शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
9
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
10
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
11
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
12
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
13
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
14
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
15
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
16
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
17
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
18
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
19
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
20
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार

रत्नागिरीतील ‘भाकर’चा पीडित महिलांना आधार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:27 IST

रत्नागिरीतील भाकर सेवा संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेला सहाय्यता कक्ष पीडितांना आधार ठरत आहे. लाेकमत न्यूज नेटवर्क रत्नागिरी : पीडित ...

रत्नागिरीतील भाकर सेवा संस्थेतर्फे सुरू करण्यात आलेला सहाय्यता कक्ष पीडितांना आधार ठरत आहे.

लाेकमत न्यूज नेटवर्क

रत्नागिरी : पीडित महिलांना सर्व प्रकारची मदत मोफत उपलब्ध व्हावी यासाठी महिला व बालविकास विभागाच्या मदतीने भाकर सेवा संस्थेचा महिला व मुलांसाठी सहायता कक्ष सुरू करण्यात आला आहे. दहा वर्षात १७५० महिलांना त्यांचा संसार वाचवण्याकरिता मदत केली आहे. तसेच महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन करून महिला सबलीकरण व समक्षीकरण करण्याचे काम केले आहे.

रत्नागिरी शहर पाेलीस स्थानकात २०१० मध्ये हा सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आला. गेल्या १० वर्षात महिलांकरिता जनजागृतीचे ६५ कार्यक्रम या कक्षामार्फत घेण्यात आले आहेत. या ठिकाणी मिळणारी सेवा ही पूर्णपणे मोफत दिली जाते. महिला सहायता कक्षामध्ये समाजकार्याची पदवी घेतलेले दोन समुपदेशक कार्यरत असतात. कोरोनाच्या काळात देखील हे केंद्र सुरू ठेवून केंद्राचे समुपदेशक पवनकुमार मोरे व अश्विनी मोरे यांनी महिलांकरिता सर्व प्रकारच्या सेवा पुरविण्याचे काम केले. तसेच शासनाच्या आदेशाप्रमाणे परजिल्ह्यातील कामगार व मजुरांकडे जाऊन त्यांना समुपदेशन करण्याचे काम केले आहे. याच कोरोनाच्या काळात भाकर संस्थेने १५० कुटुंबांना पुरेसे अन्नधान्य व १५० कुटुंबांना ‘हायजीन किट’चे वाटप केले.

समाजातील पीडित महिलांना कोणत्याही मदतीसाठी ‘सखी’ वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे. या सेंटरशी संपर्क साधावा असे केंद्र प्रशासक अश्विनी मोरे यांनी सांगितले. तसेच ‘सखी’ वन स्टॉप सेंटरच्या बीना खातू, अंकिता चौघुले, लीना बोरीकर, प्राची रसाळ, मोहन पाटील, ॲड. नंदा चौगुले, डॉ. शीतल भोळे, डॉ. भाग्यश्री तानगे आणि पूर्ण टीम ही आपत्कालीन परिस्थितीतही २४ तास पीडित महिलेला मदत करण्यासाठी कार्य करत आहे.

चाैकट

संस्थेने महिला व बालविकास विभागाच्या मान्यतेने ‘सखी’ वन स्टॉप सेंटर फेब्रुवारी २०२१ मध्ये सुरु केले आहे. ही सेवा २४ तास दिली जाते. महिलांवर होणारे अन्याय व त्यांना आवश्यक असणाऱ्या सेवा याकरिता पीडित महिलेला एका छताखाली समुपदेशन पोलीस, वकील, वैद्यकीय सेवा व तात्पुरती सेवा उपलब्ध व्हावी हा या मागचा उद्देश आहे. या प्रकल्पाची माहिती गावोगावी महिलांपर्यंत पोहाेचावी या करिता ‘सखी’ च्या सर्व कर्मचाऱ्यांनी जनजागृती मोहीम हाती घेतली आहे.