शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
2
ठाकरे बंधूंच्या युतीला काँग्रेसचा ग्रीन सिग्नल? संजय राऊत म्हणतात, “आमची चर्चा झाली आहे...”
3
'क्रिमीलेअर'बाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; उत्पन्नाची मर्यादा बदलणार?
4
पाकिस्तानातून अवैधपणे शस्त्रास्त्रे पुरवणाऱ्या सलीम पिस्तुलला मुसक्या बांधून आणलं भारतात
5
केवळ आठवणीतच राहणार 'ही' १३३ वर्ष जुनी कंपनी? बंद होण्याच्या मार्गावर, प्रत्येक घराशी आहे हिचं नातं
6
मोहम्मद रिझवान बॉल सोडायला गेला अन् क्लीन बोल्ड झाला! अंपायरनं अशी उडवली खिल्ली (VIDEO)
7
सरकार LIC मधील हिस्सा विकणार, पुढच्या आठवड्यापासून प्रक्रिया सुरू; शेअर विक्रीसाठी रांग
8
गणेशोत्सवासाठी मुंबईहून दोन मोफत ट्रेन सुटणार; टाईम टेबल, तिकीटे कधी मिळणार..., नितेश राणेंची घोषणा...
9
महागाई भत्त्याची १८ महिन्यांची थकबाकी मिळणार का? सरकारने संसदेत दिले उत्तर
10
स्वामींची सेवा न चुकता-नियमितपणे करतो, पण स्वामीकृपा झाली हे कसे ओळखावे? ‘हे’ अनुभव येतातच!
11
Gold Silver Price 13 August 2025: सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, Silver च्या दरात ₹१५३७ ची तेजी; खरेदीपूर्वी पाहा काय आहे नवी किंमत?
12
‘मत चोरी’वरून भाजपाचा काँग्रेसवर प्रतिहल्ला, रायबरेली आणि डायमंड हार्बर येथील उदाहरण देत घेरले   
13
भाजपा विरुद्ध भाजपा लढाईत विरोधी पक्ष बनला 'विजेता'; संसदेत राहुल गांधींनी टाकला डाव, काय घडलं?
14
ईडी चौकशी करत असलेल्या सुरेश रैनाकडे किती संपत्ती? उत्पन्नाचा मुख्य स्त्रोत कोणता?
15
भटक्या कुत्र्यांबाबतीत कोर्टाच्या निर्णयाची चर्चा, तिकडे आर्चीने शेअर केला क्युट व्हिडिओ; म्हणाली...
16
जेवढे जन्माला येतायेत, त्यापेक्षा १० लाख जास्त मरतायेत; भारताच्या मित्र देशात 'सायलेंट इमरजंन्सी'!
17
ठाकरे बंधू दादरच्या कबुतरखाना विरोधातील आंदोलनात दिसणार? ‘या’ समितीचे सहभागी होण्याचे आवाहन
18
Jaiprakash associates limited: ₹४ चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणुकदारांच्या उड्या; आता बंद करावं लागलं ट्रेडिंग, अदानींचं जोडलंय नाव
19
चंद्रावर घेऊन जातो...! नासाच्या इंटर्नने चंद्रावरून आणलेला दगड चोरला, बेडखाली ठेवला अन् गर्लफ्रेंडसोबत रोमान्सही केला...

दूषित पाण्याची यंत्रणेकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 00:34 IST

सोनपात्रा नदी : ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याची कबुली--लोकमतचा प्रभाव

आवाशी : कोतवली येथील सोनपात्रा नदीत सोडलेल्या दूषित पाणी प्रकरणाकडे शासकीय यंत्रणेने केलेल्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले. मात्र, याबाबत कोतवली ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याची कबुलीदेखील ‘त्या’ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमधून दि. २४ मे रोजी रात्री कोतवली येथील सोनपात्रा नदीत दूषित सांडपाणी सोडले गेले. ही बाब दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आली. गावातील काही जनावरे हे दूषित पाणी प्यायली तसेच गावातील पाणवठेही यामुळे दूषित झाल्याचे पहावयास मिळाले. ग्रामपंचायतीने एम.पी.सी.बी., एम.आय.डी.सी., सी.ई.टी.पी.ला याची माहिती दिली. मात्र, या घटनेची दखल वरीलपैकी कोणीही घेतली नाही. अखेर ग्रामपंचायतीने खेड तहसीलदारांकडे संपर्क साधून या घटनेचा पंचनामा केला. याबाबत लेखी तक्रार ग्रामपंचायतीने खेड तहसीलदार यांचेकडे केली आहे.असे प्रकार वारंवार होत असताना वरील यंत्रणेला कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. त्याचबरोबर अनेकदा पंचनामे करूनही त्याचा अहवाल आजपर्यंत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता तयार करण्यात आलेला अहवाल हा लेखी स्वरुपात मिळण्याची मागणीही केली आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. आम्ही लगेचच घटनास्थळावर जाऊन आलो होतो. तसेच गेले तीन दिवस आम्ही त्या ठिकाणी पाहणी केल्याचे, सी.ई.टी.पी.च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, याबाबत तेथील ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. पाहणी करून आपण अहवाल तयार केल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत एम.आय.डी.सी. व एम.पी.सी.बी. यांचेकडे संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)पुन्हा तसाच प्रकार : चेंबर ओव्हरफ्लोचार दिवसांपूर्वी सोनपात्रा नदी दूषित झाली असतानाच तसाच प्रकार पुन्हा घडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. लोटे गावची स्मशानभूमी व जुनी बंद असणारी काणेकर इंडस्ट्रीज यालगत असणारे सी.ई.टी.पी.मध्ये सांडपाणी वाहून नेणारे एम.आय.डी.सी.चे चेंबर ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याचे प्रवीण कदम व जितेंद्र आंब्रे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही बाब सी.ई.टी.पी.ला कळविल्याचे सांगितले.