शहरं
Join us  
Trending Stories
1
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
2
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
3
India Pakistan Vidoe: पाकिस्तानने डागलेली उखळी तोफ थेट घरावर, क्षणात दिसेनासं झालं, बघा काय घडलं?
4
यशस्वी जैस्वालचा यू-टर्न ! गोवा नव्हे, मुंबई संघाकडूनच क्रिकेट खेळणार... काय दिलं कारण?
5
हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त! पाकिस्तानच्या गोळीबारात जुळ्या भावंडांचा मृत्यू
6
पाक लष्कर प्रमुखाला मिळाली विशेष 'पॉवर'; पाकिस्तानी सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
7
लग्नाच्या अवघ्या १५व्या दिवशीच नवरीनं उडवली सासरची झोप; नवरदेवालाही लावला चुना अन्...  
8
Mumbai: टाटा मेमोरियल हॉस्पिटलला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; भारत- पाकिस्तान तणावादरम्यान मेल
9
तुमच्या मुलांच्या उच्च शिक्षणासाठी आर्थिक नियोजन कसे करावे? महागाई लक्षात घेऊन 'या' टिप्स फॉलो करा
10
India Pakistan: 'ये कोई तरीका है भीख मांगने का'; भारताच्या 'पीआयबी'ने पाकिस्तानची उडवली खिल्ली 
11
मागे कोण उभं आहे बघा, शवपेट्यांना लपटलेले झेंडे बघा; भारताने जगाला दाखवला पाकचा खरा चेहरा
12
Operation Sindoor वर मुकेश अंबानींचं वक्तव्य, पंतप्रधानांचा उल्लेख करत केलं 'हे' वक्तव्य 
13
IPL 2025 अनिश्चित काळासाठी स्थगित! भारत-पाकिस्तान युद्धाचे ढग पाहून BCCI चा मोठा निर्णय
14
"घाबरण्याची गरज नाही..," भारत-पाक तणावादरम्यान इंडियन ऑईलनं पेट्रोल-डिझेलवर केलं मोठं वक्तव्य
15
"पुढचं आईस्क्रीम आता लाहोरमध्येच खाईन"; कर्तव्यावर परतलेल्या जवानाचा व्हिडीओ पाहून वाटेल अभिमान!
16
India Pakistan: पाकिस्तानच्या मिसाईल्स फटाक्यासारख्या फुस्स; पंजाबमध्ये सापडली पाडलेली क्षेपणास्त्रे, बघा व्हिडीओ
17
सलमान खान आर्मी ऑफिसरच्या भूमिकेत, गलवान व्हॅलीतील भारत-चीन युद्धावर येणार सिनेमा
18
पाकिस्तानी शेअर बाजारात भूकंप, पण भारतीय मार्केटवर झाला नाही परिणाम, 'ही' आहेत ३ मोठी कारणे
19
Swapna Shastra: प्रिय व्यक्तीचा स्वप्नात मृत्यू पाहणे शुभ की अशुभ? त्यातही स्वप्नं पहाटेचं असेल तर?
20
मनोहर पर्रीकरांची दूरदृष्टी, सैन्याची बनली अतूट शक्ती; S-400 ‘सुदर्शन’मुळे पाक चक्रावले

मागासप्रवर्गाला तात्पुरता दिलासा

By admin | Updated: April 3, 2015 00:46 IST

ग्रामपंचायत निवडणूक : जिल्ह्यात १८२९ उमेदवारांचा निश्वास

रत्नागिरी : येत्या २२ एप्रिल रोजी होणारी सार्वत्रिक आणि पोटनिवडणूक लढवणाऱ्या मागास प्रवर्गातील उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र सादर करण्यासाठी सहा महिन्यांची मुदतवाढ देऊन राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १८२९ उमेदवारांना तात्पुरता दिलासा दिला आहे. जिल्ह्यात ४६१ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक निवडणूक, तर ९० ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक जाहीर झाल्या आहेत. या निवडणुकांमुळे ग्रामीण भागातील राजकारण चांगलेच तापू लागले आहेत. राजकीय पक्षांनीही या ग्रामपंचायती ताब्यात घेण्यासाठी आटापिटा चालवला आहे. या निवडणुका लढवू इच्छिणाऱ्या अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आदी मागास प्रवर्गातील पुरूष व महिला उमेदवारांना निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार जातपडताळणी प्रमाणपत्र निवडणुकीच्या अर्जावेळी सादर करणे अनिवार्य करण्यात आले होते. मात्र, आता या उमेदवारांना नामनिर्देशनपत्रासोबत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याची आवश्यकता नाही; परंतु त्याऐवजी निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र द्यावे लागेल, असे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहारिया यांनी जाहीर केल्याने मागास प्रवर्गातील उमेदवारांना दिलासा मिळाला आहे. ४६१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी एकूण ५५७० उमेदवारांपैकी १७३५ उमेदवार मागास प्रवर्गातील आहेत. पोटनिवडणुका होणाऱ्या ९० ग्रामपंचायतींच्या एकूण १३० जागांपैकी ९४ मागास प्रवर्गातील उमेदवार आहेत. त्यामुळे ३४१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि ९० ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुका लढवणाऱ्या एकूण १८२९ मागास प्रवर्गातील उमेदवारांना आता सहा महिन्यांपर्यंत दिलासा मिळाला आहे.राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक आणि पोटनिवडणुकांसाठी पूर्वनियोजनानुसार ७ एप्रिल २०१५ पर्यंत सार्वजनिक सुटीचे दिवस वगळून सकाळी ११ ते दुपारी ३ या कालावधीत नामनिर्देशपत्र दाखल करण्याची मुदत होती. हा कालावधी आता सकाळी १० ते सायंकाळी ४ वाजेपर्यंत वाढवण्यात आला आहे. (प्रतिनिधी)अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, नागरिकांचा मागास प्रवर्ग, इतर मागास प्रवर्ग आदी मागास प्रवर्गातील पुरूष व महिला उमेदवारांना जातपडताळणी प्रमाणपत्र अनिवार्य.निवडून आल्याच्या दिनांकापासून सहा महिन्यांच्या आत जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबत हमीपत्र देणे आयोगाने केले बंधनकारक.सहा महिन्यांपर्यंत दिलासा.