेहाेचण्यास उशीर हाेत आहे, तर रुग्णाला काेराेनाची लागण झाल्यास त्याला रुग्णालयापर्यंत दाखल करण्यास विलंब हाेत आहे़

प्रशासनाने नुकतेच तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेची मागणी लक्षात घेऊन धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे; पण अद्यापही त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वित झालेले नाही. धारतळे येथे केवळ २५ बेड क्षमता असणारे कोविड केअर सेंटर उभे राहणार आहे. सध्या राजापूर तालुक्यात ८५६ कोरोना रुग्ण कोरोनाचा सामना करत असताना तालुक्यातील सोयी- सुविधा तुटपुंज्याच आहेत.

लोकप्रतिनिधी मात्र कोविड हॉस्पिटलच्या घोषणा करण्यात गेल्या दोन महिन्यांपासून धन्यता मानत आहेत़ अद्यापही एकही कोरोना रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटही कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात तालुक्यात खासगी व सरकारी असे एकही कोरोना रुग्णालय नसल्यामुळे येथील जनतेला रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणांवर अवलंबून राहावे लागत आहे. राजापूर तालुक्यातील जनतेचे दरडोई उत्पन्नही फारच कमी असून, तालुका मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागास गटात मोडतो़ त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याइतकी क्षमता तालुक्यातील जनसामान्यांची नाही. परिणामी शासनाच्या रामभरोसे सेवेवरच कोरोना रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. घाेषणांशिवाय जनतेच्या पदरात काहीच पडलेले नसून, जनतेला जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे़