शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

राजापुरात काँग्रेसचे आंदोलन झालेच नाही

By admin | Updated: February 10, 2015 00:00 IST

समन्वयाचा अभाव : स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणतीच कल्पना नसल्याचे उघड

राजापूर : आपल्या कारभाराचे १०० दिवस पार करणाऱ्या फडणवीस सरकारच्या अपयशाविरुद्ध राज्यभर रास्तारोको करण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावरुन घेण्यात आला असताना, त्याबाबत राजापूर तालुका काँग्रेसलाच कोणत्या प्रकारची कल्पना न देण्यात आल्याने, ९ फेब्रुवारीला राजापुरात काँग्रेसचे रास्तारोको ओदोलन होऊच शकले नाही.राज्यातील सत्तांतरानंतर युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. सरकारने कारभाराचे शंभर दिवस ९ फेब्रुवारीला पार केले. मात्र या कालखंडात सरकारने समाधानकारक कामे केली नाहीत व सर्वच आघाड्यांवर ते सपशेल आपटले, अशी जोरदार टीका काँग्रेसकडून करण्यात आली. ९ फेब्रुवारीलाच या सरकारच्या कारभाराविरुद्ध ठिकठिकाणी रास्तारोको करण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरुन पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता व त्याबाबतच्या सूचना प्रत्येक जिल्हा व तालुका कार्यकारिणीला देण्याचे ठरले होते. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व राजापूरचे सुपुत्र हरीश रोग्ये यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर तुफान टीका केली होती. मात्र, या काँग्रेस प्रवक्त्यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कदाचित नियोजित आंदोलनाची माहिती न दिल्याने ९ तारखेचे आंदोलन होऊ शकले नाही.याबाबत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर हेच आंदोलनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसले. ८ फेब्रुवारीला रात्री त्यांना राजापूर पोलीस ठाण्याकडून आंदोलनाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी असे काही आंदोलन पक्षाने घेतले, त्याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्यामुळे तेच आश्चर्यचकीत झाले. वरिष्ठ पातळीवरुन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कसलीच कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे ९ तारखेला काँग्रेसचे कुणीही हजर राहिले नव्हते.देशभरामध्ये विविध निवडणुकांत सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसची अवस्था राजापूर तालुक्यातही फारच सोचनीय झाली आहे. नियोजित आंदोलनाची उशिरा खबर मिळून देखील त्यांनी आंदोलन न छेडणे यावरुन त्या पक्षाची झालेली जोरदार पिछेहाट दिसून आलीच. शिवाय पक्षांतर्गत नाती आलबेल नसल्याचेही पुढे आले आहे. या सर्व परिस्थितीत पक्षाची घसरण होत असल्याचेच पुढे येत आहे. (प्रतिनिधी)