शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

स्वयंपाकाची चव बिघडली; मसाल्याचा ठसका वाढला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2021 04:36 IST

लोकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : कोरोनाचे संकट गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. त्यातच आता दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने ...

लोकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : कोरोनाचे संकट गेल्या दीड वर्षापासून सुरू आहे. त्यातच आता दैनंदिन जीवनातील जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढीने सामान्यांना मेटाकुटीस आणले आहे. त्यातच आता स्वयंपाकाची चव वाढविणाऱ्या मसाल्याच्या पदार्थांनाही महागाईचा फटका बसला असल्याने त्यांच्याही दरात भरमसाठ वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे महागाईने त्रस्त झालेल्या गृहिणींच्या हातची चव बिघडण्याची वेळ आली आहे.

दिवसेंदिवस महागाईचा आलेख वाढू लागला आहे. कोरोनाच्या काळात सर्वत्र बंदीचे सावट आहे. अनेकांचे रोजगार गेले आहेत. नोकऱ्या सुटल्या आहेत. त्यामुळे कसे जगावे, हा प्रश्न आ वासून उभा असतानाच आता इंधन दरवाढीने सामान्य जनता जेरीस आली आहे. इंधन दरवाढीचा परिणाम वाहतूक व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे. त्यामुळे त्याचा फटका सर्व वस्तूंच्या आयातीवर मोठ्या प्रमाणावर झाला आहे.

स्वयंपाकघरातील पदार्थांच्या चवीसाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या मसाल्यांच्या पदार्थांच्या दरावरही याचा परिणाम झाला असून त्यांचेही दर वाढले आहेत. काहींचे मात्र कमी झाले आहेत.

महागाई पाठ साेडेना

कोरोनाच्या काळात सामान्य जनता आर्थिक संकटाचा सामना करत असतानाच पेट्रोल, डिझेल यांचे दर चढत आहेत. घरगुती गॅसही महागला आहे. महागाईचा फटका जनतेला बसत आहे. भाजीपाला, कडधान्ये याबरोबरच आता मसाल्याचे पदार्थही महागले आहेत.

- रेखा नामजोशी, रत्नागिरी

कोरोनाचे सावट गेल्या दीड वर्षापासून अख्ख्या जगावर आहे. यातून सामान्य नागरिक या संकटाचा सामना करत जगत असतानाच ऐन कोरोना काळात मंदीच्या सावटाबरोबरच महागाईचा भस्मासुर वाढू लागला आहे. महागाई कोरोना संकटातही पाठ सोडत नाही. अन्य पदार्थांच्या दराबरोबरच आता मसाल्याचे दरही वाढले आहे.

-आरती साळुंखे, देवरूख

म्हणून वाढले मसाल्याचे दर

महागाईमुळे सर्वच पदार्थांचे दर वाढले आहेत. दिवसेंदिवस पेट्रोल - डिझेल यांचे दर वाढू लागल्याने वाहतुकीचा खर्चही वाढला आहे. त्याचा परिणाम मसाल्याच्या दरावर झाला असून त्यांचेही दर वाढले आहेत.

- जयू पाखरे, व्यापारी, पाल

पेट्रोल, डिझेल आदी इंधनाचे दर गगनाला भिडू लागले आहेत. त्याचा परिणाम वाहतुकीवर झाला असून वाहतुकीचे दरही वाढले आहेत. वाहतूक खर्च वाढल्याने त्याचा परिणाम वस्तूंच्या आयातीवर मोठ्या प्रमाणात झाला आहे. त्यामुळेच मसाल्याचे पदार्थही आता महाग होऊ लागले आहेत.