शहरं
Join us  
Trending Stories
1
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
2
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
3
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
4
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
5
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
6
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
7
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
8
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
9
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
10
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
11
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
12
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
13
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
14
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
15
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
16
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले
17
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
18
चहलला जळवण्यासाठी बिग बॉस विनरसोबत थिरकली धनश्री? व्हायरल व्हिडिओ मागची गोष्ट
19
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
20
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 

शिशुविहारकडे कामगारांची पाठच!

By admin | Updated: July 5, 2016 00:25 IST

कामगार कल्याण मंडळ : बालकांचा आधार ठरलेल्या केंद्रात प्रवेशच नाही...

शिरगाव : महाराष्ट्र कामगार कल्याण मंडळ संचलित कामगार कल्याण केंद्र, चिपळूण येथील शिशुविहारच्या दोन वर्गांपैकी एक वर्ग या वर्षीपासून बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. गेली १२ वर्ष कामगार कुटुंबांसह चिपळूण परिसरातील अनेक बालकांचा आधार ठरलेल्या या केंद्रात प्रवेश न मिळाल्याने नाराजी व्यक्त होत आहे. कामगार कल्याण निधीची कपात तसेच अंमलबजावणी मोहीम कडक स्वरुपात न राबविल्याने छोटे उद्योग, कंपन्यांमधील अल्पवेतनधारकांना मंडळाच्या लाभाची कल्पनाच नसते. जे कामगार या संज्ञेत येतात त्यांची बालके भविष्यात पहिलीचा प्रवेश डोळ्यासमोर ठेवून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत जात असल्याने या केंद्रातील प्रवेश संख्या घटली आहे. गेल्या १२ वर्षात प्रतिवर्षी सरासरी ८० मुले येथे शिकतात. परंतु, एकूण प्रवेशातील ५० टक्के मुले ही कामगारांचीच हवी, असा नियम आडवा आल्याने दोन वर्ग चालवताना यातील ४० बालके ही कामगार कुटुंबातून आलेली असावीत. मात्र, या नियमाची पूर्तता होत नसल्याने येथील एकच वर्ग सुरु राहणार आहे. यामुळे गरजू बालके प्रवेशापासून वंचित राहणार आहेत. १७५ रुपये वार्षिक फीमध्ये रोज सकस आहार, आरोग्य तपासणी, गणवेश, वार्षिक सहल याबरोबरच स्वतंत्र शिक्षिका येथील वर्गांसाठी कार्यरत असतात. मात्र, या सुविधा असूनही कामगार कुटुंबियानी या शिशुविहारकडे पाठ फिरवल्याचे चित्र आहे. बालमानसशास्त्राप्रमाणे ४ बाय ४ फूट जागेत एक बालक असेल तरच त्याचे अनुकरणातून शिक्षण व बौध्दिक विकास होतो. तथापि, याबाबत केवळ शासन संचलित शिशुविहार वगळता कोणीही दखल घेत नाही. हजारो रुपयांचे डोनेशन व फी देऊन बालकांना बड्या शाळेत पाठविण्याच्या पालकांच्या मानसिकतेमुळे असे शासकीय उपक्रम बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कामगार कल्याण मंडळ, चिपळूण केंद्राच्या कार्यक्षेत्रात जवळपास ३ हजार ५०० कामगार आहेत. मात्र, येथील शिशुविहारमध्ये कामगारांची ४० बालकेही सध्या दाखल नाहीत. कामगार कल्याण मंडळाच्या विधायक उपक्रमांकडे पाठ फिरवणारे कामगार पाल्याच्या शिष्यवृत्तीबाबतची सर्व कागदपत्रे व सोपस्कर वेळीच पूर्ण करण्यासाठी आग्रही असतात. कामगारांच्या कल्याणासाठी ५० वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या कामगार कल्याण मंडळ केंद्राला कामगारांचा सकारात्मक प्रतिसाद नसेल तर अल्पदरात चालणारे शिवण, फॅशन डिझाईन, वाचनालय, विविध प्रशिक्षण कार्यक्रम हे क्रमाक्रमाने आपोआपच बंद पडण्याचा धोका आहे. लाभार्थी उपलब्ध नसेल तर बंद होणाऱ्या उपक्रमांना नवसंजीवनी कोण देणार? कामगार कल्याण अधिकाऱ्यांसह कर्मचारीवर्ग तळमळीने हे उपकम बंद होऊ नयेत यासाठी विविध कंपन्यांमधून संपर्क साधत आहे. मात्र, मंडळाकडे आपुलकीने पाहण्याची कामगारांची मानसिकता व कल्याण निधीची कठोर अंमलबजावणीच कामगार कल्याण केंद्राचे अस्तित्व अबाधित ठेवू शकते. (वार्ताहर)विविध उपक्रम : जनजागृतीची गरज...कामगारांचा सकारात्मक प्रतिसाद लाभण्यासाठी कामगार कल्याण मंडळाने सुरुवातीपासून जनजागृती करतानाच कामगारांचा विश्वास संपादन केला तरच कामगार कल्याण मंडळाचे अल्पदरात सुरु असलेले विविध उपक्रम सुरु राहतील. अन्यथा ते बंद पडू शकतात, असे मत व्यक्त होत आहे.