शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
2
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या
3
'एक रुपयाही न देता व्यवहार झाला, चुकीचे अधिकारी होते की कोण याची चौकशी करणार'; अजित पवारांनी जमीन व्यवहार प्रकरणी स्पष्टच सांगितलं
4
नांदेड हादरलं! सहा वर्षीय चिमुकलीवर २२ वर्षीय तरुणाचे अत्याचार; आरोपीला फाशीची मागणी
5
दिल्लीनंतर आता काठमांडू विमानतळावर तांत्रिक बिघाड, सर्व विमान वाहतूक थांबली
6
TET Exam: नियुक्ती वेळी पात्रता नव्हती म्हणून सेवेतून काढता येणार नाही; टीईटी उत्तीर्ण शिक्षकांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाचा निकाल
7
खुर्चीसाठी भांडल्या, व्हिडिओ वायरल आणि आता निलंबन ! पीएमजी शोभा मधाळे यांचे अनिश्चित काळासाठी निलंबन
8
धावत्या दुचाकीवर तरुणीची छेडछाड, 'त्या' रॅपिडो चालकाला बेड्या; व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांची कारवाई
9
नार्को टेस्ट होणार? धनंजय मुंडेंच्या आरोपानंतर मनोज जरांगे पाटील यांचा थेट पोलीस अधीक्षकांकडे अर्ज 
10
'या' राज्यात स्थानिक निवडणुकीत भाजपानं बिनविरोध ७५% जागा जिंकल्या; आज निकालातही 'क्लीन स्वीप'
11
आधी विष घेतलं पण वाचला, नंतर सागरने तलावात उडी घेत संपवले आयुष्य; असं काय घडलं? 
12
पाकिस्तानने अफगाणिस्तानातील निवासी भागाला लक्ष्य केले, सहा नागरिकांचा मृत्यू
13
अमेरिकन प्रेस सेक्रेटरीवर फिदा, 'या' देशाच्या पंतप्रधानांची मोठी ऑफर, डोनाल्ड ट्रम्पही हैराण
14
"ही आमच्यासमोरील डोकेदुखी आहे, पण..." ऑस्ट्रेलियात मैदान मारूनही असं का म्हणाला सूर्या?
15
Mumbai Local Mega Block: रविवारी तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक; कधी, कुठे आणि कितीवाजेपर्यंत गाड्या बंद? वाचा
16
"भैया क्या कर रहे हो...!"; बेंगलोरमध्ये Rapido कॅप्टनच्या महिलेसोबतच्या कृत्यावर कंपनीची रिअ‍ॅक्शन
17
बिहारमध्ये रस्त्यावर सापडल्या VVPAT स्लिप्स! निवडणूक आयोगाने ARO ला निलंबित केले, FIR दाखल करण्याचे आदेश दिले
18
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
19
कारमध्ये गर्लफ्रेंड-बॉयफ्रेंड किस करत असतील तर पोलीस पकडू शकता? काय सांगतो नियम? जाणून घ्या
20
"निवडणुकीत बुडण्याची प्रॅक्टिस...!" राहुल गांधींच्या तलावातील उडीवरून पंतप्रधान मोदींचा टोला; RJD वरही निशाणा, स्पष्टच बोलले

अंत्यसंस्कार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा : अभिजित गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

राजापूर : शहरातील कोंढेतड येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर धार्मिक विधी करून करण्यात आलेला अंत्यसंस्कार हा प्रकार ...

राजापूर : शहरातील कोंढेतड येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर धार्मिक विधी करून करण्यात आलेला अंत्यसंस्कार हा प्रकार अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनाने दाखविलेला बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. याप्रकरणी ज्यांनी हा कोरोनाबाधित मृतदेह राजापुरात आणण्याचा अट्टाहास केला ते लोकप्रतिनिधी आणि पुढारी व नगर परिषद प्रशासन यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बाेलताना अभिजित गुरव म्हणाले की, मृतदेहावर कोरोनाच्या नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील असे तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्यापुढे सांगणाऱ्या नगराध्यक्षांनी अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून अंत्यविधी केले जात असल्याची माहिती असूनही ते गप्प का राहिले, असा प्रश्नही गुरव यांनी केला आहे. यामुळे जर का शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगराध्यक्ष आणि नगर परिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही गुरव यांनी दिला आहे.

कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृतदेहावर त्या त्या ठिकाणी अंत्यसंस्कार व दफनविधी केले जात असताना या व्यक्तीचा मृतदेह राजापुरात आणण्यासाठी दबाव कुणी टाकला, हा अट्टाहास कशासाठी करण्यात आला, ते लोकप्रतिनिधी आणि पुढारी कोण, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गुरव यांनी केली आहे. तसेच दफनविधीसाठी मृतदेह राजापूरला आणण्यासाठी राजापूर नगर परिषदेने जो ना हरकत दाखला दिला तो कसा काय आणि कोणाच्या दबावाखाली दिला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

मात्र या प्रकरणात नगर परिषदेनेच व्हिडिओ व्हायलर झाल्यानंतर व वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून, या प्रकाराला नगर परिषद प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. लांजा नगरपंचायत, राजापूर नगर परिषदेचा आणि मृतदेह राजापुरात आणण्यासाठी दबावाचे राजकारण करणारे लोकप्रतिनिधी तेवढेच जबाबदार असल्याचे गुरव यांनी म्हटले आहे.