शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

यंत्रणा उभी राहतेय, मनुष्यबळ कुठे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

काेराेनाचा शिरकाव झाला आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अनेक भागात काेराेनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. सुरुवातीच्या काळात शे-दाेनशे ...

काेराेनाचा शिरकाव झाला आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अनेक भागात काेराेनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. सुरुवातीच्या काळात शे-दाेनशे असे सापडणारे रुग्ण आता पाचशेच्या पुढेच आढळत आहेत. ज्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, त्याचपद्धतीने काेराेनामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे. पाच - दहाजणांचा मृत्यू हाेणाऱ्या जिल्ह्यात आता एका दिवसात २६ मृत्यू हाेऊ लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. काेराेनाचा संसर्ग इतक्या वेगाने वाढत आहे, की रुग्णालयातील जागाही आता अपुरी पडू लागली आहे. दरराेज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ठेवायचे काेठे, असा प्रश्न आराेग्य यंत्रणेसमाेर पडला आहे. त्यातच एखाद्या रुग्णाची काेणा ना काेणा राजकीय पक्षाशी ओळख निघाली, तर वैद्यकीय यंत्रणेलाच धारेवर धरले जाते. त्यामुळे आराेग्य यंत्रणेलाही ताणाखाली काम करावे लागते. आज जिल्ह्यात इतक्या माेठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असताना त्यांना हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे? का? अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या आधारे रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन पडली आहे. आज एक - एक वैद्यकीय अधिकारी १२ ते १४ तासापेक्षा जास्त ड्युटी करत आहे. त्यांच्यावर पडणारा ताण प्रचंड असूनही, ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून ही मंडळी कार्यरत आहेत. त्यांच्यातील काेणी काेराेनाबाधित झाले, तर पुन्हा असणारी संख्या कमी हाेणारच आहे.

जिल्ह्यात इतक्या माेठ्या प्रमाणात काेराेनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, याला जबाबदार राजकीय नेतेमंडळीच आहेत. आज इतकी वर्षे काेकणचे नेतृत्व करणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला काेकणात सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारता आले नाही, ही शाेकांतिका आहे. आज जिल्ह्याला गरज असताना वैद्यकीय डाॅक्टरांसाठी इतरांकडे हात पसरण्याची वेळ आली? आहे. आजवर केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानणाऱ्या राजकीय मंडळींनी विकासाच्यादृष्टीने काय प्रयत्न केले? पक्ष काेणताही असाे, पण साकव, रस्ते, मंदिर, पूल या कामाव्यतिरिक्त विकासाची काेणती कामे करण्यात आली? इतक्या वर्षात काेकणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहू शकले नाही, यासारखे दुर्दैव ते काय म्हणावे? ‘हे मी केलं’ असे ठासून सांगणाऱ्या राजकीय मंडळींनी आजवर वैद्यकीय महाविद्यालय का उभारले नाही, याचे उत्तर देणे गरजेचे आहे. हे महाविद्यालय सुरू झाले असते तर तिथे शिक्षण घेणारे काेकणातील विद्यार्थी आज मिळाले असते. पण तशी काेणाची इच्छाशक्तीच नाही. सारी यंत्रणा उभारण्यात येईल, पण ती यंत्रणा हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसेल, तर काय उपयाेग? आज काेराेनासारख्या महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध हाेत नाहीत, म्हणून खासगी डाॅक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. आज काेराेना आहे, उद्या आणखी काही उद्भवेल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून काेकणातील आराेग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

- अरुण आडिवरेकर