शहरं
Join us  
Trending Stories
1
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
2
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
3
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
4
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
5
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
6
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
7
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
8
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
9
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
10
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
11
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
12
बायकोच्या नादात गेली खुर्ची! नेपाळचे पंतप्रधान बालेन शाह यांचा मोठा निर्णय; १५ दिवसांतच मंत्र्याची हकालपट्टी
13
युद्धविरामानंतरही तणाव! "इराणच्या मदतीने अथवा त्याच्या शिवाय, होर्मुझ..."; इस्लामाबाद बैठकीपूर्वीच ट्रम्प यांचा थेट इशारा
14
ऑनलाइन फ्रॉडवर रामबाण इलाज! १०,००० रुपयांवरील व्यवहारांसाठी RBI चा '१ तासाचा होल्ड' नियम प्रस्तावित
15
विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकात्यात ED ची मोठी कारवाई; कोट्यवधींची रोकड, सोनं-चांदी जप्त
16
शांतता चर्चेसाठी जे. डी. वेन्स यांचे विमान पाकिस्तानकडे निघाले, इराण म्हणतेय चर्चा करून काही उपयोग नाही...
17
Latest Marathi News LIVE Updates: न्यायमूर्ती यशवंत वर्मा यांचा राजीनामा; घरात 'जळलेल्या नोटा' सापडल्यापासून होते वादाच्या भोवऱ्यात
18
टॅक्सी ड्रायव्हरच्या प्रेमात दोन मुलांची आई वेडी; बँक मॅनेजर पतीच्या हत्येचा कट 'त्या' एका कॉल रेकॉर्डिंगने उधळला!
19
'महिंद्रा अँड मोहम्मद' वरुन कशी बनली कंपनी 'महिंद्रा अँड महिंद्रा'; १९४७ च्या फाळणीनंतर झाले वेगळे
20
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा अल्पवयीन, 'हे' आहे खरं वय; नवरा फरमान खान जेलमध्ये जाणार?
Daily Top 2Weekly Top 5

दक्षिण कोरियन ‘वायओओआयएल’कडून वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : धरणांची सुरक्षा, पूर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दक्षिण कोरियन ''वायओओआयएल'' संस्थेने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : धरणांची सुरक्षा, पूर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दक्षिण कोरियन ''वायओओआयएल'' संस्थेने चिपळूणच्या महापुराची दखल घेतली आहे. या संस्थेतील तज्ज्ञ मंडळी चिपळुणात दाखल झाली असून, त्यांनी गेले दोन दिवस वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करत महापुराच्या कारणांचा शोध घेत आहेत. महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरमुक्ती आणि जलव्यवस्थापनबाबतचा अहवाल ते केंद्र शासनाला देणार आहे.

हजारो संसार, व्यापार उद्‌ध्वस्त करणाऱ्या महापुरानंतर चिपळूणकरांच्या मनात संतापाची लाट पसरली आहे. या महापुरासंदर्भात विविध मतप्रवाह पुढे येत आहेत. तसेच या महापुरातील नुकसानीला जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी चौकशीची मागणी केली जात आहे. त्यातच आता वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ, अतिवृष्टी, कोयनेचे अवजल, पूररेषेत वाढलेली बांधकामे व त्यासाठी केलेला भराव अशी विविध कारणे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध तज्ज्ञ व अभ्यासक आपापली मते मांडत असून, चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी अनेक संस्था सरसावल्या आहेत. राज्य व केंद्रस्तरावर या महापुराची दखल घेतलेली असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वायओओआयएल’ या दक्षिण कोरियन संस्थेनेही दखल घेत चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे हायड्रोलिक अभियंता ओम जांगीड व भू तंत्रज्ञ मनीष खरगपूर यांनी चिपळूणला भेट दिली. येथील वाशिष्ठी नदीपात्राची तसेच लगतच्या परिसराची पाहणी केली.

गेले दोन दिवस हे काम सुरू होते. लघुपाटबंधारे विभागातील अभियंता विष्णू टोपरे व अन्य अधिकारी तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्याबरोबर पेढांबे ते गोवळकोटपर्यंत वाशिष्ठीच्या दोन्ही बाजूने सर्वेक्षण करण्यात आले व पूर परिस्थिती कशी ओढवली याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी प्रकाश पवार यांनी स्थानिक पातळीवरील मुद्दे संबंधित अभियंत्यांच्या लक्षात आणून दिले. तांत्रिक माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली. चिपळुणात शिरणारे वाशिष्ठीचे पाणी कोणत्या भागात शिरले, त्यानंतर हे पाणी शहर व बाजारपेठेत कसे घुसते या बाबत पाहणी करण्यात आली. वाशिष्ठीच्या उपनद्या, परिसरातून येणारे पावसाचे पाणी , कोयना अवजल असा सर्वंकष विचार यावेळी करण्यात आला. आता यासंदर्भात अहवाल तयार करून तो संबंधित अभियंता ‘वायओओआयएल’ संस्थेच्या दिल्ली कार्यालयाला पाठविणार आहेत. त्यानंतर संपूर्ण प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे. संबंधित संस्था पूरमुक्तीसाठी गेली चाळीस वर्षे कार्यरत आहे. रबर डॅममध्ये ही संस्था अग्रगण्य असून त्यांचे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संस्थेने जलव्यवस्थापनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.