शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

राज्यावर भारनियमनाचे संकट नाही

By admin | Updated: June 4, 2016 00:26 IST

महावितरणची माहिती : कोयनेतील पाणीसाठा १३ टीएमसी

रत्नागिरी : कोयना धरणातील पाणीसाठा केवळ १३ टीएमसी इतका आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होणार असला तरी राज्यावर भारनियमनाचे संकट नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.कोयना धरणाच्या पाण्याची क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. जलविद्युत प्रकल्पातून १९२० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते; परंतु गतवर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने सद्य:स्थितीत पाणी केवळ १३ टीमसी इतकेच शिल्लक राहिले आहे. पैकी चार टीएमसी हा मृत पाणीसाठा आहे, तर उर्वरित नऊ टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आल्याने वीजनिर्मिती होऊ शकणार नाही. सद्य:स्थितीत केवळ ४० मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती कोयना एक व दोन प्रकल्पांतून होत आहे.नाशिक येथे ४६१, कोराडी ७४७, खापरखेडा ९३५, पारस ३६५, चंद्रपूर १३२९, भुसावळ ९५८, उरण येथील गॅस प्रकल्पातून २३२, कोयना प्रकल्प एक व दोनमधून ४०, साखरी येथील सौरऊर्जा प्रकल्पातून ९०, खासगी प्रकल्पातून ४२४९, केंद्रीय प्रकल्पातून ६९६४ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. परळी येथील प्रकल्प गेले दहा महिने बंद असल्याने वीजनिर्मिती होत नाही, तर गुहागर येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पातून ३५० मेगावॅट वीजनिर्मिती होते. मात्र, ती कोकण रेल्वेसाठी देण्यात येते. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसी, पंखे, कूलरचा वापर वाढला आहे. त्यासाठी विजेची मागणी वाढत असली तरी नियोजनबद्ध पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागणार नाही. पावसाने गुरुवारी हजेरी लावली आहे. त्यामुळे दररोज पाऊस सुरू झाला तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते किंबहुना हवेत गारवा निर्माण झाला तर मागणीवरही परिणाम होईल. गेली दोन वर्षे भारनियमन करण्यात आलेले नाही. आकस्मिक भारनियमन गतवर्षी करण्यात आले होते. मात्र, यावर्षी तेही करण्यात आलेले नाही. भविष्यातही करावे लागणार नसल्याचे महावितरणने सांगितले आहे. (प्रतिनिधी)आकस्मिक परिस्थितीवेळीतातडीचे नियोजनवाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. सध्या १८ हजार ४७६ मेगावॅट इतकी विजेची गरज असून, संपूर्ण राज्यात १६ हजार ३७० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी २ हजार १०६ मेगावॅटचा फरक असला तरी अद्याप राज्यावर भारनियमनाचे संकट नाही. भविष्यात आणखी मागणी वाढली तरी संकट ओढवणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणने आकस्मिक परिस्थितीसाठी तातडीच्या वीजपुरवठ्याचे नियोजन केले आहे.