शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायल-हमास शांतता करार: डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा दोघांचीही सही मिळविली, युद्ध थांबणार?
2
पाकवर हल्ला कोणाच्या सांगण्यामुळे राेखला? पंतप्रधान नरेंद्र माेदी यांचा काॅंग्रेसला सवाल
3
उद्योगांवर विजेचा ‘गुपचुप’ हल्ला, राज्यात स्थिती आणखी बिकट; प्रति युनिट दर ११.१५ रुपयांवर 
4
वाहनचालकांनो सावधान! विना हेल्मेट, राँग साइड, प्रखर दिव्यांविरुद्ध कठोर कारवाई करा : सुप्रीम कोर्ट
5
इलेक्ट्रिक कार विक्रीत दुप्पट वाढ; सप्टेंबरमध्ये नवा विक्रम; १५ हजार इव्हींची विक्री
6
‘६० कोटी जमा करा, मग याचिकेवर विचार’; शिल्पा शेट्टीवर न्यायालय संतापले...
7
शिवसेना पक्ष अन् धनुष्यबाण कुणाचा? १२ नोव्हेंबरला सुनावणी   
8
भाजपकडून लोकप्रिय चेहऱ्यांना संधी; गायिका मैथिलीस पक्षाची उमेदवारी? डॅमेज कंट्रोल मोड ऑन
9
एक जीबी डेटा आता चहाच्या एका कपापेक्षाही स्वस्त झाला आहे : मोदी
10
प्रा. कितागावा, रॉबसन अन् याघी यांना नोबेल; मेटल-ऑर्गेनिक फ्रेमवर्कसाठी रसायनशास्त्रातील पुरस्कार 
11
भारताशी युद्ध झाल्यास आम्हीच बाजी मारणार; पाकचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची दर्पोक्ती
12
महिला विश्वचषक : ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला दिला धडा, मूनीचे निर्णायक शतक
13
जब गिल पर आया दिल, तो रोहित क्या चीज हैं !
14
महिला विश्वचषक : फलंदाजांना दाखवावा लागेल दम, आज दक्षिण आफ्रिकेच्या कडव्या आव्हानाचा करणार सामना
15
Beth Mooney Incredible Hundred : अविस्मरणीय सेंच्युरी! पाक संघाला रडवणारी 'रन'रागिणी ठरली बेथ मूनी
16
नवी मुंबई विमानतळ प्रवाशांच्या सेवेत! कधीपासून उड्डाणे सुरू होणार? कुठे-कुठे जाता येणार?
17
नवी मुंबई विमानतळ आशियातील सर्वात मोठे 'कनेक्टिव्हिटी हब' बनणार; पंतप्रधान मोदींना विश्वास
18
तुमच्या आयफोनची चार्जिंग लवकर संपतेय? बॅटरी लाईफ वाढवण्यासाठी 'या' टिप्स वापरा!
19
"तडजोड कर नाहीतर तुझीच बदनामी होईल"; छेडछाड करणाऱ्यालाच पीडितेच्या घरी घेऊन गेले पोलीस!
20
Cough Syrup : "डॉक्टरवर चुकीचा..."; कफ सिरप मृत्यू प्रकरणी मेडिकल असोसिएशनच्या सरकारकडे मोठ्या मागण्या

यंत्रणा उभी राहतेय, मनुष्यबळ कुठे आहे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:28 IST

काेराेनाचा शिरकाव झाला आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अनेक भागात काेराेनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. सुरुवातीच्या काळात शे-दाेनशे ...

