शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक शाळेत विद्यार्थी घरात...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे शासनाने ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनामुळे प्रत्यक्ष शाळा सुरू करणे शक्य नसल्यामुळे शासनाने ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी दिली आहे. त्यानुसार जिल्ह्यात ५५ टक्के ऑनलाइन अध्यापन सुरू आहे. मात्र नेटवर्क समस्या असलेल्या गावात मात्र दूरदर्शन, आकाशवाणी तसेच स्वाध्याय पुस्तिकांचा वापर करून ४५ टक्के शाळांमध्ये ऑफलाइन अध्यापन सुरू आहे.

मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी ऑनलाइन अध्यापनासाठी परवानगी देण्यात आली आहे. मात्र शिक्षकांना शाळेत उपस्थित राहण्याची अट असून ५० टक्केचा निकष आहे. शिक्षक ऑनलाइन अध्यापन शाळेसह, घरातून करीत आहेत. नेटवर्क समस्या असणाऱ्या गावात शाळेत शिक्षक जात असले तरी मुलांना प्रत्यक्ष भेटत नाहीत. मात्र पालकांच्या माध्यमातून अभ्यासाचे धडे देत आहेत. स्वाध्याय पुस्तिका मुलांना वितरित करण्यात आल्या असून दररोजचा अभ्यास स्वाध्याय पुस्तिकेव्दारे सोडवून घेण्यात येत आहेत. शिवाय दर आठवड्याला मुलांनी केलेला अभ्यास तपासून देत आहेत. काही ग्रामीण भागात कोरोनाने शिरकाव केल्याने बाधित क्षेत्रे जाहीर करण्यात आली आहेत. शिवाय काही शाळेतून विलगीकरण कक्ष सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे त्या गावात शिक्षक जाणे टाळत असून घरातूनच ऑनलाइन अध्यापन करीत आहेत. शिवाय मुलांच्या पालकांकडे मोबाइल नसल्यास शेजारील ग्रामस्थांच्या, विद्यार्थ्यांच्या मोबाइलवर हाॅटस्पाॅट अभ्यास पाठविला जात आहे.

नेटवर्क नसलेल्या गावातून गतवर्षीप्रमाणे ग्रामस्थांच्या सहकार्याने आठवड्यातून तीन, चार वेळा प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. मात्र याबाबत ग्रामस्थ, पालकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. मुलांचे नुकसान होऊ नये, यासाठी शिक्षण विभागाचे प्रयत्न सुरू आहेत.

गतवर्षीच्या अभ्यासक्रमाची उजळणी व्हावी यासाठी शासनाने सेतू अभ्यासक्रम निश्चित केला आहे. त्याची अंमलबजावणी सुरू झाली असून ४५ दिवसात पूर्ण करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना शिक्षक मोबाइलवर पीडीएफ फाइल पाठवित असून दररोज मुले वहीवर अभ्यास लिहून काढत आहेत. ऑफलाइनच्या मुलांना झेरॉक्स काढून शिक्षकांनी दिल्या आहेत. ऑनलाइनमध्ये मुले प्रत्यक्ष समोर नाहीत, ऑफलाइनमध्ये मुले स्वत: अभ्यास करीत आहेत. त्यामुळे मुलांना आकलन होत आहे अथवा नाही, जो भाग समजला नाही, त्याबाबत मुले मागे राहत आहेत. गणित, विज्ञानसारख्या विषयात मुले मागे पडत आहेत.

-----------------------------

ऑनलाइन अध्यापनास प्रारंभ झाला असला तरी मुलांना आता त्याचा सराव झाला आहे. शासनाच्या सूचनेनुसार सध्या ब्रीज कोर्सच्या माध्यमातून मुलांची उजळणी सुरू आहे. गतवर्षातील अभ्यासक्रमाची उजळणी घेण्यात येत आहे. ऑफलाइन अध्यापनात स्वाध्याय पुस्तिकाव्दारे दैनंदिन अभ्यास घेण्यात येत असून, दर आठवड्याला मुलांनी केलेला अभ्यास तपासून दिला जात आहे.

- दीपक नागवेकर, जिल्हाध्यक्ष प्राथमिक शिक्षक संघ