शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
3
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
4
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
5
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
6
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
7
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
10
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
11
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
12
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
13
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
14
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
15
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
16
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
17
बुलढाण्यातील संतापजनक घटना! सासरच्यांनी इतकं छळलं की, २१ वर्षाच्या गर्भवती नवविवाहितेने...; पोलिसांना पतीला कुठे पकडले?
18
राज्यातील ‘या’ वंदे भारत ट्रेनची वेळ बदलली! वेग वाढवला, लवकर पोहोचणार; प्रवाशांना मोठा लाभ
19
महाप्रलय टळला! स्वतःला अवतार म्हणणाऱ्या एबो नोहाचा नवा खळबळजनक दावा
20
एक चुकीची क्लिक अन् आयुष्यभराची कमाई स्वाहा! सायबर हॅकर्सचा नवा 'ConsentFix' अटॅक काय आहे?
Daily Top 2Weekly Top 5

सेस कराचा निर्णय स्थगित

By admin | Updated: August 21, 2016 22:26 IST

उदय सामंत : १५ दिवसात मच्छीमार-बाजार समितीची बैठक

रत्नागिरी : कृषी उत्पन्न बाजार समितीकडून सेस कराबाबत निर्णय अमलात आणण्याआधी येत्या १५ दिवसात मच्छीमार व कृषी उत्पन्न बाजार समितीची बैठक आयोजित करून त्यात तोडगा काढला जाईल. तोपर्यंत २२ आॅगस्टपासून अंमलबजावणी होणाऱ्या सेस कराच्या निर्णयाला स्थगिती देण्यात आली आहे. याबाबत समितीचे सभापती गजानन पाटील यांच्याशी आपली चर्चा झाल्याची माहिती आमदार उदय सामंत यांनी पत्रकारपरिषदेत दिली. सेस कराच्या निर्णयाविरोधात मच्छीमार नेत्यांनी आंदोलनाचा इशारा दिला होता. यामुळे मच्छीमारांमध्ये प्रचंड असंतोष माजला होता. याबाबत आपण मच्छीमार नेते नुरा पटेल, सुलेमान मुल्ला, शब्बीर वस्ता, नदीम सोलकर, इसा जिवाजी आदींशी चर्चा केली. याबाबत बाजार समिती व मच्छीमारांची बैठक घेऊन चर्चेतूून निर्णय अंतिम करण्याची विनंती केली. त्यानुसार बाजार समिती व मच्छीमार यांची बैठक होईपर्यंत या निर्णयाला स्थगिती देण्याचे सभापती पाटील यांनी मान्य केले आहे. नेपाळी खलाशी व पोलीस यांचे चांगले सहकार्य आहे. मात्र, स्थानिक पोलीस कर्मचाऱ्यांचे नेपाळी खलाशांबाबत काही गैरसमज आहेत. त्यामुळे ते खलाशी दिसले की, हे पोलीस चालायला लागा, असे सांगतात. याबाबत आपली जिल्हा पोलीस अधीक्षकांबरोबर चर्चा झाली असून, उद्या अधीक्षकांनी दुपारी १२ वाजता याबाबत बैठक आयोजित केली आहे. मिरकरवाडा बंदराच्या दुसऱ्या टप्प्याच्या कामाला स्थगिती दिलेली नाही, काम सुरू आहे. याबाबत आपण बंदरावर जाऊन पाहणी करणार आहोत. मच्छीमारांना दुसऱ्या टप्प्यात प्रथम काय हवे, त्यानुसारच काम होणे आवश्यक आहे. प्राधान्यक्रमाची कामेच प्रथम सुरू करण्यास सांगणार असल्याचे सामंत म्हणाले. अल्ट्रा टेक कंपनीच्या वाहतुकीमुळे रस्ता खराब झाला आहे. त्यामुळे रस्त्यावरील खड्डे भरण्याची जबाबदारी त्या कंपनीची आहे. येत्या आठ दिवसात कंपनीने हे खड्डे भरावेत, अन्यथा वाहतूक करू दिली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला. (प्रतिनिधी)