शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

...तर पुन्हा मच्छीमार संघर्ष करेल : पी. एन. चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : मच्छीमार संघर्ष समितीचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु, आमच्या मागण्या एक महिन्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : मच्छीमार संघर्ष समितीचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु, आमच्या मागण्या एक महिन्यात पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा मच्छीमार नेते पी. एन. चौगुले यांनी दिला आहे.

सरकारकडे वारंवार विनंती करूनही आमची दखल घेतली जात नव्हती, त्यामुळेच आमच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली, असे ते म्हणाले.

दापाेली येथे सुरू असलेले साखळी उपाेषण गुरुवारी लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी उपाेषणकर्त्यांना सरबत दिल्यानंतर उपाेषण मागे घेण्यात आले. उपाेषण स्थगित केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की, समुद्रामध्ये बेकायदेशीर एलईडी मासेमारी, हायस्पीड बोट मासेमारी, पर्ससीन नेट मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. ही बेकायदेशीर मासेमारी थांबली नाही तर भविष्यात कोकणातल्या पारंपरिक मच्छीमारांना आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. समुद्रातील बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे तसा सक्षम कायदा नाही आणि तो कायदा करावा, या मागणीसाठी गेली दोन वर्षे पारंपरिक मच्छीमार सतत सरकारकडे संपर्क साधून आहेत. परंतु, पारंपरिक मच्छीमारांची सरकार दखल घेत नसल्यानेच आम्ही उपोषणासारखे हत्यार उपसले होते. मत्स्य मंत्री असलम शेख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे आम्ही सरकारवर विश्वास ठेवून तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे, असे शेख यांनी सांगितले.

एलईडी मासेमारी विरोधात कायदा होण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन यांना भेटले होते. केरळच्या धर्तीवर कायदा करावा, अशा सूचना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारने दिल्या होत्या. राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नांनी या कायद्यासाठी पुढाकार घेण्यात आला. या कायद्याचा मसुदा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. परंतु, सरकारची मुदत संपली आणि हा कायदा होऊ शकला नाही, असे चाैगुले यांनी सांगितले. आमदार योगेश कदम तसेच मत्स्य मंत्री अस्लम शेख यांनी कायद्यासंदर्भात मच्छीमारांना शब्द दिला असून, ते शब्द नक्की पाळतील असा विश्वास आम्हाला आहे, असे चाैगुले यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कायदा नक्की मंजूर होईल, अशी आशा हर्णै बंदर कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी व्यक्त केली आहे.