शहरं
Join us  
Trending Stories
1
२२ एप्रिलचा बदला २२ मिनिटांत घेतला, भारतीयांना अपेक्षित कारवाई केली- पंतप्रधान नरेंद्र मोदी
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान भारताने PoK परत का घेतला नाही? काँग्रेसच्या प्रश्नावर मोदींनी दिलं असं उत्तर  
3
१० मे रोजी युद्धविरामाचा निर्णय कुणाच्या सांगण्यावरून झाला? अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदीचं लोकसभेत मोठं विधान
4
मुंबईत संतापजनक घटना! भावासोबत खेळत असलेल्या १० वर्षांच्या मुलीवर गार्डनमध्ये नेऊन अत्याचार
5
मोबाईल शॉपमध्ये गेली मुलगी, दुकानदाराने आत खेचलं, शटर लावून टाकलं अन् केलं 'दुष्कृत्य'
6
"तुम्ही तर ऑपरेशन सिंदूरच्या रात्रीच युद्धविराम केला, लढण्याची…’’, राहुल गांधींची टीका   
7
Pune Rave Party: 'त्या' रुममध्ये पुन्हा होणार होती रेव्ह पार्टी; तपासातून पोलिसांच्या हाती नवी माहिती
8
"इंदिरा गांधींसारखी हिंमत असेल, तर मोदींनी इथे सांगावं की, डोनाल्ड ट्रम्प खोटारडे आहेत", राहुल गांधींचा हल्लाबोल
9
Nashik Kumbh Mela: शिवीगाळ, हाणामारी अन् जिवे मारण्याच्या धमक्या; पुरोहितांचे दोन गट आमने-सामने
10
कमी किंमतीत टॉप-क्लास फीचर्स; रेडमीच्या बजेट फोनचा बाजारात धमाका!
11
"माफ करणार नाही, रक्ताचा बदला रक्ताने..."; निमिषा प्रियाची फाशी टाळणं आता अशक्य? समोर आलं पत्र
12
Mumbai Water Cut: मुंबईकरांनो पाणी जपून वापरा! गुरुवारी 'या' भागांत १४ तासांसाठी पाणीपुरवठा राहणार बंद
13
Operation Mahadev : 'ऑपरेशन महादेव' नंतर पहलगाममधील दहशतवाद्यांना कसे ओळखले? धक्कादायक माहिती आली समोर
14
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
15
भाजपाची नवी खेळी! महापालिका निवडणुकीआधी काँग्रेसच्या माजी मंत्र्याचा झाला पक्षप्रवेश
16
IND vs ENG : फिल्डिंगसाठी राबलेला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळणार की, नव्या चेहऱ्याला 'लॉटरी' लागणार?
17
WhatsApp: आता कमी प्रकाशातही काढा चांगल्या क्वालिटीचा फोटो, व्हॉट्सअ‍ॅप आणतंय नवीन फिचर!
18
IND vs ENG : कोच गंभीर अन् पिच क्युरेटर यांच्यात वाजलं; पाचव्या टेस्ट आधी नेमकं काय घडलं?
19
मोठी दुर्घटना टळली! अहमदाबादसारखेच अमेरिकेतही बोईंग 787 च्या इंजिनमध्ये बिघाड, उड्डाण होताच पायलट म्हणाला, मेडे, मेडे
20
डिंपल यादव यांच्याबद्दल वादग्रस्त विधान; मौलाना साजिद रशीदींना न्यूज चॅनेलच्या स्टुडिओमध्ये मारहाण

कायदा हातात घेऊन शासनाला अद्दल घडवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2018 00:25 IST

राजापूर : कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेऊन शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सागवे येथील कोचाळी मैदानावर प्रकल्पग्रस्तांसाठी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.कोकण हा निसर्गरम्य ...

