शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election Results 2025: भाजपाचं 'शतक', ठाकरेसेना सगळ्यात मागे; सर्वाधिक नगराध्यक्ष कुणाचे? शिंदे-अजितदादांमध्ये 'टफ फाइट'
2
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 : 'एकदम ओक्के'! सर्वांनी एकट पाडलं, पण शहाजीबापूंनी मैदान मारलं; सांगोल्यात शिवसेनेचा मोठा विजय
3
Kankavali Nagar Parishad Election Result 2025: कणकवलीत भाजपा मंत्री नितेश राणेंना मोठा धक्का; शहर विकास आघाडीचे संदेश पारकर विजयी
4
Georai Nagar Parishad Election Result 2025: गेवराईत भाजपचे कमळ फुलले; नगराध्यक्षपदाच्या उमेदवार गीता पवार विजयी
5
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: ईश्वरपूरमध्ये जयंत पाटलांचा महायुतीला मोठा धक्का; एका क्लिकवर वाचा निकाल
6
क्रूरतेचा कळस! कोंबडा बनवलं, नाक घासायला लावलं...; कचरा वेचणाऱ्या मुलांना अमानुषपणे मारलं
7
Dharangoan Nagar Parishad Election Result 2025 : शिंदेसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांना होमपीचवर मोठा धक्का; मविआ उमेदवाराचा मोठा विजय
8
Jawhar Nagar Parishad Election Result 2025: जव्हार नगरपरिषदेवर भाजपचा भगवा, १४ जागांवर उधळला गुलाल, पूजा उदावंत नगरध्यक्ष; शिंदे सेनेला फक्त एवढ्या जागा
9
बँका तुम्हाला क्रेडिट कार्ड घेण्यासाठी का आग्रह धरतात? कुठून होते त्यांची खरी कमाई?
10
Newasa Nagar Panchayat Elections Results 2025 : नेवासामध्ये शिंदेंच्या शिवसेनेचा नगराध्यक्ष, तर शंकरराव गडाखांचा दबदबा कायम
11
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर अष्टविनायक कृपा, सरकारी नोकरी योग; अडकलेले पैसे येतील, धनलाभ!
12
Vengurla Nagar Parishad Election Result 2025: दीपक केसरकरांना धक्का, वेंगुर्ल्यात भाजपाचा ७ जागांवर विजय; शिंदेसेनेला मिळाली १ जागा
13
'देश सोडू नका, अन्यथा परतणे कठीण'; अमेरिकेत नोकरी करणाऱ्या भारतीयांना गुगलचा इशारा!
14
इराणवर मोठ्या हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल? नेतन्याहू घेणार डोनाल्ड ट्रम्प यांची भेट; इराणी अधिकारी म्हणतात...
15
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
16
Video - फिरायला निघाले, ट्रेनमध्ये भांडले अन् साता जन्माची साथ २ महिन्यांत सुटली, कपलसोबत काय घडलं?
17
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
18
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
19
BSF काँस्टेबल भरतीत माजी अग्निवीरांना 50% आरक्षण; वयोमर्यादेतही मोठी सवलत, केंद्राचा निर्णय
20
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

राज्यावर भारनियमनाचे संकट नाही

By admin | Updated: June 4, 2016 00:26 IST

महावितरणची माहिती : कोयनेतील पाणीसाठा १३ टीएमसी

रत्नागिरी : कोयना धरणातील पाणीसाठा केवळ १३ टीएमसी इतका आहे. त्यामुळे वीजनिर्मितीवर परिणाम होणार असला तरी राज्यावर भारनियमनाचे संकट नसल्याची माहिती महावितरणच्या सूत्रांनी दिली आहे. सध्या मागणीप्रमाणे वीजपुरवठा सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे.कोयना धरणाच्या पाण्याची क्षमता १०५ टीएमसी इतकी आहे. जलविद्युत प्रकल्पातून १९२० मेगावॅट इतकी वीजनिर्मिती होते; परंतु गतवर्षी सरासरीपेक्षा निम्मा पाऊस झाल्याने सद्य:स्थितीत पाणी केवळ १३ टीमसी इतकेच शिल्लक राहिले आहे. पैकी चार टीएमसी हा मृत पाणीसाठा आहे, तर उर्वरित नऊ टीएमसी पाणीसाठा पूर्वेकडील सिंचनासाठी राखीव ठेवण्यात आल्याने वीजनिर्मिती होऊ शकणार नाही. सद्य:स्थितीत केवळ ४० मेगावॅट इतकीच वीजनिर्मिती कोयना एक व दोन प्रकल्पांतून होत आहे.नाशिक येथे ४६१, कोराडी ७४७, खापरखेडा ९३५, पारस ३६५, चंद्रपूर १३२९, भुसावळ ९५८, उरण येथील गॅस प्रकल्पातून २३२, कोयना प्रकल्प एक व दोनमधून ४०, साखरी येथील सौरऊर्जा प्रकल्पातून ९०, खासगी प्रकल्पातून ४२४९, केंद्रीय प्रकल्पातून ६९६४ मेगावॅट वीजनिर्मिती सुरू आहे. परळी येथील प्रकल्प गेले दहा महिने बंद असल्याने वीजनिर्मिती होत नाही, तर गुहागर येथील रत्नागिरी गॅस प्रकल्पातून ३५० मेगावॅट वीजनिर्मिती होते. मात्र, ती कोकण रेल्वेसाठी देण्यात येते. वाढत्या उष्म्यामुळे अंगाची लाहीलाही होत असल्याने एसी, पंखे, कूलरचा वापर वाढला आहे. त्यासाठी विजेची मागणी वाढत असली तरी नियोजनबद्ध पुरवठा करण्यात येत आहे. त्यामुळे भारनियमन करावे लागणार नाही. पावसाने गुरुवारी हजेरी लावली आहे. त्यामुळे दररोज पाऊस सुरू झाला तर पाण्याच्या पातळीत वाढ होऊ शकते किंबहुना हवेत गारवा निर्माण झाला तर मागणीवरही परिणाम होईल. गेली दोन वर्षे भारनियमन करण्यात आलेले नाही. आकस्मिक भारनियमन गतवर्षी करण्यात आले होते. मात्र, यावर्षी तेही करण्यात आलेले नाही. भविष्यातही करावे लागणार नसल्याचे महावितरणने सांगितले आहे. (प्रतिनिधी)आकस्मिक परिस्थितीवेळीतातडीचे नियोजनवाढत्या उष्म्यामुळे विजेची मागणी वाढली आहे. सध्या १८ हजार ४७६ मेगावॅट इतकी विजेची गरज असून, संपूर्ण राज्यात १६ हजार ३७० मेगावॅट विजेची निर्मिती होत आहे. मागणीप्रमाणे पुरवठा करण्यासाठी २ हजार १०६ मेगावॅटचा फरक असला तरी अद्याप राज्यावर भारनियमनाचे संकट नाही. भविष्यात आणखी मागणी वाढली तरी संकट ओढवणार नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे. महावितरणने आकस्मिक परिस्थितीसाठी तातडीच्या वीजपुरवठ्याचे नियोजन केले आहे.