शहरं
Join us  
Trending Stories
1
"मलाही वाटतं मी मुख्यमंत्री व्हावं, पण..."; अजित पवार यांना असं का म्हणावंसं वाटलं? नेमका विषय काय?
2
गिल ने जीता दिल! गुजरातचं धडाकेबाज 'कमबॅक', काव्या मारनचा SRH संघ स्पर्धेतून जवळपास OUT!
3
विराट कोहलीने अवनीत कौरच्या 'त्या' फोटोला केलं Like, ट्रोल झाल्यावर स्पष्टीकरण देत म्हणाला...
4
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
5
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
6
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
7
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
8
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
9
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
10
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
11
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
12
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
13
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
14
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
15
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
16
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
17
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
18
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
19
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
20
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 

मुलांची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरु शकते, असा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ...

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरु शकते, असा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपले तरीही मुलांना विनाकारण घराबाहेर सोडू नका, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कारवाईची मागणी

खेड : तालुक्यातील शिरगाव - पिंपळवाडी धरण ८० फुटापर्यंत आटले आहे. मात्र या धरणातून बेकादेशीररित्या अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सरपंच आणि उपसरपंचांनी अवैध वाळू उपसा थांबविण्याबाबत प्रशासनाला कळविले आहे.

रस्ते चिखलमय

रत्नागिरी : शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत खणून ठेवण्यात आले आहे. मात्र, शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. सोमवारी पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर हा चिखल अधिकच त्रासदायक होऊ लागल्याने दुचाकीस्वारांना त्रासदायक झाले.

मुहूर्त हुकला

रत्नागिरी : गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट सर्व सणांवर पसरलेले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही अक्षयतृतीयेवर कोरोनाचे सावट कायम होते. त्यामुळे यावर्षीही बांधकाम व्यावसायिकांना ग्राहक न मिळाल्याने जुन्या प्रकल्पातील घरे विक्रीविना पडून राहिली. गुढीपाडव्यानंतर अक्षयतृतीयाही कोरडीच गेली.

घरावरील कौले उडाली

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली या गावालाही चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. या गावातील साईनगर गणपतीच्या देवळाजवळ असलेल्या संतोष सोमण यांच्या घरावरील कौले उडून गेली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतर भागांतही अनेक झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : येथील विनायक केळकर यांनी लिहिलेला नर्मदा परिक्रमाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. नर्मदेची सुमारे ३५०० किलोमीटरची परीक्रमा चार महिन्यांत पूर्ण करून त्यांनी घेतलेले अनुभव या पुस्तकात कथन करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने घरगुती स्वरुपात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पुन्हा उकाडा वाढला

रत्नागिरी : चक्रीवादळामुळे शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. सोमवारी सकाळी ९ वाजल्यानंतर पाऊस थांबल्यानंतर वातावरणातील गारवा नाहीसा होऊन उकाड्यात वाढ झाली. त्यानंतर उन्हाची तीव्रताही हळूहळू वाढू लागली.

सुटकेचा नि:श्वास

राजापूर : रविवारी सकाळी दाखल होणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाच्या भीतीने तालुक्यातील जनता ईश्वराची करूणा भाकत होती. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू लागताच नागरिकांमध्य मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली होती. मात्र, वादळ पुढे निघून गेल्याने आता सर्व शांत झाले आहे.

थोडासा दिलासा

रत्नागिरी : जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडासा दिलासा मिळत आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मास्कचा वापर घटला

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या म्हणावी तितकी कमी होत नसली तरीही नागरिकांमध्ये मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी दिसून येत आहे. अजूनही काही व्यक्ती बाहेर फिरताना विनामास्क फिरत आहेत. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने दुहेरी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असले तरी काहीजण एकही मास्क न वापरता फिरत आहेत.