शहरं
Join us  
Trending Stories
1
Hindi Inclusion: राज्यात हिंदी सक्तीवरून वादंग, सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली!
2
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूर थांबविण्यामध्ये अमेरिकेचा कसलाच संबंध नाही!
3
आजचे राशीभविष्य - १९ जून २०२५, या राशीच्या व्यक्तींना सामाजिक आणि अन्य क्षेत्रांमध्ये प्रसिद्धी व प्रतिष्ठा लाभेल
4
Toll Pass: तीन हजारांत मिळणार टोलचा वार्षिक पास, आधीच्या फास्टॅगचे काय?
5
Beed: दिवसभर बसूनही कष्टाच्या ठेवी दिल्या नाहीत; शेतकऱ्याची मल्टिस्टेटसमोरच आत्महत्या!
6
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
7
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
8
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
9
आजचा अग्रलेख: हे प्रिय आकाशीच्या देवा...
10
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
11
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
12
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
13
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
14
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
15
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
16
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
17
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
18
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
19
विशेष लेख: बाय बाय अमेरिका, आम्ही चाललो!
20
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?

राजापूर तालुक्यात केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2021 04:32 IST

राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, ...

राजापूर : गतवर्षी कोरोनावर विजय मिळवणाऱ्या राजापूर तालुक्यात यावर्षी मात्र कोरोना रुग्णांची वाटचाल दोन हजारांकडे झपाट्याने सुरू आहे. मात्र, तालुक्यामध्ये केवळ एकच कोविड केअर सेंटर कार्यरत आहे. या रायपाटण कोविड केअर सेंटरची बेड क्षमता ही फक्त १०० रुग्णांची आहे़ अद्यापही रायपाटण व ओणी या ठिकाणी कोविड रुग्णालय प्रस्तावित आहे. ही दोन्ही कोविड रुग्णालये अद्यापही सुरू न झाल्याने तालुक्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांना जिल्हा कोविड रुग्णालयावरच अवलंबून राहावे लागत आहे. त्यामुळे उपचार मिळताना राजापूर तालुक्यातील रुग्णांना विलंब होत आहे.

राजापूर तालुक्यात काेराेना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे़ या रुग्णांवर उपचार करणारी यंत्रणा ताेकडी पडत आहे़ त्यामुळे ग्रामीण भागातील जनतेचे हाल हाेत आहेत़ मंगळवारअखेर राजापूर तालुक्यात १६६९ कोरोना रुग्णांची संख्या झाली आहे़ त्यातील ६८ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. आजपर्यंत एकूण ७६८ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले असले तरी सध्या राजापूर तालुक्यात ८५६ रुग्ण कोरोनाचा सामना करत आहेत. तालुक्यातील भाैगोलिक परिस्थितीचा विचार करता बहुतांश भाग दुर्गम आहे़ त्यामुळे तिथपर्यंत आराेग्य यंत्रणा पाेहाेचण्यास उशीर हाेत आहे, तर रुग्णाला काेराेनाची लागण झाल्यास त्याला रुग्णालयापर्यंत दाखल करण्यास विलंब हाेत आहे़

प्रशासनाने नुकतेच तालुक्यातील पश्चिम भागातील जनतेची मागणी लक्षात घेऊन धारतळे प्राथमिक आरोग्य केंद्रात कोविड केअर सेंटर उभारण्याचा निर्णय घेतला आहे; पण अद्यापही त्या ठिकाणी कोविड केअर सेंटर कार्यान्वित झालेले नाही. धारतळे येथे केवळ २५ बेड क्षमता असणारे कोविड केअर सेंटर उभे राहणार आहे. सध्या राजापूर तालुक्यात ८५६ कोरोना रुग्ण कोरोनाचा सामना करत असताना तालुक्यातील सोयी- सुविधा तुटपुंज्याच आहेत.

लोकप्रतिनिधी मात्र कोविड हॉस्पिटलच्या घोषणा करण्यात गेल्या दोन महिन्यांपासून धन्यता मानत आहेत़ अद्यापही एकही कोरोना रुग्णालय व ऑक्सिजन प्लांटही कार्यान्वित झालेला नाही. त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांचे हाल होत आहेत. त्यात तालुक्यात खासगी व सरकारी असे एकही कोरोना रुग्णालय नसल्यामुळे येथील जनतेला रत्नागिरी, मुंबई, कोल्हापूर आदी ठिकाणांवर अवलंबून राहावे लागत आहे. राजापूर तालुक्यातील जनतेचे दरडोई उत्पन्नही फारच कमी असून, तालुका मोठ्या प्रमाणावर आर्थिक मागास गटात मोडतो़ त्यामुळे खासगी रुग्णालयात जाऊन उपचार करण्याइतकी क्षमता तालुक्यातील जनसामान्यांची नाही. परिणामी शासनाच्या रामभरोसे सेवेवरच कोरोना रुग्णांना अवलंबून राहावे लागत आहे. घाेषणांशिवाय जनतेच्या पदरात काहीच पडलेले नसून, जनतेला जीव वाचविण्यासाठी धडपड करावी लागत आहे़