शहरं
Join us  
Trending Stories
1
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
2
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
3
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
4
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
5
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
6
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
7
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
8
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
9
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
10
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
11
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
12
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
13
२०२५ मधील शेवटची अंगारकी चतुर्थी: वर्षभर कृपा-लाभाची सुवर्ण संधी; ‘अशी’ करा गणेश उपासना
14
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
15
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
16
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
17
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
18
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
19
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
20
IPL 2026: प्रिती झिंटाचा मास्टरस्ट्रोक! लिलावात बोली लावली, तिकडे पठ्ठ्याने केली तुफानी खेळी
Daily Top 2Weekly Top 5

वनविभागाने रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन वर्षांत दिले 'इतक्या' प्राण्यांना जीवदान

By संदीप बांद्रे | Updated: December 18, 2024 17:43 IST

संदीप बांद्रे चिपळूण : वन विभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, रात्री-अपरात्री मुका प्राणी संकटात सापडल्याचा फोन येतो, तेव्हा ...

संदीप बांद्रेचिपळूण : वन विभाग अथवा आपत्ती व्यवस्थापन विभाग असो, रात्री-अपरात्री मुका प्राणी संकटात सापडल्याचा फोन येतो, तेव्हा ही यंत्रणा वेळ न घालवता तितक्याच तत्परतेने घटनास्थळी पोहोचते आणि मुक्या प्राण्यांचा जीव वाचवते. गेल्या ३ वर्षात तब्बल ९१४ प्राण्यांचा जीव वाचवला गेला, तर ५६ प्राण्यांना जीव मुकावा लागला. आजही वन विभागाची यंत्रणा वन्यजीव प्राण्यांच्या संरक्षणासाठी सातत्याने प्रयत्न करताना बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणेचा वापरही सुरू केला आहे.जंगलात पाणवठे कमी प्रमाणात असल्याने बऱ्याचदा हे प्राणी पायथ्यालगतच्या गावात येत असतात. त्यातून काही प्राणी भक्ष्य पकडताना विहिरीत किंवा खोल खड्ड्यात अडकण्याचे प्रकार नियमित घडतात. विशेषतः विहिरीत बिबट्या, डुक्कर, रानगवा, सांबर, माकड, मगर असे प्राणी अडकल्याच्या घटना अधूनमधून घडतच असतात.२०२१-२२ मध्ये २३५ मुक्या प्राण्यांना जीवदान देत नैसर्गिक अधिवासात मुक्त करण्यात आले, तसेच २०२३ मध्ये ४०८ आणि २०२४ मध्ये २७१, असे एकूण ९१४ प्राण्यांचे जीव ३ वर्षांत वाचवण्यात आले. यामध्ये ७२ पाळीव प्राणी, साप व पक्ष्यांचे जीवही वाचवण्यात यश आले.

पक्ष्यांच्या अधिवासावर कुऱ्हाडीचे घाव

  • बऱ्याचदा सह्याद्रीच्या खोऱ्यातील काही गावांत जंगलतोडीचे प्रकार घडत असल्याने त्याठिकाणी असलेल्या पक्ष्यांच्या अधिवासाला धोका पोहोचत आहे.
  • वृक्षतोडीमध्ये मोठ्या झाडांची निवड केली जात असल्याने त्यावर असलेल्या घरट्यांचे नुकसान होत आहे. 

शहर डोंगर कपारीला भिडले

  • सध्या जिल्ह्यातील विविध शहरांत सपाटीचे क्षेत्र अपुरे पडू लागल्याने डोंगर उतारावरील जमिनी विकसित होऊ लागल्या आहेत.
  • डोंगर उतारावर असलेल्या झाडाझुडपांसह वृक्षांचीही तोड होत असल्याने त्याचा फटका प्राण्यांनाही बसत आहे. 

काट्याकुपाट्यात का अडकतात पक्षी

  • अनेक ठिकाणी पक्ष्यांपासून सुरक्षा मिळवण्यासाठी जाळ्यांची रचना केली जाते. मात्र, त्यामध्ये अडकून पक्षी जखमी झाल्याच्या घटना घडतात.
  • बऱ्याचदा शेताला तारेचे कुंपण करून त्यात विद्युत प्रवाह सोडला जातो. यामध्येही मुक्या प्राण्यांसह पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. 

तारेसह प्लास्टिकचा गळ्याला फास

  • गेल्या काही वर्षांत प्लास्टिक पिशव्यांचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात असल्याने ते प्राण्यांच्या पायात अडकून जखमी होतात.
  • प्लास्टिकसोबतच तारा पक्ष्यांच्या पायात अडकून ते घायाळ झाल्याचे प्रकार घडतात. 

मध्यरात्री कॉल विहिरीत बिबट्या पडलाय

  • ग्रामीण भागातील अनेक विहिरी उघड्या असल्याने बिबट्या किंवा अन्य प्राणी भक्ष्य पकडण्याचा नादात विहिरीत पडतात.
  • अनेकदा रात्रीच्या वेळी या घटना घडत असल्याने मध्यरात्रीही वन विभागाला यंत्रणा घेऊन तेथे पोहोचावे लागते. 

तीन तास धडपड..जाळ्यात बिबट्याला पकडले

  • विहिरीत पडलेल्या बिबट्याला बाहेर काढताना मोठी कसरत करावी लागते.
  • काही वेळा तीन तासांची धडपड केल्यानंतर बिबट्या किंवा अन्य प्राणी विहिरी बाहेर काढले जातात.

मुक्या वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात आल्यानंतर त्यांना तितक्याच तातडीने मदत द्यावी लागते. रात्री-अपरात्री केव्हाही फोन येतो. त्यामुळे संबंधित यंत्रणा नेहमी तयार ठेवली जाते. आता बचाव कार्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा उपलब्ध झाल्याने त्याचा चांगला उपयोग होत आहे. अशी घटना घडल्यानंतर नागरिकांनी वन विभागाच्या हेल्पलाइन टोल फ्री क्रमांक १९२६ वर फोन करतात किंवा वैयक्तिक स्वरूपात संपर्क साधतात. - गिरिजा देसाई, विभागीय वन अधिकारी, चिपळूण

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीforest departmentवनविभाग