शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय शिक्षक भरतीसाठी पाठिंबा चळवळ, स्थानिक शिक्षक भरतीसाठी ठराव पत्र प्राप्त

By मेहरून नाकाडे | Updated: April 23, 2023 19:23 IST

शासनाने विभागीय भरती करून कोकणातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पाठिंबा चळवळ उभी राहिली आहे.

रत्नागिरी : शासनाने विभागीय भरती करून कोकणातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पाठिंबा चळवळ उभी राहिली आहे. ग्रामपंचायती, शाळा व्यवस्थापन समित्या व लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक शिक्षक भरती झाली पाहिजे, यासाठी उठाव करण्यास सुरुवात केली असून तसे ठराव व पाठिंबा पत्रे शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत. कोकणातील जिल्हा परिषद शाळा वाचवा’ अशी मागणी पत्रांतून करण्यात येत आहे.

कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवायच्या असतील, शिक्षणातील गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल तर शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी गेल्या १५ वर्षांपासून कोकणातील डीएड्, बीएड् पदवीधारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून ते अगदी मुंबईपर्यंत येथील डीएड्, बीएड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने करत शासन दरबारी आपली व्यथा मांडली. कोकणातील शाळा वाचवण्यासाठी आता या लढ्यात कोकणातील नागरिकांनीही सहभाग घेतला आहे. गावागावातील लोकप्रतिनिधी, जाणकार नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनीही पुढाकार घेत या उठावाला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबतच्या पाठिंब्याची पत्रे कोकण डीएड्, बीएड् धारक असोसिएशनमार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत.

शाळा व्यवस्थापन समित्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रात, कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षानंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. त्यातच नवीन भरती रखडत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी नुकसान होते.जिल्हा बदलीमुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एक हजार ३०० पदे रिक्त आहेत. तर ७०० शिक्षक जिल्हा बदलीच्या प्रक्रियेत आहेत. तीस टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही, परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरत आहे.

जिल्हा परिषदेची शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी विभागीय शिक्षक भरती करत, स्थानिकांना प्राधान्य द्यावे, यासाठी आमदार, खासदार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी पंचायत समिती सभापती, विद्यमान सरपंच अशा अनेकांची पाठिंबा पत्रे कोकण डीएड्, बीएड् संघटनेकडे प्राप्त झाली आहेत. ही पत्रे शालेय शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या शिष्टमंडळाने सांगितले.