शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
3
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
4
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
5
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
6
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
7
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
8
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
9
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
10
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
11
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
12
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
13
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
14
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
15
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
16
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
17
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
18
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली
19
अदानींचा मोठा निर्णय; एका आठवड्यापूर्वी केलेला ड्रॅगनपास करार केला रद्द, चिनी कंपनीला दणका
20
अफगाणिस्तानने नोंदवला पहलगाम हल्ल्याचा निषेध; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्याशी चर्चा

नवदाम्पत्याची कापडगावात आत्महत्या

By admin | Updated: July 17, 2014 23:53 IST

आत्महत्येमागचे कारण गुलदस्त्यात

रत्नागिरी : तालुक्यातील पालीजवळील कापडगाव कुरतडकरवाडीत आज (गुरुवार) दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास नवदाम्पत्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे खळबळ उडाली असून, या दाम्पत्याच्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट झालेले नाही. प्रथमेश रमेश कुरतडकर (२७) व अर्पिता प्रथमेश कुरतडकर (२२) असे या पती-पत्नीचे नाव आहे. रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रथमेश व अर्पिता यांचे अलिकडेच लग्न झाले होते. नेहमीप्रमाणे आज प्रथमेशचे आई-वडील शेतावर कामासाठी गेले. या दोघांनीही त्यांना आपण दुपारी १२ वाजेपर्यंत शेतावर येऊ, असे सांगितले होते. मात्र, उशीर झाला तरी ते शेतावर का आले नाहीत, म्हणून वडील एक वाजण्याच्या सुमारास घरी आले. घराचा दरवाजा बंद होता. त्याला आतून कडी लावलेली असल्याचे लक्षात आल्यानंतर रमेश कुरतडकर यांनी प्रथमेशला हाका मारल्या. बराचवेळ आतून कोणताच प्रतिसाद मिळत नसल्याने वडील चिंतेत पडले. त्यानंतर दरवाजा उघडून त्यांनी घरात प्रवेश केला.प्रथमेश व अर्पिता हे दोघेही बेडरुममध्ये घराच्या अ‍ॅँगलला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या स्थितीत आढळून आल्याने त्यांना धक्काच बसला. त्यानंतर गावच्या पोलीसपाटील यांना घटनेची माहिती दिल्यानंतर ग्रामीण रुग्णालयाचे पोलीस अधिकारी व पाली दूरक्षेत्राचे पोलीस कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला. आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. एन. पाटील अधिक तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)