शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

राजापूर तालुक्यात केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, ...

राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, तालुक्यामध्ये केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. या रायपाटण कोविड केअर सेंटरची बेड क्षमता ही फक्त १०० रुग्णांची आहे़ अद्यापही रायपाटण व ओणी या ठिकाणी कोविड रुग्णालय प्रस्तावित आहे. ही दोन्ही कोविड रुग्णालये अद्यापही सुरू न झाल्याने तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे उपचार मिळताना राजापूर तालुक्यातील रुग्णांना विलंब होत आहे.

राजापूर तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा ताेकडी पडत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल हाेत आहेत़ मंगळवारअखेर राजापूर तालुक्यात १६६९ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे़ त्यातील ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण ७६८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असले तरी सध्या राजापूर तालुक्यात ८५६ रुग्ण कोरोनाचा सामना करत आहेत. तालुक्यातील भाैगोलिक परिस्थितीचा विचार करता बहुतांश भाग दुर्गम आहे़ त्यामुळे तिथपर्यंत आराेग्य यंत्रणा पाेहाेचण्यास उशीर हाेत आहे, तर रुग्णाला काेराेनाची लागण झाल्यास त्याला रुग्णालयापर्यंत दाखल करण्यास विलंब हाेत आहे़

प्रशासनाने नुकतेच तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेची मागणी लक्षात घेऊन धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे; पण अद्यापही त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वित झालेले नाही. धारतळे येथे केवळ २५ बेड क्षमता असणारे कोविड केअर सेंटर उभे राहणार आहे. सध्या राजापूर तालुक्यात ८५६ कोरोना रुग्ण कोरोनाचा सामना करत असताना तालुक्यातील सोयी- सुविधा तुटपुंज्याच आहेत.

लोकप्रतिनिधी मात्र कोविड हॉस्पिटलच्या घोषणा करण्यात गेल्या दोन महिन्यांपासून धन्यता मानत आहेत़ अद्यापही एकही कोरोना रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटही कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात तालुक्यात खासगी व सरकारी असे एकही कोरोना रुग्णालय नसल्यामुळे येथील जनतेला रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणांवर अवलंबून राहावे लागत आहे. राजापूर तालुक्यातील जनतेचे दरडोई उत्पन्नही फारच कमी असून, तालुका मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागास गटात मोडतो़ त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याइतकी क्षमता तालुक्यातील जनसामान्यांची नाही. परिणामी शासनाच्या रामभरोसे सेवेवरच कोरोना रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. घाेषणांशिवाय जनतेच्या पदरात काहीच पडलेले नसून, जनतेला जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे़