शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

जिल्ह्यात १४१ गावात रेशनच नाही

By admin | Updated: October 31, 2014 00:30 IST

प्रस्तावांना अल्प प्रतिसाद : महिलांचीही दुकाने चालवण्याकडे पाठ

रत्नागिरी : ‘प्रत्येक महसुली गावाला एक दुकान’ असा आदेश असला तरी शासनाच्या उदासीन धोरणामुळे नवीन दुकानांच्या प्रस्तावांना अल्प प्रतिसाद लाभत असून, आधीच मंजूर असलेल्या दुकानांपैकीही १४१ दुकाने रिक्त आहेत. महिला बचत गटांना प्राधान्य देण्यात येत असले तरी आर्थिक सक्षमतेचा अभाव आणि शासनाच्या धोरणातील त्रुटी यामुळे महिलाही दुकाने चालवण्यासाठी पुढे येण्यास अनुकूल नसल्याचे स्पष्ट झाले आहे.जिल्ह्यात पूर्वी ८९४ दुकाने मंजूर होती. त्यात आता २६ नवीन दुकानांची भर पडल्याने मंजूर दुकानांची संख्या ९२० इतकी झाली आहे. त्यापैकी सध्या १४१ दुकाने कायमस्वरूपी रिक्त आहेत. त्यामुळे सध्या ७७९ दुकाने कार्यरत आहेत. त्यापैकी ७३ दुकाने महिला बचत गट चालवत असून, ३३ दुकाने पुरूष बचत गट चालवत आहेत. ग्राहकांची गैरसोय होऊ नये म्हणून या रिक्त दुकानांपैकी ४३ दुकाने तात्पुरत्या व्यवस्थापनाखाली चालवायला दिलेली आहेत. उर्वरित ९८ दुकाने लगतच्या दुकानाला जोडलेली आहेत. जिल्ह्यात १५३६ महसुली गावे आहेत. शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक महसूल गावात रेशन दुकान असणे आवश्यक आहे. त्यासाठी २००७ साली शासनाने महिला बचत गटांना नवीन दुकाने चालविण्यास द्यावी, असा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार जिल्हा पुरवठा विभागाकडून नव्या दुकानांसाठी जाहीरनामे वारंवार काढण्यात आले होते. मात्र, त्याला अल्प प्रतिसाद मिळाला. त्याचे प्रमुख कारण म्हणजे येथील महिला बचत गटांचे अजूनही आर्थिकदृष्ट्या सक्षमीकरण झाले नसल्याने दुकान चालविण्याबाबत त्यांच्या मनात शंका आहे. त्यामुळे या दुकानांसाठी महिला बचत गट पुढे आले नाहीत. त्यामुळे शासनाने निर्णय बदलून समाजातील इतर घटकांना दुकाने चालविण्यास देण्याचा निर्णय घेतला. त्यातच शासनस्तरावर असणाऱ्या त्रुटींना तोंड देणे फार कठीण आहे. नैसर्गिक त्रुटी आणि घटीच्या बाबी शासन मानायला तयार नसल्याने आहे त्यापैकी काहींनी दुकाने बंद करून दुसरे व्यवसाय सुरू केले. याचा परिणाम नवीन दुकानांवर झाला असून ती चालविण्यासही पुढे येत नाहीत. सध्या ही रिक्त दुकाने शासनाने तात्पुरत्या व्यवस्थापनावर चालविण्यास दिली असली तरी या तात्पुरत्या चालविणाऱ्यांना कायमस्वरूपी दुकानांप्रमाणे कोणतेच लाभ मिळत नाहीत. त्यामुळे वर्षानुवर्षे ही दुकाने सांभाळणाऱ्या या व्यवस्थापनाला कायमस्वरूपी करण्याची मागणीही रास्तदर धान्य दुकान चालक - मालक जिल्हा संघटनेकडून गेल्या कित्येक वर्षापासून होत आहे.मात्र, शासन मूग गिळून राहिले आहे. त्यामुळे आता या दुकानदारांमध्येही नाराजी आहे. तसेच रिक्त ९८ दुकाने लगतच्या दुकानांना जोडल्याने या भागातील ग्रामस्थांना अनेक मैलांची पायपीट करत दुसऱ्या दुकानांमधून धान्य आणावे लागत आहे. त्यामुळे त्यांचीही गैरसोय होत आहे. विधानसभा निवडणुकीच्या धामधुमीत अडकलेल्या २६ नव्या दुकानांना आता दिवाळीनंतर मंजुरी मिळाली आहे. ही दुकाने आता लवकरच सुरू होणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील मंजूर दुकानांची संख्या आता ९२० इतकी झाली आहे. पुढच्या महिन्यात आणखी १५ नवीन दुकानांना मंजुरी मिळणार असून त्यामुळे हा प्रश्न काही अंशी सुटणार असल्याचे पुरवठा विभागाकडून सांगण्यात आले आहे. (प्रतिनिधी)४जिल्ह्यात १५३६ महसुली गावे.४शासनाच्या नियमाप्रमाणे प्रत्येक महसूल गावात रेशन दुकान असणे आवश्यक.४जिल्ह्यातील मंजूर दुकानांची संख्या आता ९२० इतकी.जिल्ह्यात महसुली गावाप्रमाणे मंजूर झालेली नवीन २६ रेशन दुकाने (तालुकानिहाय)तालुकागावेदापोली (४)असोंड, वडवली, कोंगळे, सातांबा खेड (९)होडखाड, उधळे खुर्द, दाभिळ, नीळीक, भिलारे आयनी, गुंदे गणवाल, वाळंजगाव, वेताळवाडी, तिसे खुर्द गुहागर (३)मुसलोंडी, भातगाव धक्का, खामशेत चिपळूण(२) वैजी, पाचाड संगमेश्वरतळवडे तर्फ देवरूख, मेढेतर्फ (६)फुणगूस, दाभोळे, कुटगिरी, अणदेरी, पाटगाव.लांजा (२)देवधेतर्फ बौद्धवाडी, नांदिवली. तालुकामंजूर दुकानेकार्यरत रिक्तपूर्वीचीनवीनकायमस्वरूपीमंडणगड४७०३३१४ दापोली १०८४८४२८खेड११६९११६०९चिपळूण६९३५६१६गुहागर१४५२१२९१८संगमेश्वर१२०६११९०७रत्नागिरी १३१०९५३६लांजा ६३२६१ ०४राजापूर९५०८६०९एकूण८९४२६७७९१४१येथील बचत गट आर्थिकदृष्ट्या अजूनही सक्षम नाहीत. त्यामुळे भागभांडवल जमा करून ते एकत्रित वापरण्याची मानसिकता त्यांच्यात निर्माण झालेली नाही. आपल्याला दुकान चालविताना तोटा झाला तर... ही भीती त्यांच्या मनात असते. भांडवलाचा प्रश्न सुटला तर त्यांच्या आर्थिक सक्षमतेचाही प्रश्न सुटेल.- अशोक कदम, जिल्हाध्यक्ष, रास्तदर धान्य दुकान चालक मालक संघटना, रत्नागिरी