शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

कायदा हातात घेऊन शासनाला अद्दल घडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:25 IST

राजापूर : कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेऊन शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सागवे येथील कोचाळी मैदानावर प्रकल्पग्रस्तांसाठी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.कोकण हा निसर्गरम्य ...

राजापूर : कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेऊन शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सागवे येथील कोचाळी मैदानावर प्रकल्पग्रस्तांसाठी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.कोकण हा निसर्गरम्य आहे; मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षङयंत्र रचण्यात आले असून, शिवसेना त्याला विरोध करील अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गुजरात काय किंवा नागपूर काय, त्यांना हवा तिकडे हा प्रकल्प न्यावा; पण असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. आमच्या निसर्गाला धोका करणारे प्रकल्प आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. उद्योगमंत्र्यांनी ती अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता येथील भूमीत तो प्रकल्प होणार नाही. नाणार परिसरातील शेतकरी बांधव, बागायतदार, मच्छिमार यांना देशोधडीला लावून कोकणचा विकास नको आहे, असे ठाकरे म्हणाले.नाणार परिसरात मोदी, शहा, जैन अशी मंडळी कधीच वास्तव्याला नव्हती. मग आता ही मंडळी कोठून? परप्रांतातील मंडळींना अगोदर प्रकल्पाची माहिती कशी मिळाली? असे सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.यावेळीे उद्योगमंत्री सुभाष देसाई, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री रवींद्र वायकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, सेनेचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार सुनील प्रभू, आमदार वैभव नाईक, आमदार सदानंद चव्हाण, आमदार उदय सामंत, आमदार तृप्ती सावंत, आमदार राजन साळवी, आमदार सत्यजित पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र्र महाडिक, सचिन कदम, गौरीशंकर खोत, माजी मंत्री रवींद्र्र माने, माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत यासहित सेनेचे पदाधिकारी तसेच रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, मज्जीद भाटकर, नाणारचे सरपंच ओमकार प्रभुदेसाई, भाई सामंत यासहित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.सभेकडे अनेक प्रकल्पग्रस्तांची पाठनाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द न करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे अशोक वालम यांच्या गटाचे प्रकल्पग्रस्त या सभेकडे फिरकलेही नाहीत. मात्र, भाई सामंत यांच्या गटाचे प्रकल्पग्रस्त सभेला उपस्थित होते. या सभेला नाणारबाहेरील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीजर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले होते. मात्र, केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदीशी सामंजस्य करार केला. त्यावरून मुख्यमंत्र्यांना कुणीच विचारीत नाही व त्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची काढलेली अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करताच प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांचे जाहीर आभार व्यक्त केले.