शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेच्या पावसाळी अधिवेशनासाठी सरकारचा भरगच्च आर्थिक अजेंडा
2
भारताने पाकिस्तानला नकाशावरून हटवले असते; इंडोनेशियात खुलासा, अणुयुद्ध झाले असते तर काय घडलं असते?
3
हिंदीचे दोन्ही जीआर रद्द, त्रिभाषा सूत्राचा निर्णय घेण्यासाठी नवी समिती स्थापन
4
‘कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरण माध्यमांतूनच कळाले’
5
Today's Horoscope: आर्थिक बाबतीत मात्र सावध राहावे लागेल, काय सांगतेय तुमची राशी? 
6
गुंतवणुकीसाठी सुवर्णसंधी ! बाजारात ७ आयपीओ होणार खुले; योग्य कंपनी निवडल्यास होऊ शकतो फायदा
7
भाजपच्या नव्या अध्यक्षांची निवड लवकरच; प्रधान आघाडीवर, पावसाळी अधिवेशनापूर्वी प्रक्रिया होऊ शकते पूर्ण
8
राज्य सरकारला घेरण्याची विरोधी पक्षांची रणनीती; मविआचा सरकारच्या चहा पानावर बहिष्कार, जनतेला वाऱ्यावर सोडले
9
प्रशासकीय सीमा ३१ डिसेंबरला होणार ‘फ्रीझ’, जनगणना : नंतर होणार नाही नवे गाव, जिल्हा, महापालिका
10
विकले जात राहणे हेच पाकिस्तानचे नशीब
11
अधिवेशनाकडून अपेक्षा; विरोधक हिंदीच्या मुद्द्यावरून अधिवेशनापूर्वीच एकवटले
12
कार्ला येथील एकवीरा मंदिरात ड्रेसकोड; ७ जुलैपासून नव्या नियमांची अंमलबजावणी
13
लुटालुटीला आरटीओची मूक संमती? अधिकृत रिक्षा स्टॅंडवर दरपत्रकच नाही; कल्याण आरटीओ क्षेत्रातील वास्तव
14
मुंबई काँग्रेसबद्दल दिल्लीत आज काही निर्णय होईल का?
15
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
16
एअर इंडियाच्या विमानात समस्या, टोकियोहून दिल्लीला जाणाऱ्या विमानाचे कोलकात्यात इमरजन्सी लँडिंग
17
रेल्वे प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! आता रिझर्वेशन चार्ट तयार होणार रेल्वे सुटण्याच्या 8 तास आधी; हे नियमही बदलणार
18
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
19
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
20
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 

राजापुरात काँग्रेसचे आंदोलन झालेच नाही

By admin | Updated: February 10, 2015 00:00 IST

समन्वयाचा अभाव : स्थानिक पदाधिकाऱ्यांना कोणतीच कल्पना नसल्याचे उघड

राजापूर : आपल्या कारभाराचे १०० दिवस पार करणाऱ्या फडणवीस सरकारच्या अपयशाविरुद्ध राज्यभर रास्तारोको करण्याचा निर्णय काँग्रेसच्या वरिष्ठ स्तरावरुन घेण्यात आला असताना, त्याबाबत राजापूर तालुका काँग्रेसलाच कोणत्या प्रकारची कल्पना न देण्यात आल्याने, ९ फेब्रुवारीला राजापुरात काँग्रेसचे रास्तारोको ओदोलन होऊच शकले नाही.राज्यातील सत्तांतरानंतर युतीचे सरकार राज्यात सत्तेवर आले. सरकारने कारभाराचे शंभर दिवस ९ फेब्रुवारीला पार केले. मात्र या कालखंडात सरकारने समाधानकारक कामे केली नाहीत व सर्वच आघाड्यांवर ते सपशेल आपटले, अशी जोरदार टीका काँग्रेसकडून करण्यात आली. ९ फेब्रुवारीलाच या सरकारच्या कारभाराविरुद्ध ठिकठिकाणी रास्तारोको करण्याचा निर्णय पक्षाच्या वरिष्ठ स्तरावरुन पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला होता व त्याबाबतच्या सूचना प्रत्येक जिल्हा व तालुका कार्यकारिणीला देण्याचे ठरले होते. त्यानुसार काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते व राजापूरचे सुपुत्र हरीश रोग्ये यांनी राजापुरात पत्रकार परिषद घेऊन फडणवीस सरकारवर तुफान टीका केली होती. मात्र, या काँग्रेस प्रवक्त्यांनी आपल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना कदाचित नियोजित आंदोलनाची माहिती न दिल्याने ९ तारखेचे आंदोलन होऊ शकले नाही.याबाबत तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र नागरेकर हेच आंदोलनाबाबत अनभिज्ञ असल्याचे दिसले. ८ फेब्रुवारीला रात्री त्यांना राजापूर पोलीस ठाण्याकडून आंदोलनाबाबत विचारणा करण्यात आली. त्यावेळी असे काही आंदोलन पक्षाने घेतले, त्याची त्यांना पुसटशी देखील कल्पना नव्हती. त्यामुळे तेच आश्चर्यचकीत झाले. वरिष्ठ पातळीवरुन पक्ष पदाधिकारी व कार्यकर्ते यांना कसलीच कल्पना दिली गेली नाही. त्यामुळे ९ तारखेला काँग्रेसचे कुणीही हजर राहिले नव्हते.देशभरामध्ये विविध निवडणुकांत सातत्याने पराभवाचा सामना करणाऱ्या काँग्रेसची अवस्था राजापूर तालुक्यातही फारच सोचनीय झाली आहे. नियोजित आंदोलनाची उशिरा खबर मिळून देखील त्यांनी आंदोलन न छेडणे यावरुन त्या पक्षाची झालेली जोरदार पिछेहाट दिसून आलीच. शिवाय पक्षांतर्गत नाती आलबेल नसल्याचेही पुढे आले आहे. या सर्व परिस्थितीत पक्षाची घसरण होत असल्याचेच पुढे येत आहे. (प्रतिनिधी)