शहरं
Join us  
Trending Stories
1
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
2
Dollar vs Rupee: RBI च्या मोठ्या निर्णयानं परिस्थिती बदलली, ९१ पार गेलेला रुपया ८९ पर्यंत आला, नक्की काय केलं?
3
मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
4
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
5
तुफान राडा! असं काय झालं की सुरक्षा रक्षकांनी ५० लाखांची मर्सिडीज फोडली; व्हायरल व्हिडीओतील घटना काय?
6
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
7
"वडिलांप्रमाणेच मलाही पुरस्कार आवडतात...", सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा अवॉर्ड मिळाल्यानंतर आर्यन खानची प्रतिक्रिया
8
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
9
"पहिल्यांदाच लेकाला सोडून शहराबाहेर आलोय..." विकी कौशलची भावुक प्रतिक्रिया
10
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
11
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
12
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
13
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
14
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
15
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
16
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
17
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
18
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
19
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
20
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
Daily Top 2Weekly Top 5

विभागीय शिक्षक भरतीसाठी पाठिंबा चळवळ, स्थानिक शिक्षक भरतीसाठी ठराव पत्र प्राप्त

By मेहरून नाकाडे | Updated: April 23, 2023 19:23 IST

शासनाने विभागीय भरती करून कोकणातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पाठिंबा चळवळ उभी राहिली आहे.

रत्नागिरी : शासनाने विभागीय भरती करून कोकणातील शाळांमध्ये स्थानिक शिक्षक उपलब्ध करून द्यावेत, यासाठी रत्नागिरी, रायगड, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ग्रामीण भागातून पाठिंबा चळवळ उभी राहिली आहे. ग्रामपंचायती, शाळा व्यवस्थापन समित्या व लोकप्रतिनिधी यांनी स्थानिक शिक्षक भरती झाली पाहिजे, यासाठी उठाव करण्यास सुरुवात केली असून तसे ठराव व पाठिंबा पत्रे शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत. कोकणातील जिल्हा परिषद शाळा वाचवा’ अशी मागणी पत्रांतून करण्यात येत आहे.

कोकणातील जिल्हा परिषदेच्या शाळा वाचवायच्या असतील, शिक्षणातील गुणवत्ता टिकवून ठेवायची असेल तर शिक्षकांची जिल्हाबदली थांबवून स्थानिक शिक्षकांना भरतीमध्ये प्राधान्य द्यावे, अशी मागणी गेल्या १५ वर्षांपासून कोकणातील डीएड्, बीएड् पदवीधारक करत आहेत. यासाठी सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगडपासून ते अगदी मुंबईपर्यंत येथील डीएड्, बीएड्धारकांनी उपोषणे, मोर्चे, आंदोलने करत शासन दरबारी आपली व्यथा मांडली. कोकणातील शाळा वाचवण्यासाठी आता या लढ्यात कोकणातील नागरिकांनीही सहभाग घेतला आहे. गावागावातील लोकप्रतिनिधी, जाणकार नागरिक, सामाजिक कार्यकर्ते यांनीही पुढाकार घेत या उठावाला पाठिंबा दर्शवला आहे. याबाबतच्या पाठिंब्याची पत्रे कोकण डीएड्, बीएड् धारक असोसिएशनमार्फत शालेय शिक्षणमंत्र्यांना देण्यात येत आहेत.

शाळा व्यवस्थापन समित्यांनी दिलेल्या पाठिंबा पत्रात, कोकणातील शाळांमध्ये शिक्षक म्हणून रूजू व्हायचे आणि काही वर्षानंतर आपापल्या जिल्ह्यात बदली करून निघून जायचे, या प्रकारामुळे शाळांमध्ये शिकवायला कोणी नाही, अशी स्थिती आहे. त्यातच नवीन भरती रखडत असल्याने येथील विद्यार्थ्यांचे शिक्षकांअभावी नुकसान होते.जिल्हा बदलीमुळे सद्यस्थितीत जिल्ह्यात एक हजार ३०० पदे रिक्त आहेत. तर ७०० शिक्षक जिल्हा बदलीच्या प्रक्रियेत आहेत. तीस टक्क्यांपेक्षा जास्त शिक्षकांची पदे रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांना शिकवायचे कोणी? हा प्रश्न निर्माण झाला आहे. रायगड, सिंधुदुर्ग, पालघर या जिल्ह्यांमध्येही यापेक्षा वेगळी स्थिती नाही, परिणामी जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता घसरत आहे.

जिल्हा परिषदेची शिक्षण व्यवस्था वाचवण्यासाठी विभागीय शिक्षक भरती करत, स्थानिकांना प्राधान्य द्यावे, यासाठी आमदार, खासदार,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष, माजी पंचायत समिती सभापती, विद्यमान सरपंच अशा अनेकांची पाठिंबा पत्रे कोकण डीएड्, बीएड् संघटनेकडे प्राप्त झाली आहेत. ही पत्रे शालेय शिक्षणमंत्री व मुख्यमंत्र्यांना देण्यात येणार असल्याचे संघटनेच्या शिष्टमंडळाने सांगितले.