शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करप्रमुख असीम मुनीरचे प्रमोशन; पराभूत जनरलला सरकारने बनवले 'फील्ड मार्शल'
2
छगन भुजबळांच्या मंत्रिमंडळात एन्ट्रीने नाशिकचा दबदबा, पण पालकमंत्रिपदाचा पेचही वाढला?
3
Thane: कल्याणमध्ये चार मजली इमारतीत स्लॅब कोसळून भयंकर दुर्घटना, चार जणांचा मृत्यू 
4
ठरलं ! जगातील सर्वात मोठ्या स्टेडियमवर रंगणार IPL फायनल; या मैदानात होणार प्लेऑफ्सचे २ सामने
5
पाकिस्तानने आपल्याच नागरिकांवर केला ड्रोन हल्ला, चार मुलांचा मृत्यू
6
"सरन्यायाधीश गवई यांच्या महाराष्ट्र दौऱ्यात प्रोटोकॉलचा भंग करणाऱ्यांवर करावाई करा’’, काँग्रेसचं राष्ट्रपतींना पत्र  
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारतासमोर नवे आव्हान; दहशतवाद्यांकडून इंडियन आर्मी युनिफॉर्मचा वापर
8
"...तेव्हाच आम्ही हस्तक्षेप करू’’, वक्फ सुधारणा कायद्यावरील सुनावणीवेळी सरन्यायाधीशांनी केलं स्पष्ट 
9
'ऑपरेशन सिंदूर’ला छोटीशी लढाई म्हणत मल्लिकार्जुन खर्गेंचा मोदींना सवाल, म्हणाले...   
10
"हे खूपच धक्कादायक..."; मॉर्फ केलेले फोटो, खोट्या बातम्या पाहून प्रिती झिंटा भडकली, म्हणाली...
11
Online Gaming Addiction: ऑनलाईन गेमचा नादच लय वाईट...; कर्जात बुडालेल्या तरुणानं उचललं टोकाचं पाऊल
12
'ढोंगी आणि बकवास लेकाचे'; छगन भुजबळ मंत्री होताच संजय राऊतांनी कोणावर डागली तोफ?
13
Ulhasnagar: आता उल्हासनगरात गुन्हेगारांवर 'अशी' ठेवली जाणार नजर!
14
दिग्वेश राठीनं शायनिंग मारण्याच्या नादात IPL पगारातील किती रक्कम उडवली माहितीये?
15
केंद्र सरकारच्या शिष्टमंडळात सामील होण्यास उद्धव ठाकरेंचा होकार, खा. प्रियंका चतुर्वेदींची निवड
16
IPL 2025: SRHचा हर्षल पटेल ठरला मलिंगा-बुमराहपेक्षाही 'वेगवान'; केला ऐतिहासिक पराक्रम
17
'आम्हाला चिनी क्षेपणास्त्र PL-15E चे अवशेष हवेत'; जपान अन् फ्रान्ससह अनेक देशांची मागणी
18
धक्कादायक! तुमच्या जवळच्या 'या' ७ गोष्टी टॉयलेट सीटपेक्षाही घाणेरड्या; लपलेत लाखो बॅक्टेरिया
19
बाजारात 'रेड अलर्ट'! सेन्सेक्स-निफ्टी सलग तिसऱ्या दिवशी खाली, ऑटो-डिफेन्स कोसळले, DLF मात्र तेजीत
20
Tamil Nadu Landslide: मोठी दुर्घटना! तामिळनाडूत दगड खाणीत भूस्खलन झाल्याने ४ कामगार ठार, एक जखमी

झाडाखालच्या आंब्याचीही दखल घ्या, अन्यथा...

