शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
2
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
3
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
4
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
5
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
6
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
7
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
8
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
9
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
10
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
11
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
12
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
13
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
14
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
15
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
16
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
17
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
18
जबरदस्त कॅमेरा आणि दमदार बॅटरी, किंमत १० हजारांहून कमी; नव्या 5G फोनची सर्वत्र चर्चा!
19
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
20
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...

अपंग व्यक्तींच्या विवाहास सहाय्य

By admin | Updated: July 17, 2014 23:53 IST

जिल्हा परिषद : आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर निर्णय

रत्नागिरी : सामाजिक सुरक्षिततेच्या दृष्टीने अपंग व्यक्तींना आपले कौटुंबीक जीवन व्यतित करता यावे, यासाठी आंतरजातीय विवाहाच्या धर्तीवर अपंग - अव्यंग असलेल्या विवाह करणाऱ्या जोडप्यांना शासनाकडून ५० हजार रुपये देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. अपंग - अव्यंग व्यक्तींच्या विवाहास प्रोत्साहन देण्यासाठी आर्थिक सहाय्याच्या योजनेला शासनाने मंजुरी दिली असून, त्याप्रमाणे सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागाने शासन निर्णय नुकताच जाहीर केला आहे. अपंग व अव्यंग विवाहितांना प्रोत्साहन देण्याची ही योजना किमान आहे. त्यासाठी ४० टक्के किंवा त्यापेक्षा जास्त अपंगत्व असलेल्या व्यक्तीशी अपंगत्व नसलेल्या सुदृढ व्यक्तीने विवाह केल्यास त्या जोडप्यास ही योजना लागू करण्यात आली आहे. अशा जोडप्यास २५ हजार रुपयांचे बचत प्रमाणपत्र, २० हजार रुपये रोख स्वरुपात, ४५०० रुपये संसारोपयोगी साहित्य, वस्तू खरेदीसाठी देण्यात येणार आहेत. ५०० रुपये स्वागत समारंभाच्या कार्यक्रमावर खर्च. असे एकूण ५० हजार रुपये या जोडप्यास शासनाकडून देण्यात येणार आहेत. ही योजना १ एप्रिल या आर्थिक वर्षापासून नव्याने विवाहीत होणाऱ्या जोडप्यांना लागू करण्यात येणार आहे. योजनेचा लाभ घेणाऱ्या वधू अथवा वराकडे अपंग व्यक्ती अधिनियमाप्रमाणे किमान ४० टक्के अथवा त्यापेक्षा जास्त अपंगत्त्वाचे सक्षम प्राधिकाऱ्याने दिलेले प्रमाणपत्र आवश्यक आहे. (शहर वार्ताहर)