शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
2
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
3
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
4
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
5
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
6
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
7
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल
8
राज्यात तब्बल एक लाख आठ हजार कोटींची गुंतवणूक; ४७ हजार रोजगारांची निर्मिती होणार
9
व्होटबंदी : साप मेला नाही; पण दात काढले!
10
Mhada: ठाणे शहर आणि जिल्हा, वसईतील म्हाडाच्या ५ हजार घरांसाठी दोन लाख अर्ज
11
पाकिस्तानसोबत क्रिकेट नकोच..; IND-PAK सामन्यावर प्रियंका चतुर्वेदींचे सरकारला आवाहन
12
मोठी बातमी! एल्फिन्स्टन ब्रिज उद्या मध्यरात्रीपासून बंद; जाणून घ्या पर्यायी मार्ग...
13
Asia Cup 2025 PAK vs Oman : भारतीय वंशाचा कॅप्टन सलमानच्या पाकला भिडणार! अन्...
14
'रशियन तेल खरेदी थांबवा अन्यथा...',अमेरिकन मंत्री हॉवर्ड लुटनिकची भारताला पुन्हा धमकी
15
Asia Cup 2025 BAN vs HK : कॅप्टन लिटन दासची 'फिफ्टी'; बांगलादेशनं मॅच जिंकली, पण...
16
छत्तीसगडमध्ये भीषण चकमक! १ कोटीचा इनाम असलेला मोडेम बाळकृष्णसह १० नक्षलवादी ठार 
17
परदेशात कोणत्या गुप्त बैठकांसाठी जाता? CRPF च्या पत्रावरुन भाजपने राहुल गांधींना घेरले
18
Mustafizur Rahman Stunning Catch : विकेटचा रकाना रिकामा; पण मुस्ताफिझुरनं बेस्ट कॅचसह केली हवा (VIDEO)
19
'लष्करी शक्तीच्या जोरावर पाच पट मोठ्या भारताला...', पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांनी पुन्हा गरळ ओकली
20
खासदार प्रशांत पडोळे अपघातातून थोडक्यात बचावले ; नक्षलग्रस्त भागात शासकीय सुरक्षा व्यवस्था न दिल्याचा मुद्दा चर्चेत

समविचारी मंच २ ऑगस्टला करणार थाळीनाद आंदोलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2021 04:29 IST

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील रस्ते सुधारणा करण्याप्रश्नी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने ...

रत्नागिरी : रत्नागिरी मध्यवर्ती बसस्थानकाचे रखडलेले बांधकाम आणि गणेशोत्सवाच्या पूर्वी शहरातील रस्ते सुधारणा करण्याप्रश्नी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने येत्या २ ऑगस्ट रोजी थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

रत्नागिरी येथील मध्यवर्ती बस स्थानकाचे बांधकाम गेली अनेक वर्षे रखडलेले आहे. कोकणातील लोकप्रिय असा गणेशोत्सव दीड महिन्यांवर आलेला आहे. असे असतानाही शहरातील रस्ते दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. नागरिकांना अजूनही या खडतर रस्त्यांवरून वाहने न्यावी लागत आहेत. शहरातील अनेक प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी तसेच याविषयी संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने रत्नागिरीतील बस स्थानकासमोर सोमवार, २ ऑगस्ट रोजी सकाळी ११ ते १ या वेळात थाळीनाद आंदोलन करण्यात येणार आहे.

सध्या रत्नागिरी शहरातील अनेक प्रश्न जनतेच्या जिव्हाळ्याचे असून याविषयी जनतेच्या मनात असंतोष खदखदत आहे. समविचारीने नि:पक्षतेने आयोजित केलेल्या या आंदोलनात रत्नागिरीकर, समाजसेवक, विविध सामाजिक कार्यकर्ते, संस्था, संघटना यांनी बहुसंख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र समविचारी मंचाच्या वतीने करण्यात आले आहे.