शहरं
Join us  
Trending Stories
1
हायवे होणार रनवे...! गंगा एक्सप्रेसवर लढाऊ विमानं उतरणार; भारतीय हवाई दल ताकद दाखवणार
2
मराठमोळ्या शेतकऱ्याची कमाल, १ आंबा अन् वजन तब्बल ३ किलो; दिले चक्क शरद पवारांचे नाव!
3
भारताकडून हल्ल्याची पाकिस्तानला धास्ती; पेशावर, एबाटाबादसह २९ जिल्ह्यात एअर सायरन लावले
4
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यानंतर भारतात १० लाख सायबर हल्ले; पाकिस्तानसह अनेक देशांकडून हॅकिंगचा प्रयत्न
5
जबरदस्त तिमाही निकालानंतर Adani Enterprises चे शेअर्स सुस्साट.., चौथ्या तिमाहीत नफा ७५२% वाढला
6
एचडीएफसी बँकेकडून केवायसी अपडेट, APK चा मेसेज आला, पाठविणाऱ्याला ब्लॉक करताच ठेवली स्माईली...
7
अमेरिकेचे नौदल भारताच्या साथीला! 12 कोटी डॉलर्सचे तंत्रज्ञान देणार, नौदल समुद्रात आरपार लक्ष ठेवू शकणार...
8
वर्षभरात होणार तब्बल ८०० टन सोन्याची खरेदी; ‘वर्ल्ड गोल्ड कौन्सिल’ने अहवालात व्यक्त केला अंदाज
9
आधी ओरडण्याचा आवाज, नंतर मिळाला मृतदेह; बॉयफ्रेंडच्या घरात तरुणीसोबत काय घडलं?
10
मनोज जरांगे पाटील यांची तब्येत बिघडली, बीड दौरा अर्धवट सोडला; उपचारांसाठी रुग्णालयात दाखल
11
बॉलिवूड गायकाने चाहत्यांना दिला सुखद धक्का, खरी वेडिंग डेट समोर; पत्नीने केला होता खास लूक
12
मे महिन्यात ६ ग्रहांचे गोचर: ६ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; भरघोस नफा, लक्ष्मी कृपा-भरभराट!
13
वर्षाला ८४ लाख पगार, 'या' एजन्सीनं काढली 'हाऊसमेड'ची नोकरी; काय काम करावं लागणार?
14
दहशतवाद विरोधी लढाईत भारताला पूर्ण पाठिंबा; अमेरिकेची घोषणा, ट्रम्प-मोदींमध्ये चर्चा
15
पाकिस्तानचं जितकं आहे संरक्षण बजेट, त्यापेक्षा तिप्पट आहे भारताचं एप्रिलचं GST कलेक्शन; जाणून घ्या
16
जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."
17
...तर बांगलादेशने ईशान्येकडील सातही राज्ये ताब्यात घ्यावीत; भारताविरोधात बांगलादेशने ओकली गरळ
18
'आम्हाला युद्ध नकोय, पण...'; पंतप्रधान मोदींचं नाव घेत बिलावल भुत्तो आता काय बोलले?
19
जातनिहाय जनगणनेसाठी कालमर्यादा हवी; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंची केंद्राकडे मागणी
20
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी घातल्यावर सुनील शेट्टी म्हणाला, "क्रिकेट..."

...तर जिल्ह्यातील ९७३ गावांत सुरू होऊ शकतात शाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2021 04:21 IST

मेहरून नाकाडे लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे ऑनलाईन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार दि. १४ ...

मेहरून नाकाडे

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोना रुग्णसंख्या वाढीमुळे ऑनलाईन अध्यापनासाठी शासनाने परवानगी दिली आहे. त्यानुसार दि. १४ जूनपासून जिल्ह्यातील शाळांमध्ये ऑनलाईन अध्यापन सुरू झाले आहे. जिल्ह्यातील एकूण १,५३४ गावांपैकी ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. शासन निर्णयानुसार संबंधित गावातील ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती गावातील शाळा सुरू करण्याबाबतचा निर्णय घेऊ शकतात.

गतवर्षीही प्रथम शैक्षणिक सत्र ऑनलाईनच सुरू होते. नोव्हेंबरमध्ये नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले होते. पाचवी ते आठवीपर्यंतचे वर्ग जानेवारीपासून सुरू करण्यात आले. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे पहिली ते बारावीपर्यंतच्या परीक्षा रद्द करून सरसकट विद्यार्थ्यांना पास करण्याचा निर्णय घेण्यात आला. दरवर्षीप्रमाणे नवीन शैक्षणिक वर्ष जूनपासून सुरू झाले, मात्र प्रत्यक्ष अध्यापनाऐवजी ऑनलाईन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे. जी गावे कोरोनामुक्त झाली आहेत, त्या गावातील शाळा सुरू करता येऊ शकतात. मात्र त्यासाठी ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समितीने एकत्र येऊन निर्णय घेणे गरजेचे आहे.

रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या अधिक असली तरी जिल्ह्यातील १,५३४ गावांपैकी ६५ गावे गेल्या महिन्यापर्यंत कोरोना वेशीवरच रोखण्यात यशस्वी झाली होती. सद्यस्थितीत आरोग्य विभाग, प्रशासनातर्फे घेण्यात आलेल्या खबरदारीमुळे जिल्ह्यातील एकूण ९७३ गावे कोरोनामुक्त झाली आहेत. गावातून कोरोना हद्दपार झाल्याने गावे व ग्रामस्थ सुरक्षित आहेत. शासकीय नियमावलींचे पालन करून या गावातील शाळा प्रत्यक्ष सुरू होऊ शकतात. ग्रामस्थांनी शाळा सुरू करण्यासाठी परवानगी दिली तर ९७३ कोरोनामुक्त गावातील शाळांमध्ये दीड वर्षानंतर मुलांचा किलबिलाट सुरू होऊ शकतो.

......................

शासन निर्णयानुसार कोरोनामुक्त गावात शाळा सुरू करता येऊ शकतात. मात्र त्यासाठी ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समितीने एकत्रित येत निर्णय घेणे आवश्यक आहे. मात्र शासकीय नियमावलीचे पालन करणे गरजेचे आहे.

- निशादेवी वाघमोडे, शिक्षणाधिकारी