काेराेनाचा शिरकाव झाला आणि पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील अनेक भागात काेराेनाचे रुग्ण वेगाने वाढू लागले. सुरुवातीच्या काळात शे-दाेनशे असे सापडणारे रुग्ण आता पाचशेच्या पुढेच आढळत आहेत. ज्या प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, त्याचपद्धतीने काेराेनामुळे मृत्यू हाेण्याचे प्रमाणही वाढत आहे. पाच - दहाजणांचा मृत्यू हाेणाऱ्या जिल्ह्यात आता एका दिवसात २६ मृत्यू हाेऊ लागले आहेत. ही चिंतेची बाब आहे. काेराेनाचा संसर्ग इतक्या वेगाने वाढत आहे, की रुग्णालयातील जागाही आता अपुरी पडू लागली आहे. दरराेज उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांना ठेवायचे काेठे, असा प्रश्न आराेग्य यंत्रणेसमाेर पडला आहे. त्यातच एखाद्या रुग्णाची काेणा ना काेणा राजकीय पक्षाशी ओळख निघाली, तर वैद्यकीय यंत्रणेलाच धारेवर धरले जाते. त्यामुळे आराेग्य यंत्रणेलाही ताणाखाली काम करावे लागते. आज जिल्ह्यात इतक्या माेठ्या प्रमाणात रुग्णसंख्या वाढत असताना त्यांना हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ आहे? का? अपुऱ्या कर्मचाऱ्यांच्या आधारे रुग्णालयात दाखल हाेणाऱ्या रुग्णांवर उपचार करण्याची वेळ त्यांच्यावर येऊन पडली आहे. आज एक - एक वैद्यकीय अधिकारी १२ ते १४ तासापेक्षा जास्त ड्युटी करत आहे. त्यांच्यावर पडणारा ताण प्रचंड असूनही, ‘रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून ही मंडळी कार्यरत आहेत. त्यांच्यातील काेणी काेराेनाबाधित झाले, तर पुन्हा असणारी संख्या कमी हाेणारच आहे.

जिल्ह्यात इतक्या माेठ्या प्रमाणात काेराेनाचे रुग्ण वाढत असताना त्यांना हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नाही, याला जबाबदार राजकीय नेतेमंडळीच आहेत. आज इतकी वर्षे काेकणचे नेतृत्व करणाऱ्या एकाही राजकीय नेत्याला काेकणात सुसज्ज असे वैद्यकीय महाविद्यालय उभारता आले नाही, ही शाेकांतिका आहे. आज जिल्ह्याला गरज असताना वैद्यकीय डाॅक्टरांसाठी इतरांकडे हात पसरण्याची वेळ आली? आहे. आजवर केवळ एकमेकांवर चिखलफेक करण्यात धन्यता मानणाऱ्या राजकीय मंडळींनी विकासाच्यादृष्टीने काय प्रयत्न केले? पक्ष काेणताही असाे, पण साकव, रस्ते, मंदिर, पूल या कामाव्यतिरिक्त विकासाची काेणती कामे करण्यात आली? इतक्या वर्षात काेकणात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभे राहू शकले नाही, यासारखे दुर्दैव ते काय म्हणावे? ‘हे मी केलं’ असे ठासून सांगणाऱ्या राजकीय मंडळींनी आजवर वैद्यकीय महाविद्यालय का उभारले नाही, याचे उत्तर देणे गरजेचे आहे. हे महाविद्यालय सुरू झाले असते तर तिथे शिक्षण घेणारे काेकणातील विद्यार्थी आज मिळाले असते. पण तशी काेणाची इच्छाशक्तीच नाही. सारी यंत्रणा उभारण्यात येईल, पण ती यंत्रणा हाताळण्यासाठी पुरेसे मनुष्यबळ नसेल, तर काय उपयाेग? आज काेराेनासारख्या महामारीच्या काळात रुग्णांवर उपचार करण्यासाठी वैद्यकीय अधिकारी उपलब्ध हाेत नाहीत, म्हणून खासगी डाॅक्टरांचा आधार घ्यावा लागत आहे. आज काेराेना आहे, उद्या आणखी काही उद्भवेल. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नाही. सर्वांनी राजकीय हेवेदावे बाजूला ठेवून काेकणातील आराेग्य यंत्रणा सक्षम करण्यासाठी एकत्र येणे गरजेचे आहे.

- अरुण आडिवरेकर