शहरं
Join us  
Trending Stories
1
ICC Womens World Cup 2025 : टीम इंडियाची विजयी सलामी! दीप्ती-अमनजोतसह राणाचा अष्टपैलू बाणा
2
"हमासकडे शेवटचे ३-४ दिवस शिल्लक, जर त्यांनी ऐकलं नाही तर..."; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट धमकी
3
वर्ल्ड कपच्या पहिल्याच सामन्यात दीप्ती शर्मानं रचला इतिहास; अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय
4
धनगर आरक्षणासाठी तरूणाने स्वतःची कार जाळून केला सरकारचा तीव्र निषेध; जालना तालुक्यातील घटना
5
World Cup की सौंदर्य स्पर्धा... 'या' ८ महिला क्रिकेटर्सना बघून म्हणाल- हिरोईन दिसते हिरोईन!
6
शिर्डीत ५६ भिक्षेकरी पोलिसांच्या ताब्यात; महाराष्ट्रासह ७ राज्यांतील भिक्षेकऱ्यांचा समावेश
7
आमची ट्रॉफी, मेडल्स आम्हाला परत द्या... BCCI चा मोहसीन नक्वी यांना इशारा, ACC बैठकीत राडा
8
ग्राहक न्यायालयाच्या लाचखाेर लिपिकास एक वर्षाच्या सश्रम कारावासाची शिक्षा; ठाण्यातील प्रकरण
9
कापूस खरेदीस ‘पणन’ला परवानगी; लवकरच सीसीआयसोबत करार; आर्थिक मदतीची मागणी
10
मोहसीन नक्वी यांनी अखेर टीम इंडियापुढे गुडघे टेकले... भारताचा मोठा विजय! बैठकीत काय घडलं?
11
'मला मंगळसूत्र चोर म्हणता, कितव्या बायकोचं मंगळसूत्र चोरलं ते सांगा'; पडळकरांची जयंत पाटील यांच्यावर टीका
12
ऑक्टोबर महिन्यात पाऊस आणखी झोडपणार, हवामान खात्याने दिली धडकी भरवणारी माहिती 
13
‘राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्यास कठोर शिक्षा करा, त्यांच्या सुरक्षेत वाढ करा’, काँग्रेसचं लोकसभा अध्यक्षांना पत्र  
14
ट्रम्प यांच्या निर्णयाचा भारताला फायदा; अमेरिकन कंपन्या भारतात शिफ्ट होण्याच्या तयारीत
15
ठाकरे बंधूंच्या युतीसंदर्भात संजय राऊतांचं सूचक विधान, दसऱ्याला...! स्पष्टच बोलले
16
पहलगाम हल्ल्यानंतर १६० दिवसांनी काश्मीरमधील 'ही' १२ पर्यटनस्थळे पुन्हा पर्यटकांसाठी खुली
17
सचिन तेंडुलकरसारखी मॅचविनर खेळी करून रायगड जिल्हयात पक्षाला बळ देऊ- सुनिल तटकरे
18
नागपूरमधील प्रकल्प इतर राज्यांकडे वळण्याच्या प्रयत्नात ? ८८४४ कोटींचे प्रकल्प जमिनीअभावी अडकले !
19
Maharashtra Flood: "ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी होतेय, पण..."; CM फडणवीसांनी सांगितली निर्णय घेण्यातील अडचण
20
फायदाच फायदा...! गाजाच्या निर्मितीत भारताला मोठी संधी! पार पाडू शकतो महत्वाची भूमिका, असा आहे इस्रायलचा संपूर्ण प्लॅन?

दूषित पाण्याची यंत्रणेकडून पाहणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2016 00:34 IST

सोनपात्रा नदी : ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याची कबुली--लोकमतचा प्रभाव

आवाशी : कोतवली येथील सोनपात्रा नदीत सोडलेल्या दूषित पाणी प्रकरणाकडे शासकीय यंत्रणेने केलेल्या दुर्लक्षाबाबत ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध केले होते. या वृत्तानंतर शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली असून, काही अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची प्रत्यक्ष पाहणी केल्याचे सांगितले. मात्र, याबाबत कोतवली ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याची कबुलीदेखील ‘त्या’ अधिकाऱ्यांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. लोटे - परशुराम औद्योगिक वसाहतीतील रासायनिक कारखान्यांमधून दि. २४ मे रोजी रात्री कोतवली येथील सोनपात्रा नदीत दूषित सांडपाणी सोडले गेले. ही बाब दुसऱ्या दिवशी ग्रामपंचायतीच्या निदर्शनास आली. गावातील काही जनावरे हे दूषित पाणी प्यायली तसेच गावातील पाणवठेही यामुळे दूषित झाल्याचे पहावयास मिळाले. ग्रामपंचायतीने एम.पी.सी.बी., एम.आय.डी.सी., सी.ई.टी.पी.ला याची माहिती दिली. मात्र, या घटनेची दखल वरीलपैकी कोणीही घेतली नाही. अखेर ग्रामपंचायतीने खेड तहसीलदारांकडे संपर्क साधून या घटनेचा पंचनामा केला. याबाबत लेखी तक्रार ग्रामपंचायतीने खेड तहसीलदार यांचेकडे केली आहे.असे प्रकार वारंवार होत असताना वरील यंत्रणेला कळवूनही ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप ग्रामपंचायतीने केला आहे. त्याचबरोबर अनेकदा पंचनामे करूनही त्याचा अहवाल आजपर्यंत ग्रामपंचायतीला प्राप्त झालेला नाही. त्यामुळे आता तयार करण्यात आलेला अहवाल हा लेखी स्वरुपात मिळण्याची मागणीही केली आहे. ‘लोकमत’ने वृत्त प्रसिद्ध करताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. आम्ही लगेचच घटनास्थळावर जाऊन आलो होतो. तसेच गेले तीन दिवस आम्ही त्या ठिकाणी पाहणी केल्याचे, सी.ई.टी.पी.च्या एका अधिकाऱ्याने सांगितले. मात्र, याबाबत तेथील ग्रामपंचायतीला कल्पना दिली नसल्याचेही त्यांनी सांगितले. पाहणी करून आपण अहवाल तयार केल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले. याबाबत एम.आय.डी.सी. व एम.पी.सी.बी. यांचेकडे संपर्क साधला असता, अधिकाऱ्यांनी भ्रमणध्वनीवर प्रतिसाद दिला नाही. (वार्ताहर)पुन्हा तसाच प्रकार : चेंबर ओव्हरफ्लोचार दिवसांपूर्वी सोनपात्रा नदी दूषित झाली असतानाच तसाच प्रकार पुन्हा घडल्याने ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला आहे. लोटे गावची स्मशानभूमी व जुनी बंद असणारी काणेकर इंडस्ट्रीज यालगत असणारे सी.ई.टी.पी.मध्ये सांडपाणी वाहून नेणारे एम.आय.डी.सी.चे चेंबर ओव्हरफ्लो होऊन वाहत असल्याचे प्रवीण कदम व जितेंद्र आंब्रे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी ही बाब सी.ई.टी.पी.ला कळविल्याचे सांगितले.