राजापूर : कोकणची राखरांगोळी करणारे प्रकल्प लादण्याचे प्रयत्न झाले तर ते अजिबात खपवून घेणार नाही. प्रसंगी हातात कायदा घेऊन शासनाला अद्दल शिकविल्याशिवाय राहणार नाही’, असा हल्लाबोल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला.वादग्रस्त नाणार प्रकल्पाच्या पार्श्वभूमीवर सोमवारी सागवे येथील कोचाळी मैदानावर प्रकल्पग्रस्तांसाठी सभा पार पडली. त्यावेळी ते बोलत होते.कोकण हा निसर्गरम्य आहे; मात्र कोकणात विनाशकारी प्रकल्प आणून या भूमीची राख करण्याचे षङयंत्र रचण्यात आले असून, शिवसेना त्याला विरोध करील अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले. मुख्यमंत्र्यांनी गुजरात काय किंवा नागपूर काय, त्यांना हवा तिकडे हा प्रकल्प न्यावा; पण असा विनाशकारी प्रकल्प कोकणात नको. आमच्या निसर्गाला धोका करणारे प्रकल्प आम्ही अजिबात खपवून घेणार नाही. उद्योगमंत्र्यांनी ती अधिसूचना रद्द केल्याची घोषणा केली आहे. आता येथील भूमीत तो प्रकल्प होणार नाही. नाणार परिसरातील शेतकरी बांधव, बागायतदार, मच्छिमार यांना देशोधडीला लावून कोकणचा विकास नको आहे, असे ठाकरे म्हणाले.नाणार परिसरात मोदी, शहा, जैन अशी मंडळी कधीच वास्तव्याला नव्हती. मग आता ही मंडळी कोठून? परप्रांतातील मंडळींना अगोदर प्रकल्पाची माहिती कशी मिळाली? असे सवाल उपस्थित करीत त्यांनी भाजप सरकारवर निशाणा साधला.यावेळीे उद्योगमंत्री सुभाष देसाई, बांधकाममंत्री एकनाथ शिंदे, आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत, पालकमंत्री रवींद्र वायकर, गृहराज्यमंत्री दीपक केसरकर, सेनेचे सचिव व खासदार विनायक राऊत, सेनेचे विधानसभेतील पक्षप्रतोद आमदार सुनील प्रभू, आमदार वैभव नाईक, आमदार सदानंद चव्हाण, आमदार उदय सामंत, आमदार तृप्ती सावंत, आमदार राजन साळवी, आमदार सत्यजित पाटील, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार चंद्रदीप नरके, आमदार उल्हास पाटील, जिल्हा संपर्कप्रमुख विजय कदम, जिल्हाप्रमुख राजेंद्र्र महाडिक, सचिन कदम, गौरीशंकर खोत, माजी मंत्री रवींद्र्र माने, माजी आमदार गणपत कदम, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा स्नेहा सावंत यासहित सेनेचे पदाधिकारी तसेच रिफायनरीविरोधी संघर्ष समितीचे अध्यक्ष कमलाकर कदम, मज्जीद भाटकर, नाणारचे सरपंच ओमकार प्रभुदेसाई, भाई सामंत यासहित प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.सभेकडे अनेक प्रकल्पग्रस्तांची पाठनाणार प्रकल्पातील भूसंपादनाची अधिसूचना रद्द न करण्यात आल्याने प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांच्या सभेवर बहिष्कार टाकण्याचा इशारा देण्यात आला होता. त्याप्रमाणे अशोक वालम यांच्या गटाचे प्रकल्पग्रस्त या सभेकडे फिरकलेही नाहीत. मात्र, भाई सामंत यांच्या गटाचे प्रकल्पग्रस्त सभेला उपस्थित होते. या सभेला नाणारबाहेरील शिवसेनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर उपस्थित होते.मुख्यमंत्र्यांना कुणी विचारत नाहीजर स्थानिकांचा विरोध असेल तर प्रकल्प लादणार नाही, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी आपल्याला दिले होते. मात्र, केंद्र्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी सौदीशी सामंजस्य करार केला. त्यावरून मुख्यमंत्र्यांना कुणीच विचारीत नाही व त्यांच्या शब्दाला दिल्लीत कवडीचीही किंमत नसल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली.उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी नाणार प्रकल्पाच्या भूसंपादनाची काढलेली अधिसूचना रद्द केल्याची घोषणा करताच प्रकल्पग्रस्तांनी शिवसेना पक्षप्रमुखांचे जाहीर आभार व्यक्त केले.