शहरं
Join us  
Trending Stories
1
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
2
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
3
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
4
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
5
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
6
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
7
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
8
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
9
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
10
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
11
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
12
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
13
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
14
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
15
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
16
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
17
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
18
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?
19
शेजाऱ्यांना खुश करण्यासाठी मार्क झुकेरबर्ग वाटतायेत 'हेडफोन'; का वैतागले आहेत शेजारी?
20
टाटानं केली नव्या 'एआय अँड सर्व्हिस ट्रांसफॉर्मेशन' युनिटची स्थापन, काय असणार काम? कुणाला मिळाली जबाबदारी? जाणून घ्या

मागासप्रवर्गाला तात्पुरता दिलासा

By admin | Updated: April 3, 2015 00:46 IST

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८२९ उमेदवारांचा निश्वास

रत्नागिरी : येत्या २२ एप्रिल रोजी होणारी सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक लढवणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १८२९ उमेदवारांना तात्पुरता दिलासा दिला आहे. जिल्ह्यात ४६१ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक, तर ९० ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापू लागले आहेत. राजकीय पक्षांनीही या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी आटापिटा चालवला आहे. या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आदी मागास प्रवर्गातील पुरूष व महिला उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जातपडताळणी प्रमाणपत्र निवडणुकीच्या अर्जावेळी सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, आता या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही; परंतु त्याऐवजी निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र द्यावे लागेल, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी जाहीर केल्याने मागास प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ४६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ५५७० उमेदवारांपैकी १७३५ उमेदवार मागास प्रवर्गातील आहेत. पोटनिवडणुका होणाऱ्या ९० ग्रामपंचायतींच्या एकूण १३० जागांपैकी ९४ मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत. त्यामुळे ३४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ९० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका लढवणाऱ्या एकूण १८२९ मागास प्रवर्गातील उमेदवारांना आता सहा महिन्यांपर्यंत दिलासा मिळाला आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी पूर्वनियोजनानुसार ७ एप्रिल २०१५ पर्यंत सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशपत्र दाखल करण्याची मुदत होती. हा कालावधी आता सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आदी मागास प्रवर्गातील पुरूष व महिला उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य.निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र देणे आयोगाने केले बंधनकारक.सहा महिन्यांपर्यंत दिलासा.