शहरं
Join us  
Trending Stories
1
सातारा ड्रग्ज प्रकरणात CM फडणवीसांची पहिली मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “पोलिसांचे अभिनंदन करतो की…”
2
"कुठेही लिहिलेलं नाही की, काळे कपडे घालून...!", भाजप नीतीश कुमारांच्या पाठीशी; हिजाबवर बंदी घातली जाणार?
3
विमानतळ क्षेत्रात अदानींची 'उंच झेप'! ११ नवीन विमानतळांसाठी लावणार बोली; IPO कधी येणार?
4
ठरले! अखेर मनसे आता महाविकास आघाडीसोबत निवडणूक लढवणार; काँग्रेस नेत्यांनीच केली मोठी घोषणा
5
Kapil Dev On Gautam Gambhir : गौतम गंभीर कोच नव्हे मॅनेजर! कपिल देव यांनी संदर्भासह दिलं स्पष्टीकरण
6
डंकी रुट प्रकरणात ED ची मोठी कारवाई; 6 KG सोने, 313 KG चांदी अन् ₹4.62 कोटी जप्त
7
‘अर्ज, विनंती करून थकलो, आता शेतात जाण्यासाठी हेलिकॉप्टर द्या’, शेतकऱ्याचं थेट मुख्यमंत्र्यांना पत्र
8
भाजप म्हणतो, ५० जागा सोडूनच बोला! मविआतील घटक पक्षांना एकमेकांच्या हाकेची प्रतिक्षा!
9
“नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव द्या, दुसरे कोणतेही नाव चालणार नाही”: सपकाळ
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात घसरण; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट सोन्याचे दर
11
अपघातग्रस्तांना मदत करणाऱ्यांना २५,००० रुपये मिळणार! नितीन गडकरींची मोठी घोषणा; दीड लाखांपर्यंतचे उपचारही मोफत
12
२०० फूट खोल दरीत कोसळला ट्रक; २४ तास आतमध्ये अडकला ड्रायव्हर, GPS ने वाचवला जीव
13
विश्वास बसणार नाही, पण फक्त ५६ हजार लोकांकडे जगातील ७५ टक्के संपत्ती
14
Leopard: भाईंदरमध्ये धुमाकूळ घालणारा बिबट्या ७ तासांच्या अथक प्रयत्नानंतर जेरबंद!
15
ऐन निवडणुकीत नाशिक येथे भाजपाचं धक्कातंत्र; मोठ्या नेत्याला पदावरुन हटवलं, पक्षात खळबळ
16
मतदानापूर्वीच EVM मध्ये २५ हजार मते कशी असू शकतात?; कारण त्यात 'इतक्या'च मतांचे असते सेटिंग
17
नवीन ड्रोन्स, क्षेणास्त्रे, एअर डिफेन्स सिस्टिम अन्..; 'ऑपरेशन सिंदूर'नंतर संरक्षण बजेट वाढणार
18
श्रीमंत व्हायचंय? मग वयानुसार करा SIP! तज्ज्ञांनी सांगितला प्रत्येक वयोगटासाठी गुंतवणुकीचा फॉर्म्युला
19
दर महिन्याला ४ हजारांची गुंतवणूक, बनेल १३ लाखांचा फंड; ६ लाखांपर्यंतचा थेट नफा, कोणती आहे स्कीम
20
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
Daily Top 2Weekly Top 5

झाडाखालच्या आंब्याचीही दखल घ्या, अन्यथा...

By admin | Updated: May 26, 2014 01:03 IST

कृषी विद्यापीठाचा इशारा : आंबा बागायतदारांना विद्यापीठाचा ‘हाय अ‍ॅलर्ट’

  शिवाजी गोरे - दापोली आंब्याचा राजा हापूस कोकणातील मुख्य पीक म्हणून ओळखला जातो. कोकणातील शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणारे हे पीक अलिकडच्या काळात आंबा बागायतदारांच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात येवू लागले आहे. हंगामादरम्यान खराब आंबे झाडाखाली फेकले जातात किंवा सरतेशेवटी काही आंबे झाडावर सोडून दिले जातात. त्या आंब्यात अळी तयार होते. आंब्यातील अळी जमिनीत कोष तयार करते व पुढील वर्षीच्या हंगामात हीच अळी धोक्याची घंटा बनू शकते. त्यामुळे आंबा बागायतदाराने झाडाखालचा परिसर स्वच्छ करण्याचा ‘हायअ‍ॅलर्ट’ दापोली कोकण कृषी विद्यापीठाने बागायतदारांना दिला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आंब्यावरील संशोधन व काढणी पश्चात व्यवस्थापनावर अभ्यास करीत आहेत. आंब्यावरील रोग व बागायतदारांना उद्भवणार्‍या समस्या याबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करीत आहे. हापूस आंब्यावर करपा किड व फळमाशीचा वारंवार प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी व मोहोर आल्यावर वेळोवेळी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यापीठाकडून शेतकर्‍यांना सल्ला देण्यात येतो. फळधारणा झाल्यापासून तर आंबा काढणीपर्यंत शेतकर्‍यांना सल्ला देण्यात येतो. त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. मात्र आंबा काढणीनंतरसुद्धा काळजी घ्यावयाची असते. याबाबत शेतकर्‍यांना विसर पडू लागला आहे. आंबा हंगामात खराब फळे झाडावरुन खाली पडतात. त्या फळात किडरोग तयार होवून त्यामध्ये अळी तयार होते. ती अळी कालांतराने जमिनीत कोष तयार करते व जमिनीखाली रोगजंतू तयार होतात. ते रोगजंतू पुन्हा कालांतराने आंब्याच्या झाडावर येतात. काहीवेळा हंगामाच्या शेवटी कच्ची फळे झाडावर ठेवली जाते. ती फळे झाडावर पिकून खाली पडतात. झाडाखाली त्यांच्यात रोगजंतू तयार होतात. झाडाखाली पडलेला आंब्याचा खच तयार होतो. त्यातून रोगाची निर्मिती होते. त्यामुळे आंबा पीक घेण्यापूर्वी व आंबा पीक घेतल्यानंतरसुद्धा शेतकर्‍याने झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. आंबा काढणी पश्चात व्यवस्थापनसुद्धा तितकेच महत्वाचे असल्याने शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना आंबा बागांची काळजी घेण्यासाठी प्रबोधन सुरु केले आहे. हापूस तयार होण्यापूर्वी त्याची कातडी पातळ व नरम होवू लागतात. फळमाशीचा प्रादुर्भाव होवू लागतो. फळमाशी आंब्याला छिद्र पाडून त्यात २०० ते ३०० अंडी घालते. अंडी दोन ते तीन दिवसात उबळून त्यात अळी तयार होते. आंब्यातील गर असेपर्यंत १२ ते १५ दिवस त्या अळ्या आंब्यातच असतात. त्यानंतर मात्र त्या जमिनीत जातात व कोष तयार करुन जमिनीत रहातात. तेथेच रोगाचे केंद्र निर्माण करतात. त्यामुळे आंब्याच्या झाडाखालची जागा झाडून कचरा गोळा करुन जाळून टाकणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.