शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक परिषदेचे धरण

By admin | Updated: November 21, 2014 00:38 IST

विविध मागण्या : सोमवारपासून शिक्षकांचा रास्ता रोकोे

रत्नागिरी : संचमान्यतेबाबत शनिवारपर्यंत सकारात्मक निर्णय न झाल्यास हजारो शिक्षक सोमवारपासून राज्यभर रास्ता रोको करतील, असा इशारा शिक्षक आमदार रामनाथ मोते यांनी दिला आहे. राज्यातील शासनमान्य अनुदानित प्राथमिक, माध्यमिक शाळांमधील हजारो शिक्षकांना अतिरिक्त ठरणाऱ्या २०१३-१४ च्या संचमान्यता तत्काळ रद्द करा. अतिरिक्त शिक्षक व शिक्षणसेवकांना संरक्षण द्या, या प्रमुख मागण्यांसाठी आज शिक्षक परिषदेच्यावतीने जिल्हा परिषद येथे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.जिल्हाध्यक्ष रमेश जाधव व कार्यवाह एस. एस. पाटील यांच्या नेतृत्त्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संचमान्यतेमुळे राज्यात घोळ निर्माण झाला असून, अतिरिक्त शिक्षक व शिक्षणसेवकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. शासनाने याबाबतीत सर्व जिल्ह्यांचा आढावा घेऊन सकारात्मक निर्णय घ्यावा, असे शिक्षक परिषदेचे म्हणणे आहे. संचमान्यतेच्या त्रूटी दूर करुन नव्याने निर्णय घ्यावा, या मागणीचे निवेदन माध्यमिक विभाग व प्राथमिक विभागाला देण्यात आले.जिल्ह्यातील शेकडो अतिरिक्त शिक्षक व शिक्षणसेवकांच्या या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आंदोलनादरम्यान शिक्षणाधिकारी व उपजिल्हाधिकारी दोन्हीजण उपस्थित नव्हते. प्राथमिक विभागाच्यावतीने भारती संसारे यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी तालुका कार्यवाह महेंद्र कुवळेकर, उपाध्यक्ष कदम, प्रभाकर धोत्रे, संगमेश्वरचे अध्यक्ष अरुण सप्रे, राजापूरचे अध्यक्ष राजन नाईक, कार्यवाह अरुण कुराडे, प्रवक्ते आनंद त्रिपाठी उपस्थित होते. (शहर वार्ताहर)अनुदानित शाळांमधील शिक्षकांना अतिरिक्त ठरवणाऱ्या संचमान्यतेविरोधात गुरुवारी शिक्षक परिषदेने जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन केले.