शहरं
Join us  
Trending Stories
1
गस्त वाढवा, ‘त्या’ हँडल्सवर लक्ष ठेवा, वरिष्ठांच्या सुट्या रद्द; CM फडणवीसांकडून महत्त्वाचे निर्देश
2
“उद्धव ठाकरे सत्तेत कमी विरोधी पक्षात जास्त राहिले, कारखाने वाचवण्यासाठी सत्ता नको”: राऊत
3
“भविष्यात STच्या नव्या बसेस हायब्रीड इंधनावर, डिझेलच्या पर्यायांचा विचार आवश्यक”: सरनाईक
4
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर भारतीय रेल्वेचा मोठा निर्णय, उधमपूर-जम्मू-दिल्ली विशेष ट्रेन चालवणार
5
Mumbai: पिझ्झा देण्याच्या बहाण्याने घरी नेले आणि...; आठ वर्षाच्या चिमुकलीसोबत शेजाऱ्याचे संतापजनक कृत्य
6
भारत-पाक संघर्षाचा बाजारावर दबाव! आठवड्यात ३ टक्के घसरण; फक्त 'या' सेक्टरमध्ये तेजी
7
भारत-पाक तणावादरम्यान एअरटेलच्या अध्यक्षांचा मोठा निर्णय, चिनी कंपनीसोबत करणार हातमिळवणी?
8
IPL 2025: आयपीएल रद्द होणार की, उर्वरित सामनेही खेळवले जाणार? बीसीसीआयनं घेतला 'हा' निर्णय
9
India Pakistan: एटीएम २-३ दिवस बंद राहणार? व्हायरल मेसेजबद्दल सरकारने केला खुलासा
10
महामृत्युंजय मंत्र कधी व कोणासाठी म्हणावा? त्यामुळे नेमका कसा लाभ होतो? जाणून घ्या!
11
Operation Sindoor Live Updates: राज्यांना आपत्कालीन अधिकारांचा वापर करण्याची परवानगी, गृह मंत्रालयाचा निर्णय
12
India Pakistan Update: हवाई दलाच्या लढाऊ विमानांसाठी ओझरचे एचएएल 'हाय अलर्ट'वर !
13
हा दिग्गज १०८ अब्ज डॉलर्सची संपत्ती दान करणार; ठरणार आजवरचं सर्वात मोठं परोपकारी कार्य
14
भारतीय सेनेचा 'सुपर हीरो', पाकिस्तानच्या नाकीनऊ आणलं! काय आहे 'आकाश'मध्ये खास?
15
'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
16
जगा आणि जगू द्या..; मेहबूबा मुफ्तींचे रडत-रडत भारत आणि पाकिस्तानच्या प्रमुखांना आवाहन
17
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर RSSची मोदी सरकारच्या पाठीवर कौतुकाची थाप, भारतीय सैन्याचे केले अभिनंदन
18
Gold Price 9 May : भारत-पाक तणावादरम्यान सोन्याच्या दरात पुन्हा घसरण, खरेदीपूर्वी पाहा काय आहेत नवे दर?
19
India Pakistan War: 'आमचे पंतप्रधान भित्रे, ते मोदींचे नाव घ्यायला घाबरतात'; पाकिस्तानी खासदाराने त्यांच्याच सरकारला सुनावले
20
"सत्याला अभिनय करु नको असं सांगितलंय", महेश मांजरेकरांचा लेकाबद्दल खुलासा, म्हणाले- "ट्रोल केल्यावर मी..."

गुंतवलेल्या रकमेसाठी तगादा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:30 IST

रत्नागिरी : शासनाची विविध कामे करताना गेल्या वर्षभरात अनेकांना कामे मिळाली नाहीत. कोरोनामुळे मंदी निर्माण झाली आहे. त्यातच शासनाकडून ...

रत्नागिरी : शासनाची विविध कामे करताना गेल्या वर्षभरात अनेकांना कामे मिळाली नाहीत. कोरोनामुळे मंदी निर्माण झाली आहे. त्यातच शासनाकडून नवीन कामांना होणारा विलंब पाहता गुंतविलेले पैसे परत मिळावेत म्हणून विविध विभागांत ठेकेदारांनी तगादा लावण्यास सुरुवात केली आहे.

