शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले, डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा एकदा दावा, पाच विमाने पाडल्याच्या दाव्याची पुनरावृत्ती
2
आजचे राशीभविष्य, १० ऑगस्ट २०२५: ७ राशींना शुभ दिवस, सरकारी कामात यश; धनलाभ योग
3
लाडकी बहीण योजनेचे पैसे योग्य वेळी वाढवणार; योजनेत भ्रष्टाचार असल्याचा मुख्यमंत्र्यांनी केला इन्कार
4
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये कोण जिंकलं? सेना प्रमुखांनी पाकिस्तानला थेट उत्तर दिलं! म्हणाले...
5
वाराणसीच्या मंदिरात पूजेदरम्यान आग; पूजाऱ्यासह ९ जण होरपळले, ४ जणांची प्रकृती गंभीर  
6
साप्ताहिक राशीभविष्य: मोठी जोखीम टाळा, पैसे उसने देऊ नये; ८ राशींना लाभ, सुख-सुबत्ता-कल्याण!
7
विद्यार्थ्यांची जबाबदारी शासन घेणार का? गणपती विसर्जन, दहीहंडीची सुट्टी रद्द केल्याने शिक्षक नाराज
8
फसवणुकीच्या गुन्ह्यातील कैद्यांनी चार तास ढोसली दारू! ऑन ड्युटी नसलेल्या पाेलिस हवालदाराचा ‘हात’
9
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
10
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
11
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
12
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
13
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
14
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
15
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
16
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
17
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
18
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
19
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
20
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य

मुलांची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरु शकते, असा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ...

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरु शकते, असा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपले तरीही मुलांना विनाकारण घराबाहेर सोडू नका, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कारवाईची मागणी

खेड : तालुक्यातील शिरगाव - पिंपळवाडी धरण ८० फुटापर्यंत आटले आहे. मात्र या धरणातून बेकादेशीररित्या अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सरपंच आणि उपसरपंचांनी अवैध वाळू उपसा थांबविण्याबाबत प्रशासनाला कळविले आहे.

रस्ते चिखलमय

रत्नागिरी : शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत खणून ठेवण्यात आले आहे. मात्र, शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. सोमवारी पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर हा चिखल अधिकच त्रासदायक होऊ लागल्याने दुचाकीस्वारांना त्रासदायक झाले.

मुहूर्त हुकला

रत्नागिरी : गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट सर्व सणांवर पसरलेले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही अक्षयतृतीयेवर कोरोनाचे सावट कायम होते. त्यामुळे यावर्षीही बांधकाम व्यावसायिकांना ग्राहक न मिळाल्याने जुन्या प्रकल्पातील घरे विक्रीविना पडून राहिली. गुढीपाडव्यानंतर अक्षयतृतीयाही कोरडीच गेली.

घरावरील कौले उडाली

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली या गावालाही चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. या गावातील साईनगर गणपतीच्या देवळाजवळ असलेल्या संतोष सोमण यांच्या घरावरील कौले उडून गेली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतर भागांतही अनेक झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : येथील विनायक केळकर यांनी लिहिलेला नर्मदा परिक्रमाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. नर्मदेची सुमारे ३५०० किलोमीटरची परीक्रमा चार महिन्यांत पूर्ण करून त्यांनी घेतलेले अनुभव या पुस्तकात कथन करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने घरगुती स्वरुपात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पुन्हा उकाडा वाढला

रत्नागिरी : चक्रीवादळामुळे शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. सोमवारी सकाळी ९ वाजल्यानंतर पाऊस थांबल्यानंतर वातावरणातील गारवा नाहीसा होऊन उकाड्यात वाढ झाली. त्यानंतर उन्हाची तीव्रताही हळूहळू वाढू लागली.

सुटकेचा नि:श्वास

राजापूर : रविवारी सकाळी दाखल होणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाच्या भीतीने तालुक्यातील जनता ईश्वराची करूणा भाकत होती. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू लागताच नागरिकांमध्य मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली होती. मात्र, वादळ पुढे निघून गेल्याने आता सर्व शांत झाले आहे.

थोडासा दिलासा

रत्नागिरी : जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडासा दिलासा मिळत आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मास्कचा वापर घटला

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या म्हणावी तितकी कमी होत नसली तरीही नागरिकांमध्ये मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी दिसून येत आहे. अजूनही काही व्यक्ती बाहेर फिरताना विनामास्क फिरत आहेत. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने दुहेरी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असले तरी काहीजण एकही मास्क न वापरता फिरत आहेत.