शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकसभेच्या ४८ जागा, ५० हजारांपेक्षा कमी फरक; २०१९ च्या सार्वत्रिक निवडणुकीवर काँग्रेसचा मोठा दावा
2
'ओबीसी समाज श्रीमंत मराठ्यांविरोधात जाऊ नये, हाच शरद पवारांच्या मंडळ यात्रेचा हेतू'; प्रकाश आंबेडकरांचा टोला
3
'मतचोरी' विरोधात इंडिया आघाडीचे उद्या शक्तिप्रदर्शन, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली खासदार संसदेपासून निवडणूक आयोगाच्या कार्यालयापर्यंत मोर्चा काढणार
4
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोरील अडचणी वाढणार? शकुन राणीला 'डबल व्होटर' म्हणून फसले; आयोगाने बजावली नोटीस
5
'बुडायला लागलो तर अर्धे जग सोबत घेऊन जाणार'; पाकिस्तानची भारताला पुन्हा अणु हल्ल्याची धमकी!
6
रामदास आठवले महाराष्ट्र भाजपवर नाराज; थेट पीएम मोदींकडे केली तक्रार, कारण काय?
7
ब्रिटनच्या F-35B विमानामागचं शुक्लकाष्ठ सुटेना, आता या देशात करावं लागलं आपातकालीन लँडिंग
8
मनी लॉंड्रिंगप्रकरणी रॉबर्ट वाड्रांच्या अडचणीत वाढ; दोन कंपन्यांद्वारे ५८ कोटी रुपये कमावल्याचा आरोप
9
"जेव्हा देशासाठी निवड होते, तेव्हा..."; मराठमोळ्या 'वर्ल्ड चॅम्पियन'ने जसप्रीत बुमराहला सुनावलं
10
मासे खरेदी करण्यावरून दोन गटांमध्ये तुफान राडा, एकमेकांना लाथा-बुक्क्यांनी मारले
11
टस्कर हत्तीने भिंत फाेडून घरात केला प्रवेश; जीवनावश्यक साहित्याची नासधूस, छत्तीसगड सीमेलगतच्या मंजिगड टाेला येथील घटना
12
फक्त १२७९ रुपयांत करा हवाई प्रवास; Air India ने आणली खास ऑफर, जाणून घ्या डिटेल...
13
मत चोरीच्या मुद्यावरुन लक्ष वळवण्याचा प्रयत्न; हवाई दल प्रमुखांच्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याची टीका
14
IPS वडिलांनी कॉन्स्टेबलला बडतर्फ केलं, त्यांच्याच मुलीने कोर्टात खटला लढवून पुन्हा सेवेत घेतलं; नेमकं प्रकरण काय?
15
रोहित शर्मा, विराट कोहलीची वनडे क्रिकेटमधूनही लवकरच निवृत्ती? गौतम गंभीरचे विधान व्हायरल
16
धक्कादायक! तीन मुलांसह आईने संपवलं जीवन, लेकरांना पोटाला बांधलं आणि… 
17
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
18
इयत्ता तिसरीतील मुलीवर वर्गमित्राकडून अत्याचार; बाभुळगाव तालुक्यातील घटना
19
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
20
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...

शिक्षक झाले पोलीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2021 04:34 IST

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्यातील सर्व शाळा १४ मार्चपासून बंद करण्यात आल्या ...

राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी व विद्यार्थ्यांमध्ये कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी राज्यातील सर्व शाळा १४ मार्चपासून बंद करण्यात आल्या होत्या. त्यानंतर तत्काळ शिक्षकांना ‘पोलीस मित्र’ म्हणून नियुक्ती देण्यात आली. विनाकारण फिरणाऱ्या वाहन चालकांवर निर्बंध घालण्याचे काम शिक्षकांनी केले. विशेष म्हणजे घाटांमध्ये असणाऱ्या चेकनाक्यावर रात्रपाळीची ड्युटी देखील शिक्षकांना करावी लागली. यावेळी शिक्षक आपल्या पदाचा विचार न करता, पोलीस शिपायांबरोबर दिवसभर रस्त्यावर उभे होते.

घरोघरी पोषण आहाराचे वितरण

विद्यार्थ्यांमध्ये कोराेनाचा प्रसार होऊ नये यासाठी राज्य शासनाने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. यावेळी शाळांमधील शिल्लक पोषण आहाराच्या वितरणाचा प्रश्न निर्माण झाला. अशावेळी शालेय शिक्षण विभागाने स्थानिक पातळीवर पोषण आहार वितरणाचा निर्णय घेण्यात यावा, असे जाहीर केले. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक शाळांमध्ये शिक्षकांना वाडी-वस्तीवर जाऊन पोषण आहार पालकांकडे वितरित करावा लागला. यावेळी काही वाड्यांमध्ये शिक्षकांना प्रवेशही मिळाला नाही. पण आपली जबाबदारी या नात्याने शिक्षक सातत्याने हे काम करत राहिले.

रेशन दुकानावर नियुक्ती

शाळेतील पोषण आहार वितरण करून होतो न होतो तोच, शिक्षकांची गावातील रेशन दुकानांवर नियुक्ती करण्यात आली. धान्य वितरणादरम्यान रेशन दुकानांवर गर्दी होऊ नये यासाठी येणाऱ्या लोकांवर नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी शिक्षकांवर सोपविण्यात आली. वाडी-वस्तीतून येणाऱ्या लोकांमध्ये शिस्त निर्माण करण्याची व त्यांच्यामध्ये सामाजिक अंतर राखून रेशन वितरित करण्याचे काम शिक्षकांना देण्यात आले. रेशन वितरणादरम्यान लोकांमध्ये झालेल्या अनेक भांडणतंट्यांनाही शिक्षकांना सामोरे जावे लागले. गुरुजनांचा समाजातील दर्जा लक्षात न घेता, रेशन दुकानावर काम करण्याची सक्ती प्रशासनाकडून शिक्षकांवर करण्यात आली व शिक्षकांनी ते कामही आपली जबाबदारी म्हणून स्वीकारले.

कोरोना काळातही बोर्डाचे काम वेळेत पूर्ण

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा व उच्च माध्यमिक शालांत प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल कोरोना आणि लॉकडाऊनचे संकट असतानाही शिक्षकांनी जबाबदारीने व वेळेत केलेल्या कामामुळेच मंडळ जाहीर करू शकले, असे वक्तव्य तत्कालीन राज्य मंडळ अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे यांनी केले होते. या काळामध्ये कोणीही घराबाहेर पडण्यास तयार नव्हते. कडक लॉकडाऊनची अंमलबजावणी केली जात होती. अशा काळातही शिक्षकांनी आपल्या कर्तव्याला प्राधान्य देत वेळप्रसंगी जीव धोक्यात घालून निकालाचे काम पूर्ण केले. राज्यातील अनेक शाळा कन्टेन्मेंट झोनमध्ये असतानाही राज्यातील नऊही विभागीय मंडळांचा निकाल राज्य मंडळाला वेळेत पूर्ण करता आला. यामुळेच लाखो विद्यार्थ्यांना दहावी व बारावीचे गुणपत्रक मिळू शकले. कोकण विभागीय शिक्षण मंडळ यावर्षीही राज्यात अव्वल आले होते. विशेष म्हणजे शालेय निकालही लॉकडाऊन कालावधीमध्येच संचारबंदी असतानाही शाळेत जाऊन शिक्षकांनी पूर्ण केला होता.