शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

मुलांची काळजी घ्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2021 04:32 IST

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरु शकते, असा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे ...

रत्नागिरी : कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक ठरु शकते, असा धोका आरोग्य तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे लॉकडाऊन संपले तरीही मुलांना विनाकारण घराबाहेर सोडू नका, असे आवाहन तज्ज्ञांनी केले आहे. ऑगस्ट किंवा सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

कारवाईची मागणी

खेड : तालुक्यातील शिरगाव - पिंपळवाडी धरण ८० फुटापर्यंत आटले आहे. मात्र या धरणातून बेकादेशीररित्या अवैधरित्या वाळू उपसा करण्यात येत आहे. त्यामुळे शासनाचे लाखो रुपयांचे नुकसान होत आहे. सरपंच आणि उपसरपंचांनी अवैध वाळू उपसा थांबविण्याबाबत प्रशासनाला कळविले आहे.

रस्ते चिखलमय

रत्नागिरी : शहर आणि परिसरात अनेक ठिकाणी रस्त्यालगत खणून ठेवण्यात आले आहे. मात्र, शनिवारी रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे या रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर चिखल निर्माण झाला आहे. सोमवारी पाऊस थोडासा कमी झाल्यानंतर हा चिखल अधिकच त्रासदायक होऊ लागल्याने दुचाकीस्वारांना त्रासदायक झाले.

मुहूर्त हुकला

रत्नागिरी : गेल्या वर्षापासून कोरोनाचे संकट सर्व सणांवर पसरलेले आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही अक्षयतृतीयेवर कोरोनाचे सावट कायम होते. त्यामुळे यावर्षीही बांधकाम व्यावसायिकांना ग्राहक न मिळाल्याने जुन्या प्रकल्पातील घरे विक्रीविना पडून राहिली. गुढीपाडव्यानंतर अक्षयतृतीयाही कोरडीच गेली.

घरावरील कौले उडाली

देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील साडवली या गावालाही चक्रीवादळाचा तडाखा मोठ्या प्रमाणावर बसला. या गावातील साईनगर गणपतीच्या देवळाजवळ असलेल्या संतोष सोमण यांच्या घरावरील कौले उडून गेली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. इतर भागांतही अनेक झाडे पडल्याच्या घटना घडल्या आहेत.

पुस्तकाचे प्रकाशन

चिपळूण : येथील विनायक केळकर यांनी लिहिलेला नर्मदा परिक्रमाचे प्रकाशन नुकतेच करण्यात आले. नर्मदेची सुमारे ३५०० किलोमीटरची परीक्रमा चार महिन्यांत पूर्ण करून त्यांनी घेतलेले अनुभव या पुस्तकात कथन करण्यात आले आहे. कोरोनाच्या अनुषंगाने घरगुती स्वरुपात या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले.

पुन्हा उकाडा वाढला

रत्नागिरी : चक्रीवादळामुळे शनिवारी रात्रीपासून मुसळधार पावसाला सुरुवात झाली. रविवारी दिवसभर पावसाची संततधार होती. सोमवारी सकाळी ९ वाजल्यानंतर पाऊस थांबल्यानंतर वातावरणातील गारवा नाहीसा होऊन उकाड्यात वाढ झाली. त्यानंतर उन्हाची तीव्रताही हळूहळू वाढू लागली.

सुटकेचा नि:श्वास

राजापूर : रविवारी सकाळी दाखल होणाऱ्या तौक्ते चक्रीवादळाच्या भीतीने तालुक्यातील जनता ईश्वराची करूणा भाकत होती. या वादळामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान होणार असा अंदाज हवामान खात्याकडून वर्तविण्यात आला होता. जोरदार वाऱ्यासह पाऊस पडू लागताच नागरिकांमध्य मोठ्या प्रमाणावर भीती निर्माण झाली होती. मात्र, वादळ पुढे निघून गेल्याने आता सर्व शांत झाले आहे.

थोडासा दिलासा

रत्नागिरी : जिल्ह्यात काही ठिकाणी कोरोना रुग्णसंख्या कमी होऊ लागली आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला थोडासा दिलासा मिळत आहे. गेल्या दीड वर्षापासून आरोग्य यंंत्रणा कोरोनाशी लढा देत आहे. कोरोनाला कायमस्वरूपी हद्दपार करण्यासाठी नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

मास्कचा वापर घटला

रत्नागिरी : कोरोना रुग्णांची संख्या म्हणावी तितकी कमी होत नसली तरीही नागरिकांमध्ये मात्र अजूनही मोठ्या प्रमाणावर बेफिकिरी दिसून येत आहे. अजूनही काही व्यक्ती बाहेर फिरताना विनामास्क फिरत आहेत. दुसऱ्या लाटेतील कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असल्याने दुहेरी मास्क वापरण्याचे आवाहन केले जात असले तरी काहीजण एकही मास्क न वापरता फिरत आहेत.