शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

अंत्यसंस्कार प्रकरणातील दोषींवर कारवाई करा : अभिजित गुरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2021 04:23 IST

राजापूर : शहरातील कोंढेतड येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर धार्मिक विधी करून करण्यात आलेला अंत्यसंस्कार हा प्रकार ...

राजापूर : शहरातील कोंढेतड येथील कोरोनाबाधित व्यक्तीचा मृतदेह बाहेर काढून त्याच्यावर धार्मिक विधी करून करण्यात आलेला अंत्यसंस्कार हा प्रकार अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे. याप्रकरणी स्थानिक लोकप्रतिनिधी आणि नगर परिषद प्रशासनाने दाखविलेला बेजबाबदारपणा कारणीभूत आहे. याप्रकरणी ज्यांनी हा कोरोनाबाधित मृतदेह राजापुरात आणण्याचा अट्टाहास केला ते लोकप्रतिनिधी आणि पुढारी व नगर परिषद प्रशासन यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी भाजप तालुकाध्यक्ष अभिजित गुरव यांनी केली आहे.

प्रसारमाध्यमांशी बाेलताना अभिजित गुरव म्हणाले की, मृतदेहावर कोरोनाच्या नियमांचे पालन करून अंत्यसंस्कार करण्यात येतील असे तहसीलदार प्रतिभा वराळे यांच्यापुढे सांगणाऱ्या नगराध्यक्षांनी अशा प्रकारे नियम धाब्यावर बसवून अंत्यविधी केले जात असल्याची माहिती असूनही ते गप्प का राहिले, असा प्रश्नही गुरव यांनी केला आहे. यामुळे जर का शहरात आणि तालुक्यात कोरोनाचा उद्रेक झाला तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही नगराध्यक्ष आणि नगर परिषद प्रशासनाची राहील, असा इशाराही गुरव यांनी दिला आहे.

कोरोनाबाधित व्यक्तींच्या मृतदेहावर त्या त्या ठिकाणी अंत्यसंस्कार व दफनविधी केले जात असताना या व्यक्तीचा मृतदेह राजापुरात आणण्यासाठी दबाव कुणी टाकला, हा अट्टाहास कशासाठी करण्यात आला, ते लोकप्रतिनिधी आणि पुढारी कोण, त्याचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी गुरव यांनी केली आहे. तसेच दफनविधीसाठी मृतदेह राजापूरला आणण्यासाठी राजापूर नगर परिषदेने जो ना हरकत दाखला दिला तो कसा काय आणि कोणाच्या दबावाखाली दिला, याचीही चौकशी होणे आवश्यक आहे.

मात्र या प्रकरणात नगर परिषदेनेच व्हिडिओ व्हायलर झाल्यानंतर व वरिष्ठांच्या आदेशानंतर पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. हा प्रकार म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असून, या प्रकाराला नगर परिषद प्रशासनच जबाबदार असल्याचा आरोप गुरव यांनी केला आहे. लांजा नगरपंचायत, राजापूर नगर परिषदेचा आणि मृतदेह राजापुरात आणण्यासाठी दबावाचे राजकारण करणारे लोकप्रतिनिधी तेवढेच जबाबदार असल्याचे गुरव यांनी म्हटले आहे.