शहरं
Join us  
Trending Stories
1
...म्हणूनच पाक बिथरला! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये टॉप ५ दहशतवादांचा खात्मा; कोण आहेत ते?
2
'जर भारताने हल्ले थांबवले, तर आम्हीही आताच थांबवू', पाकिस्तानचे उप पंतप्रधान इशाक डार यांचा कांगावा
3
मोठ्या विक्रीदरम्यान रेखा झुनझुनवालांची चांदी, २ शेअर्समधून झाला ८९२ कोटी रुपयांचा फायदा; तुमच्याकडे आहे का?
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमाचं पोस्टर पाहून भडकले नेटकरी, दिग्दर्शकाने माफी मागत दिले स्पष्टीकरण
5
"दहशतवाद्यांनी भरलेला देश..", कंगनाचं पाकिस्तानवर टीकास्त्र, म्हणाली - जगाच्या नकाशातून मिटवलं पाहिजे...
6
Sofia Qureshi : Video - "माझ्या सुनेचा मला अभिमान, ६ महिन्यांपूर्वी..."; कर्नल सोफिया कुरेशी यांचे सासरे भावुक
7
Weather Update : वेळेआधीच मान्सून धडकणार! कधी सुरू होणार पाऊस?हवामान विभागाने सांगितली तारीख
8
India Pakistan Tension : भारताने पाकिस्तानच्या 'या' ३ एअरबेसवरच हल्ला का केला? जाणून घ्या यामागची रणनीती
9
पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड! भारतातील उधमपूर बेस उद्ध्वस्त केल्याचा दावा निघाला खोटा
10
"मुस्लिम नवऱ्याला सोडून दे", पाकिस्तानी युजरचा देवोलिनाला सल्ला; सडेतोड उत्तर देत म्हणाली...
11
Swiggy Q4 Results: इन्स्टामार्ट ठरतंय स्विगीसाठी डोकेदुखी, हजारो कोटींचं केलं नुकसान; जाणून घ्या
12
Anushka Sharma : अनुष्का शर्मा ११ वर्षांची असताना वडील लढलेले कारगिल युद्ध; घरी आईची असायची 'अशी' अवस्था
13
अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेची बैठक बोलावल्याचं वृत्त पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांनी नाकारलं! ख्वाजा असिफ म्हणाले... 
14
India Pakistan Tension: पाकिस्तानने किती वाजता केला हायस्पीड मिसाईल हल्ला? लष्कराने सांगितलं ९-१० मेच्या रात्री काय घडलं?
15
India Pakistan: दहशतवाद्यांच्या अड्ड्यांमधून नुसता धूर; लष्कराने सीमेवरील लॉन्च पॅड्स केले उद्ध्वस्त; व्हिडीओही दाखवला
16
वृद्धापकाळात दर महिन्याला मिळतील ₹५०००; मोदी सरकारच्या या स्कीममध्ये मिळतेय संधी
17
Fake News Alert : पाकिस्तानच्या सायबर हल्ल्यानंतर वीज पुरवठा होणार खंडित? सरकारने लोकांना सांगितलं 'सत्य'
18
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या गोळीबारात भारताचे आठ जवान जखमी
19
पाकिस्तानने खरंच भारताच्या स्क्वाड्रन लीडर शिवानी सिंह यांना पकडलं का? सरकारकडून महत्त्वाचा खुलासा
20
...तर पाकिस्तानला बसेल मोठा फटका, सोन्याचे भांडार हातातून जाईल; किती मोठी आहे इकॉनॉमी?

गतवर्षीपेक्षा टंचाई कमी

By admin | Updated: March 31, 2015 00:22 IST

थोडा दिलासा : अवकाळी पावसाचा असाही परिणाम

रत्नागिरी : अवकाळी पाऊस पडल्याने गतवर्षीपेक्षा यंदा पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. चालू आठवड्यामध्ये जिल्ह्यात केवळ ४ गावातील ४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु असून, त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवाड्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून कित्येक मैल पायपीट करावी लागते़ येथील जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत़जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही खडकाळ भागामुळे पाणी जमिनीत न मुरता नदी, नाल्यांद्वारे ते समुद्राला मिळते. त्यामुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे़ त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला तो काही प्रमाणात जनतेची तहान भागविणारा ठरला आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाल्याने लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे. अवकाळी पावसाचा परिणाम पाणीटंचाई कमी होण्यावर झाला आहे. आजच्या पाणीटंचाईची स्थिती पाहता गतवर्षीपेक्षा यंदा टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांची संख्या कमी आहे. गतवर्षी ७ गावांतील ७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. चालू स्थितीत जिल्ह्यात केवळ ४ गावातील ४ वाड्यांमध्येच भीषण पाणीटंचाई सुरु आहे. टंचाईग्रस्तांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. त्यामुळे शासनाकडून टंचाईग्रस्तांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यासाठी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. (शहर वार्ताहर)