शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

जिल्ह्यातील ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र सोमवारपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आतापर्यंत ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. अद्याप ६३ गावे अंधारात असून, तेथील काम युद्धपातळीवर केले जात आहे.

महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची टीम शहरी तसेच ग्रामीण भागात कार्यरत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ५५ उपकेंद्रे सुरू आहेत. ७,५४८ ट्रान्सफाॅर्मरपैकी ७,०१७ ट्रान्सफाॅर्मर सुरू झाले असून, ५३१ ट्रान्सफाॅर्मर अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील पाच लाख चार हजार ९२१ ग्राहकांपैकी पाच लाख १७ हजार ५६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला आहे. ३७ हजार ८६५ ग्राहक मात्र अद्याप अंधारात आहेत.

वादळामुळे उच्चदाबाचे एकूण ४८५ विजेचे खांब पडले होते. पैकी १२५ खांब आतापर्यंत उभे करण्यात आले असले तरी ३६० खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. लघुदाबाचे एकूण १२३३ खांब पडले होते. पैकी १३३ खांब उभे करण्यात आले असले तरी ११०० खांब अद्याप उभे करणे बाकी आहे.

महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र उर्वरित वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.