शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

जिल्ह्यातील ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र सोमवारपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आतापर्यंत ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. अद्याप ६३ गावे अंधारात असून, तेथील काम युद्धपातळीवर केले जात आहे.

महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची टीम शहरी तसेच ग्रामीण भागात कार्यरत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ५५ उपकेंद्रे सुरू आहेत. ७,५४८ ट्रान्सफाॅर्मरपैकी ७,०१७ ट्रान्सफाॅर्मर सुरू झाले असून, ५३१ ट्रान्सफाॅर्मर अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील पाच लाख चार हजार ९२१ ग्राहकांपैकी पाच लाख १७ हजार ५६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला आहे. ३७ हजार ८६५ ग्राहक मात्र अद्याप अंधारात आहेत.

वादळामुळे उच्चदाबाचे एकूण ४८५ विजेचे खांब पडले होते. पैकी १२५ खांब आतापर्यंत उभे करण्यात आले असले तरी ३६० खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. लघुदाबाचे एकूण १२३३ खांब पडले होते. पैकी १३३ खांब उभे करण्यात आले असले तरी ११०० खांब अद्याप उभे करणे बाकी आहे.

महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र उर्वरित वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.