शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर भारनियमनाचे संकट नाही

By admin | Updated: June 4, 2016 00:26 IST

महावितरणची माहिती : कोयनेतील पाणीसाठा १३ टीएमसी

रत्नागिरी : कोयना धरणातील पाणीसाठा केवळ १३ टीएमसी इतका आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होणार असला तरी राज्यावर भारनियमनाचे संकट नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.कोयना धरणाच्या पाण्याची क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. जलविद्युत प्रकल्पातून १९२० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते; परंतु गतवर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने सद्य:स्थितीत पाणी केवळ १३ टीमसी इतकेच शिल्लक राहिले आहे. पैकी चार टीएमसी हा मृत पाणीसाठा आहे, तर उर्वरित नऊ टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आल्याने वीजनिर्मिती होऊ शकणार नाही. सद्य:स्थितीत केवळ ४० मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती कोयना एक व दोन प्रकल्पांतून होत आहे.नाशिक येथे ४६१, कोराडी ७४७, खापरखेडा ९३५, पारस ३६५, चंद्रपूर १३२९, भुसावळ ९५८, उरण येथील गॅस प्रकल्पातून २३२, कोयना प्रकल्प एक व दोनमधून ४०, साखरी येथील सौरऊर्जा प्रकल्पातून ९०, खासगी प्रकल्पातून ४२४९, केंद्रीय प्रकल्पातून ६९६४ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. परळी येथील प्रकल्प गेले दहा महिने बंद असल्याने वीजनिर्मिती होत नाही, तर गुहागर येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पातून ३५० मेगावॅट वीजनिर्मिती होते. मात्र, ती कोकण रेल्वेसाठी देण्यात येते. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसी, पंखे, कूलरचा वापर वाढला आहे. त्यासाठी विजेची मागणी वाढत असली तरी नियोजनबद्ध पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागणार नाही. पावसाने गुरुवारी हजेरी लावली आहे. त्यामुळे दररोज पाऊस सुरू झाला तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते किंबहुना हवेत गारवा निर्माण झाला तर मागणीवरही परिणाम होईल. गेली दोन वर्षे भारनियमन करण्यात आलेले नाही. आकस्मिक भारनियमन गतवर्षी करण्यात आले होते. मात्र, यावर्षी तेही करण्यात आलेले नाही. भविष्यातही करावे लागणार नसल्याचे महावितरणने सांगितले आहे. (प्रतिनिधी)आकस्मिक परिस्थितीवेळीतातडीचे नियोजनवाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. सध्या १८ हजार ४७६ मेगावॅट इतकी विजेची गरज असून, संपूर्ण राज्यात १६ हजार ३७० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी २ हजार १०६ मेगावॅटचा फरक असला तरी अद्याप राज्यावर भारनियमनाचे संकट नाही. भविष्यात आणखी मागणी वाढली तरी संकट ओढवणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणने आकस्मिक परिस्थितीसाठी तातडीच्या वीजपुरवठ्याचे नियोजन केले आहे.