शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

एक कोटीचा आराखडा अन् दमडीचीही नाही तरतूद!

By admin | Updated: May 31, 2016 00:35 IST

अर्जुना नदी खोरे : समृध्द अभियानाला निधीची प्रतीक्षा

राजापूर : अर्जुना नदी खोरे समृद्ध अभियानांतर्गत नदीकाठच्या २८ गावांच्या विकासासाठी तयार केलेला १ कोटी रुपयांच्या आराखड्यात निधीची तरतूदच न झाल्याने एका चांगल्या अभिनयाला खीळ बसली आहे.तालुक्याची जीवनदायी ठरलेली अर्जुना नदी पूर्व परिसरात अणुस्कुरा घाटाच्या कुशीत उगम पावते व नंतर ती पश्चिमेला अरबी समुद्रात जावून मिळते. जवळपास ७० ते ७५ कि. मी. तिचा प्रवास असून, तिच्या उभय काठावर सुमारे २८ गावे येतात. त्यामध्ये करक, पांगरीखुर्द, कारवली, पाटकरवाडी, पाचल बाजारवाडी, पेठवाडी, रायपाटण, टक्केवारी, बागवेवाडी, गांगणवाडी, येळवण, कोळवणखडी, मुसलमानवाडी, ठिकाणकोंड, उन्हाळे, दोनिवडे, शीळ, कोंड्येतर्फे राजापूर, परटवली, गोठणे दोनिवडे, हातवकरवाडी, चिखलगाव, पाजवेवाडी, मळेवाडी, आंगले, फुफेरे अशा गावांचा समावेश आहे.अर्जुनाच्या पुनरुज्जीवनातून तिच्या काठालगतच्या या सर्व गावांचा विकास करण्याचा निर्णय घेण्यात आला होता व त्यासाठी सुमारे १ कोटी रुपयांच्या खर्चाचा आराखडाही तयार करण्यात आला. तथापि, शासनाकडून या आराखड्यासाठी अद्यापही आवश्यक निधीची तरतूदच करण्यात आलेली नाही. यापूर्वी जाहीर झालेल्या राज्याच्या अर्थसंकल्पात त्याबाबत तरतुदीची अपेक्षा होती. पण ती पूर्ण झाली नाही. (प्रतिनिधी)शासनाच्या वाटाण्याच्या अक्षता...अर्जुना नदीच्या पुनरुज्जीवनासाठी मोठा गाजावाजा करण्यात आला. त्यासाठी जागतिक कीर्तीचे जलपुरुष व मेगॅसेसे पुरस्कार विजेते डॉ. राजेंद्रसिंह यांनाही तालुक्यात आणण्यात आले होते. त्यांच्या मार्गदर्शनाचा फायदा करुन देण्यात आला. पण एवढे होऊनही शासन मात्र उदासीनच राहिले आहे. स्वत: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खेडमध्ये नद्यांच्या पुनरुज्जीवनासाठी निधी अपूर्ण पडू देणार नाही, असे आश्वासन दिले होते. मात्र, त्यालाच शासनाने वाटाण्याच्या अक्षता लावल्या आहेत.