अखेर पोल बदलला

देवरूख : संगमेश्वर तालुक्यातील कसबा दखनी मोहल्ला तालाब मशिदीसमोरील विद्युतखांब धोकादायक झाला होता. नवीन खांब बदलण्याची मागणी ग्रामस्थांकडून महावितरणकडे करण्यात येत होती. मात्र, त्याकडे दुर्लक्ष केले जात होते. अखेर, ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केल्याने हा धोकादायक पोल बदलण्यात आला आहे.

वीजपुरवठा खंडित

रत्नागिरी : शहरात सध्या सातत्याने वीजपुरवठा खंडित होऊ लागला आहे. सध्या उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे घरी अथवा कामाच्या ठिकाणी सतत पंखे सुरू ठेवावे लागत आहेत. आधीच उष्म्याने हैराण केले असतानाच वीजपुरवठा सतत खंडित होऊ लागल्याने उकाड्याने नागरिक त्रस्त होत आहेत.

मासिक संगीत सभा

देवरूख : शहरातील ललित कला अकादमीची मार्च महिन्याची मासिक संगीत सभा तबलावादनाने रंगली. या संगीत सभेत अकादमीचे विद्यार्थी संचित मुळे आणि ओंकार ब्रिद यांनी सोलो तबलावादन केले. या कार्यक्रमाचा लाभ शहरातील अनेक रसिकांनी घेतला.

आंब्याची गळ वाढली

जाकादेवी : यंदा पाऊस नोव्हेंबरपर्यंत लांबल्याने आंबा कलमांना दुबार मोहोर येण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. यामुळे कैरीवरही परिणाम होत आहे. याचबरोबर सध्या तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ होऊ लागली आहे. त्यामुळे आंब्याची गळही वाढू लागली आहे.

निर्बंध घालण्याची मागणी

चिपळूण : शहरातील साने गुरुजी उद्यानाचे उद्घाटन नुकतेच झाले आहे. त्यामुळे सायंकाळच्या वेळी नागरिक आणि बालके मोठ्या प्रमाणावर या उद्यानात गर्दी करत आहेत. परंतु, सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागला आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन या उद्यानातील प्रवेशावर निर्बंध घालण्याची मागणी करण्यात येत आहे.

स्वच्छतागृह भूमिपूजन

राजापूर : तालुक्यातील कशेळी आवळीचीवाडी येथे कोकण ग्रामीण पर्यटन विकास कार्यक्रमांतर्गत स्वच्छतागृह बांधणे व रेलिंग बसविणे, या कामाचे जागामालक योगेश यादव यांच्या हस्ते भूमिपूजन झाले. हा उपक्रम खासदार विनायक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली आणि आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली झाला.

केळवली संघ विजेता

राजापूर : तालुक्यातील गोठणे दोनिवडे येथील भीमशक्ती क्रिकेट क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या अंडरआर्म क्रिकेट स्पर्धेत बीसीसी केळवली संघाने विजेतेपद पटकावले. तर, एनसीसी राघववाडी संघाला उपविजेतेपद मिळाले. मान्यवरांच्या हस्ते या दोन्ही संघांना गौरविण्यात आले.

निधी खर्चाची धावपळ

दापोली : ३१ मार्च जवळ आल्याने विविध शासकीय कार्यालयांकडे आलेला निधी विविध कामांसाठी खर्च करण्यासाठी या कार्यालयांची धावपळ सुरू आहे. ३१ मार्चपूर्वी हा निधी खर्च न झाल्यास निधी शासनाकडे परत जाण्याचा धोका असल्याने कार्यालये धावपळ करीत आहेत.

पगार रखडणार?

रत्नागिरी : मार्च महिन्यात सर्व आर्थिक व्यवहार पूर्ण करण्याची घाई असते. त्यामुळे अनेक पगारबिले रखडली जातात. त्यामुळे काही शासकीय कर्मचा-यांचे पगार मार्च, एप्रिल या दोन महिन्यांत होत नाहीत. त्यामुळे आता मार्च एंडिंगला आपले पगार होणार की नाही, ही चिंता कर्मचाऱ्यांना लागून राहिली आहे.