शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठीशी तडजोड चालणार नाही! राजकीय लेबलं लावू नका, याकडे संकट म्हणून पाहा; राज ठाकरेंनी ठणकावलं
2
"ठाकरे बंधूंच्या ताकदीपुढे सरकारनं माघार घेतली; ही विजयाची पहिली पायरी, यापुढे..."
3
"मराठी बोला तुम्ही मराठी बोला...", मुंबईच्या लोकलमध्ये तरुणाईचा गजर, व्हिडिओ होतोय तुफान व्हायरल!
4
येत्या ७ जुलैला सार्वजनिक सुट्टी मिळणार? सोमवारी जाहीर झाली तर काय काय बंद असणार...
5
तेलंगणात रसायनांनी भरलेल्या टँकरचा स्फोट, किमान १० कामगारांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
6
मर्यादेपेक्षाही अधिक महाग होणार चांदी; रॉबर्ड कियोसाकी यांच्या दाव्यात किती तथ्य?
7
दरोडा, खून...महाराष्ट्रासह चार राज्यांमध्ये १६ गंभीर गुन्हे; कुख्यात गुंडाचा उत्तर प्रदेशात एन्काउंटर
8
HDB Financial Services IPO : १२,५०० कोटींचा HDB Financial IPO हिट, बंपर प्रतिसाद; अलॉटमेंट कसं चेक कराल?
9
पुण्यातील लोणी काळभोरमध्ये लागले इराणचे झेंडे, खामेनींचे फ्लेक्स; Video व्हायरल...
10
तुमच्या गृहकर्जाचा हप्ता ४००० रुपयांनी होईल स्वस्त; बँक बदला आणि लाखो रुपये वाचवा! ही आहे पद्धत
11
"मी कितीही स्पष्टीकरण दिलं तरी...", ऐश्वर्यासोबत घटस्फोटाच्या चर्चांवर अभिषेक बच्चनने सोडलं मौन
12
ढगफुटी झाली आणि पूर आला; गाडी नदीत अडकता ड्रायव्हर चढला टपावर, पुढे काय झालं?
13
बँका तुमचं काम करत नाहीयेत, टेन्शन कशाला? RBI नं दिलीये सुविधा; 'इकडे' करू शकता त्यांची तक्रार
14
Ashadh Ritual 2025: आषाढात लेकीला माहेरी बोलावण्याची पूर्वापार प्रथा, केला जातो 'असा' कौतुक सोहळा!
15
Video:"...आता मला काय विचारताय तुम्ही"; एकनाथ शिंदे चंद्रशेखर बावनकुळेंवर का संतापले?
16
रतन टाटांनी करिअरची सुरुवात केलेल्या कंपनीला १००० कोटींची नोटीस! समोर आले धक्कादायक कारण
17
'मला न्याय हवा', खा. चंद्रशेखर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करणाऱ्या तरुणीचे PM मोदींना पत्र
18
PF मधून पैसे काढायचेत? पहिले जाणून घ्या तुमच्या कंपनीनं केलंय की नाही 'हे' काम? नाहीतर क्लेम होईल रिजेक्ट
19
Job Alert: पाच अशा नोकऱ्या, ज्या येत्या काळात संपून जातील; वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा इशारा
20
कॅनरा बँकेतील सोन्यावर मारला डल्ला, ५३.२६ कोटींची चोरी; शाखा मॅनेजरच निघाला मुख्य सूत्रधार

गतवर्षीपेक्षा टंचाई कमी

By admin | Updated: March 31, 2015 00:22 IST

थोडा दिलासा : अवकाळी पावसाचा असाही परिणाम

रत्नागिरी : अवकाळी पाऊस पडल्याने गतवर्षीपेक्षा यंदा पाणी टंचाईग्रस्त गावांची संख्या कमी आहे. चालू आठवड्यामध्ये जिल्ह्यात केवळ ४ गावातील ४ वाड्यांमध्ये पाणीटंचाई सुरु असून, त्यांना टँकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. डोंगरकपारीत वसलेल्या धनगरवाड्यांना दरवर्षी उन्हाळ्यात भीषण पाणीटंचाईला सामोरे जावे लागते़ त्यामुळे धनगरवाड्यांतील जनतेला कळशीभर पाण्यासाठी डोंगरदऱ्यातून कित्येक मैल पायपीट करावी लागते़ येथील जनावरांनाही पाणी मिळत नसल्याने ती तडफडू लागली आहेत़जिल्ह्यात दरवर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडूनही खडकाळ भागामुळे पाणी जमिनीत न मुरता नदी, नाल्यांद्वारे ते समुद्राला मिळते. त्यामुळे येथे भीषण पाणीटंचाई उद्भवत आहे़ त्यावर ठोस उपाययोजना करणे आवश्यक आहे. मात्र, त्याकडे गांभिर्याने पाहिले जात नाही. फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात जिल्ह्यात अवकाळी पाऊस पडला तो काही प्रमाणात जनतेची तहान भागविणारा ठरला आहे. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली होती. या पावसाने अनेक ठिकाणी पडझड झाल्याने लाखो रुपयांचे नुकसानही झाले आहे. अवकाळी पावसाचा परिणाम पाणीटंचाई कमी होण्यावर झाला आहे. आजच्या पाणीटंचाईची स्थिती पाहता गतवर्षीपेक्षा यंदा टंचाईग्रस्त गावांतील वाड्यांची संख्या कमी आहे. गतवर्षी ७ गावांतील ७ वाड्यांमध्ये भीषण पाणीटंचाई उद्भवली होती. चालू स्थितीत जिल्ह्यात केवळ ४ गावातील ४ वाड्यांमध्येच भीषण पाणीटंचाई सुरु आहे. टंचाईग्रस्तांना टँकरद्वारे पाणी पुरवठा करण्यात येत आहे. मात्र, तोही अपुरा पडत असल्याने या टंचाईग्रस्तांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे. तसेच जनावरांचीही पाण्यासाठी तडफड होत आहे. त्यामुळे शासनाकडून टंचाईग्रस्तांना पुरेसा पाणी पुरवठा व्हावा, यासाठी तोडगा काढावा, अशी मागणी होत आहे. (शहर वार्ताहर)