शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतावर २४ तासांत ‘टॅरिफ बॉम्ब’? अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले, म्हणाले...
2
जे स्वतःची कबर खोदताहेत, त्यांना का थांबवायचे? पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात
3
पालिका निवडणुकांचा दिवाळीनंतर उडणार बार; ‘स्थानिक’ निवडणुकीत व्हीव्हीपॅटचा वापर नाही
4
ढगफुटीने प्रलय; अनेक लोक, घरे वाहून गेली; बचावकार्यासाठी उतरले जवान
5
१९५४ पासून पाकला शस्त्रांची मदत करतोय अमेरिका, भारतीय लष्कराने ट्रम्पना आरसा दाखवला
6
विदर्भ-मराठवाड्यातील माल जाणार समुद्रमार्गे, समृद्धी महामार्गाला जोडणार वाढवण बंदर
7
‘माधुरी’ला परत आणण्यासाठी सरकार सुप्रीम कोर्टात जाणार; मुख्यमंत्री फडणवीस यांची ग्वाही
8
‘खरा भारतीय’ ठरविण्याचे अधिकार न्यायमूर्तींना नाहीत; प्रियांका गांधी म्हणाल्या, राहुल गांधी सैन्याविरोधात बोलले नाहीत
9
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
10
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
11
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
12
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
13
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
14
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
15
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
16
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
17
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
18
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
19
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
20
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात

...तर पुन्हा मच्छीमार संघर्ष करेल : पी. एन. चौगुले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क दापोली : मच्छीमार संघर्ष समितीचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु, आमच्या मागण्या एक महिन्यात ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

दापोली : मच्छीमार संघर्ष समितीचे उपोषण तात्पुरते स्थगित करण्यात आले आहे. परंतु, आमच्या मागण्या एक महिन्यात पूर्ण झाल्या नाहीत तर पुन्हा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा मच्छीमार नेते पी. एन. चौगुले यांनी दिला आहे.

सरकारकडे वारंवार विनंती करूनही आमची दखल घेतली जात नव्हती, त्यामुळेच आमच्यावर उपोषणाला बसण्याची वेळ आली, असे ते म्हणाले.

दापाेली येथे सुरू असलेले साखळी उपाेषण गुरुवारी लेखी आश्वासनानंतर स्थगित करण्यात आले. काँग्रेसचे युवक जिल्हाध्यक्ष अविनाश मोहिते यांनी उपाेषणकर्त्यांना सरबत दिल्यानंतर उपाेषण मागे घेण्यात आले. उपाेषण स्थगित केल्यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बाेलत हाेते. ते म्हणाले की, समुद्रामध्ये बेकायदेशीर एलईडी मासेमारी, हायस्पीड बोट मासेमारी, पर्ससीन नेट मासेमारीमुळे पारंपरिक मच्छीमार मेटाकुटीला आला आहे. ही बेकायदेशीर मासेमारी थांबली नाही तर भविष्यात कोकणातल्या पारंपरिक मच्छीमारांना आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय राहणार नाही. समुद्रातील बेकायदेशीर मासेमारी रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारकडे तसा सक्षम कायदा नाही आणि तो कायदा करावा, या मागणीसाठी गेली दोन वर्षे पारंपरिक मच्छीमार सतत सरकारकडे संपर्क साधून आहेत. परंतु, पारंपरिक मच्छीमारांची सरकार दखल घेत नसल्यानेच आम्ही उपोषणासारखे हत्यार उपसले होते. मत्स्य मंत्री असलम शेख यांनी दिलेल्या लेखी आश्वासनामुळे आम्ही सरकारवर विश्वास ठेवून तात्पुरते आंदोलन स्थगित केले आहे, असे शेख यांनी सांगितले.

एलईडी मासेमारी विरोधात कायदा होण्यासाठी पारंपरिक मच्छीमारांचे शिष्टमंडळ २०१९ मध्ये तत्कालीन केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग, निर्मला सीतारामन यांना भेटले होते. केरळच्या धर्तीवर कायदा करावा, अशा सूचना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केंद्र सरकारने दिल्या होत्या. राज्याचे तत्कालीन पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या प्रयत्नांनी या कायद्यासाठी पुढाकार घेण्यात आला. या कायद्याचा मसुदा पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्या मार्गदर्शनाखाली तयार झाला. परंतु, सरकारची मुदत संपली आणि हा कायदा होऊ शकला नाही, असे चाैगुले यांनी सांगितले. आमदार योगेश कदम तसेच मत्स्य मंत्री अस्लम शेख यांनी कायद्यासंदर्भात मच्छीमारांना शब्द दिला असून, ते शब्द नक्की पाळतील असा विश्वास आम्हाला आहे, असे चाैगुले यांनी सांगितले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात हा कायदा नक्की मंजूर होईल, अशी आशा हर्णै बंदर कमिटीचे अध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी व्यक्त केली आहे.