By admin | Updated: May 26, 2014 01:03 IST

कृषी विद्यापीठाचा इशारा : आंबा बागायतदारांना विद्यापीठाचा ‘हाय अ‍ॅलर्ट’

  शिवाजी गोरे - दापोली आंब्याचा राजा हापूस कोकणातील मुख्य पीक म्हणून ओळखला जातो. कोकणातील शेतकर्‍यांना आर्थिक सुबत्ता मिळवून देणारे हे पीक अलिकडच्या काळात आंबा बागायतदारांच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात येवू लागले आहे. हंगामादरम्यान खराब आंबे झाडाखाली फेकले जातात किंवा सरतेशेवटी काही आंबे झाडावर सोडून दिले जातात. त्या आंब्यात अळी तयार होते. आंब्यातील अळी जमिनीत कोष तयार करते व पुढील वर्षीच्या हंगामात हीच अळी धोक्याची घंटा बनू शकते. त्यामुळे आंबा बागायतदाराने झाडाखालचा परिसर स्वच्छ करण्याचा ‘हायअ‍ॅलर्ट’ दापोली कोकण कृषी विद्यापीठाने बागायतदारांना दिला आहे. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे शास्त्रज्ञ आंब्यावरील संशोधन व काढणी पश्चात व्यवस्थापनावर अभ्यास करीत आहेत. आंब्यावरील रोग व बागायतदारांना उद्भवणार्‍या समस्या याबाबत विद्यापीठ शास्त्रज्ञ अहोरात्र संशोधन करीत आहे. हापूस आंब्यावर करपा किड व फळमाशीचा वारंवार प्रादुर्भाव जाणवू लागला आहे. आंब्याला मोहोर येण्यापूर्वी व मोहोर आल्यावर वेळोवेळी घ्यावयाच्या काळजीबाबत विद्यापीठाकडून शेतकर्‍यांना सल्ला देण्यात येतो. फळधारणा झाल्यापासून तर आंबा काढणीपर्यंत शेतकर्‍यांना सल्ला देण्यात येतो. त्याचे काटेकोरपणे पालन केले जाते. मात्र आंबा काढणीनंतरसुद्धा काळजी घ्यावयाची असते. याबाबत शेतकर्‍यांना विसर पडू लागला आहे. आंबा हंगामात खराब फळे झाडावरुन खाली पडतात. त्या फळात किडरोग तयार होवून त्यामध्ये अळी तयार होते. ती अळी कालांतराने जमिनीत कोष तयार करते व जमिनीखाली रोगजंतू तयार होतात. ते रोगजंतू पुन्हा कालांतराने आंब्याच्या झाडावर येतात. काहीवेळा हंगामाच्या शेवटी कच्ची फळे झाडावर ठेवली जाते. ती फळे झाडावर पिकून खाली पडतात. झाडाखाली त्यांच्यात रोगजंतू तयार होतात. झाडाखाली पडलेला आंब्याचा खच तयार होतो. त्यातून रोगाची निर्मिती होते. त्यामुळे आंबा पीक घेण्यापूर्वी व आंबा पीक घेतल्यानंतरसुद्धा शेतकर्‍याने झाडांची काळजी घेणे गरजेचे आहे. आंबा काढणी पश्चात व्यवस्थापनसुद्धा तितकेच महत्वाचे असल्याने शास्त्रज्ञांनी शेतकर्‍यांना आंबा बागांची काळजी घेण्यासाठी प्रबोधन सुरु केले आहे. हापूस तयार होण्यापूर्वी त्याची कातडी पातळ व नरम होवू लागतात. फळमाशीचा प्रादुर्भाव होवू लागतो. फळमाशी आंब्याला छिद्र पाडून त्यात २०० ते ३०० अंडी घालते. अंडी दोन ते तीन दिवसात उबळून त्यात अळी तयार होते. आंब्यातील गर असेपर्यंत १२ ते १५ दिवस त्या अळ्या आंब्यातच असतात. त्यानंतर मात्र त्या जमिनीत जातात व कोष तयार करुन जमिनीत रहातात. तेथेच रोगाचे केंद्र निर्माण करतात. त्यामुळे आंब्याच्या झाडाखालची जागा झाडून कचरा गोळा करुन जाळून टाकणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.