शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
3
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
4
'अल्लाह हू अकबर' म्हणणारा व्यक्ती एनआयएच्या रडारवर; व्हिडीओ समोर आल्यानंतर पाठवले समन्स
5
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
6
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
7
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
8
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
9
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
10
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण
11
२६ निष्पाप लोकांना मारणारा हाशिम मुसा निघाला स्पेशल पॅरा कमांडो; हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचा सहभाग असल्याची शंका
12
भारताच्या प्रतिका रावलने एकदिवसीय क्रिकेटमध्ये रचला इतिहास, केली 'अशी' कामगिरी!
13
CMF Phone 2 Pro लाँच, किंमत एवढी स्वस्त की...; या रेंजमध्ये पहिल्यांदाच टेलिफोटो कॅमेरा सेटअप...
14
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला करतात चैत्र गौरीची पाठवणी; पण कशी? जाणून घ्या!
15
मोफत रेशनचा लाभ घेणाऱ्यांसाठी शेवटची संधी? हे काम आजच करा अन्यथा कार्डवरुन नाव वगळणार
16
प्रत्येक भारतीयाला संताप, संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा; राहुल गांधी, खरगेंची मोदींकडे मागणी
17
मराठमोळ्या अभिनेत्रीने अमेरिकेत बनवलं पापड आणि कुरडई, व्हिडीओ केला शेअर
18
मुकेश अंबानींनी जगातील अब्जाधीशांना टाकलं मागे, एका दिवसात कमावले ₹४४,२९३ कोटी रुपये
19
Vaibhav Suryavanshi : "आई ३ तास ​​झोपायची, वडिलांनी नोकरी सोडली...", वैभव सूर्यवंशीने सांगितला IPL पर्यंतचा प्रवास
20
काश्मीरमध्ये ४८ पर्यटन स्थळे बंद; दहशतवाद्यांची घरे पाडल्यामुळे स्लिपर सेलकडून मोठ्या हल्ल्याची शक्यता

...तर १५ ऑगस्ट रोजी कुटुंबासह आत्मदहन करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:35 IST

...तर १५ ऑगस्ट रोजी कुटुंबासह आत्मदहन करणार - आरोग्यसेवक परीक्षा पास झालेल्या दहा फवारणी कर्मचाऱ्यांचा इशारा लाेकमत न्यूज नेटवर्क ...

...तर १५ ऑगस्ट रोजी कुटुंबासह आत्मदहन करणार

- आरोग्यसेवक परीक्षा पास झालेल्या दहा फवारणी कर्मचाऱ्यांचा इशारा

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : राज्य सरकारने २८ फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेला आरोग्य भरतीचा निकाल तब्बल चार महिन्यांनंतर जाहीर केला आहे. या निकालामध्ये जिल्ह्यातील दहा हंगामी कर्मचारी पास झाले आहेत. मात्र, बीड व इतर ठिकाणाहून हंगामी कर्मचारी असल्याचे बोगस प्रमाणपत्रधारक उमेदवार मोठ्या प्रमाणात आल्यामुळे जिल्ह्यातील एकही उमेदवार अंतिम यादीमध्ये येऊ शकलेला नाही, असा आरोप आराेग्यसेवक परीक्षा पास झालेल्या कर्मचाऱ्यांनी केला आहे. याबाबतचे निवेदन त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे दिले आहे. याविषयी वेळीच न्याय न मिळाल्यास १५ ऑगस्ट रोजी कुटुंबीयांसमवेत आत्मदहन करणार असल्याचाही इशारा दिला आहे.

बीड जिल्हा हिवताप कार्यालयातून मोठ्या प्रमाणात बोगस प्रमाणपत्र वितरित करण्यात आल्याचा आराेप या कर्मचाऱ्यांनी केला. या बोगस प्रमाणपत्रधारकांमुळे १९९८ पासून हंगामी फवारणी कर्मचारी म्हणून काम करीत असलेल्या रत्नागिरीमधील उमेदवारांवर अन्याय होत आहे. अर्धेअधिक आयुष्य शासकीय नोकरी लागेल अशी वाट पाहत बसलेल्या या कर्मचाऱ्यांची निराशा झाली आहे. शासकीय नोकरी लागण्याचे वयही निघून गेले आहे. त्यामुळे आता जगून तरी काय उपयोग, असा प्रश्न या कर्मचाऱ्यांनी विचारला आहे.

शासन जर आमचा विचार करीत नाही, तर कोण करणार? त्यामुळे यापुढे कोणताही मार्ग शिल्लक न राहिल्यामुळे कुटुंबासह आत्मदहनाचा टोकाचा निर्णय या दहा कर्मचाऱ्यांनी घेतला आहे. यामध्ये इकबाल चौगुले, विजय राऊत, नीलेश गुलेकर, प्रशांत शिंदे, अजित खुणम, मंगेश जाधव, सुरेश दैत, राजेश कनियारीकल, सचिन कदम, प्रसाद पाठोळे या कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याबाबतचे निवेदन मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, आरोग्यमंत्री, रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक व आरोग्य विभागाला दिले आहे.