शहरं
Join us  
Trending Stories
1
कारमध्ये बसून आमदार मोजत होता रोकड; ACB च्या पथकानं रंगेहाथ पकडले, काय आहे प्रकरण?
2
Maharashtra HSC Result 2025: कोकण पुन्हा नंबर 'वन'! बारावीचा निकाल जाहीर; मुलींचीच बाजी, जाणून घ्या निकाल
3
विश्वास बसला नसता...! युक्रेनने समुद्री ड्रोनद्वारे रशियाचे सुखोई फायटरजेट पाडले; अमेरिकेसह सर्व देशांच्या सैन्यांना धक्का
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवाद्यांचा आणखी एक कट उघड; गुप्तचर विभागाची माहिती, अलर्ट जारी
5
पहलगाम नरसंहाराला देशाचे गृहमंत्री अमित शाह जबाबदार; संजय राऊतांचा हल्लाबोल
6
Video - रेस्टॉरंटमध्ये टेबल न मिळाल्याने संतापले मंत्री; रातोरात बोलावली फूड सेफ्टी टीम अन्...
7
धक्कादायक! पुण्यात नऊ वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार; तरुणाविरोधात गुन्हा दाखल
8
Crime News: पंखा दाखवा म्हणाले अन् दुकानदारावर गोळी झाडून निघून गेले; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
9
निवेदिता सराफ यांच्याकडून घडलेली 'ती' चूक, अशोक सराफ यांनी पत्नीला चांगलंच सुनावलं
10
"मी पाकिस्तानात राहणाऱ्या मामे बहिणीशी लग्न केलं कारण..."; जवानाने उघड केलं मोठं रहस्य
11
"हिला पण गोळी मारायला हवी"; मुस्लिमांच्या विरोधात जाऊ नका म्हणणाऱ्या सैनिकाच्या पत्नीला केलं ट्रोल
12
भारत-पाकिस्तान तणावावर आज संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक; बंद खोलीत चर्चेची मागणी
13
"पाकिस्तानवाल्यांनो मी तुमच्या सोबत, जय पाकिस्तान!" राखी सावंतचा व्हिडीओ पाहून संतापले नेटकरी
14
मोठी बातमी! पहलगाम नंतर पूंछ होते निशाण्यावर, दहशतवाद्यांचा मोठा कट फसला; ५ आयईडी जप्त
15
उदय कोटक यांचा रियल इस्टेट क्षेत्रात धमाका, केली देशातील सर्वात महागडी ४०० कोटींची प्रॉपर्टी डील
16
VIDEO: दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या तरुणाने पोलिसांपासून वाचण्यासाठी नदीत उडी मारली; इम्तियाजचा मृतदेह सापडल्याने खळबळ
17
लोकप्रिय 'पंचायत' सीरिजला सचिवजी देणार होते नकार? जितेंद्र कुमार म्हणाला, "मला वाटलं..."
18
"बॉलिवूड चोर आहे!" नवाजुद्दीन सिद्दीकीचं मोठं विधान, म्हणाला- "लोक या गोष्टींना कंटाळतात..."
19
Samsung ला ४४००००००००० रुपयांचा टॅक्स भरण्याचे आदेश; कंपनीने लावला Reliance Jio वर आरोप, प्रकरण काय?
20
Stock Market Today: १६० अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला, TATA Motors चा शेअर सुस्साट; ऑटो-आयटी क्षेत्रात तेजी

दक्षिण कोरियन ‘वायओओआयएल’कडून वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2021 04:37 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : धरणांची सुरक्षा, पूर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दक्षिण कोरियन ''वायओओआयएल'' संस्थेने ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : धरणांची सुरक्षा, पूर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन अशा विविध क्षेत्रात काम करणाऱ्या दक्षिण कोरियन ''वायओओआयएल'' संस्थेने चिपळूणच्या महापुराची दखल घेतली आहे. या संस्थेतील तज्ज्ञ मंडळी चिपळुणात दाखल झाली असून, त्यांनी गेले दोन दिवस वाशिष्ठी नदीचे सर्वेक्षण करत महापुराच्या कारणांचा शोध घेत आहेत. महापुराच्या पार्श्वभूमीवर पूरमुक्ती आणि जलव्यवस्थापनबाबतचा अहवाल ते केंद्र शासनाला देणार आहे.

हजारो संसार, व्यापार उद्‌ध्वस्त करणाऱ्या महापुरानंतर चिपळूणकरांच्या मनात संतापाची लाट पसरली आहे. या महापुरासंदर्भात विविध मतप्रवाह पुढे येत आहेत. तसेच या महापुरातील नुकसानीला जबाबदार कोण याचा शोध घेण्यासाठी चौकशीची मागणी केली जात आहे. त्यातच आता वाशिष्ठी व शिवनदीतील गाळ, अतिवृष्टी, कोयनेचे अवजल, पूररेषेत वाढलेली बांधकामे व त्यासाठी केलेला भराव अशी विविध कारणे पुढे येत आहेत. या पार्श्वभूमीवर विविध तज्ज्ञ व अभ्यासक आपापली मते मांडत असून, चिपळूणच्या पूरमुक्तीसाठी अनेक संस्था सरसावल्या आहेत. राज्य व केंद्रस्तरावर या महापुराची दखल घेतलेली असतानाच आंतरराष्ट्रीय पातळीवरील ‘वायओओआयएल’ या दक्षिण कोरियन संस्थेनेही दखल घेत चिपळूणला पूरमुक्त करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. या संस्थेचे हायड्रोलिक अभियंता ओम जांगीड व भू तंत्रज्ञ मनीष खरगपूर यांनी चिपळूणला भेट दिली. येथील वाशिष्ठी नदीपात्राची तसेच लगतच्या परिसराची पाहणी केली.

गेले दोन दिवस हे काम सुरू होते. लघुपाटबंधारे विभागातील अभियंता विष्णू टोपरे व अन्य अधिकारी तसेच येथील सामाजिक कार्यकर्ते प्रकाश पवार यांच्याबरोबर पेढांबे ते गोवळकोटपर्यंत वाशिष्ठीच्या दोन्ही बाजूने सर्वेक्षण करण्यात आले व पूर परिस्थिती कशी ओढवली याबाबत माहिती जाणून घेण्यात आली. यावेळी प्रकाश पवार यांनी स्थानिक पातळीवरील मुद्दे संबंधित अभियंत्यांच्या लक्षात आणून दिले. तांत्रिक माहिती लघुपाटबंधारे विभागाने दिली. चिपळुणात शिरणारे वाशिष्ठीचे पाणी कोणत्या भागात शिरले, त्यानंतर हे पाणी शहर व बाजारपेठेत कसे घुसते या बाबत पाहणी करण्यात आली. वाशिष्ठीच्या उपनद्या, परिसरातून येणारे पावसाचे पाणी , कोयना अवजल असा सर्वंकष विचार यावेळी करण्यात आला. आता यासंदर्भात अहवाल तयार करून तो संबंधित अभियंता ‘वायओओआयएल’ संस्थेच्या दिल्ली कार्यालयाला पाठविणार आहेत. त्यानंतर संपूर्ण प्रकल्प तयार करून तो केंद्र शासनाला पाठविण्यात येणार आहे. संबंधित संस्था पूरमुक्तीसाठी गेली चाळीस वर्षे कार्यरत आहे. रबर डॅममध्ये ही संस्था अग्रगण्य असून त्यांचे अनेक प्रयोग यशस्वी झाले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावरही या संस्थेने जलव्यवस्थापनात महत्त्वाची कामगिरी बजावली आहे.