शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

जिल्ह्यातील ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यास यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:32 IST

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र ...

रत्नागिरी : तौक्ते चक्रीवादळाचा सर्वाधिक फटका महावितरणला बसला. वीजवाहिन्या, खांब कोसळल्यामुळे जिल्ह्याच्या १,२३९ गावांतील वीजपुरवठा विस्कळीत झाला होता. मात्र सोमवारपासून महावितरणच्या कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नांमुळे आतापर्यंत ११७६ गावांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात यश आले आहे. अद्याप ६३ गावे अंधारात असून, तेथील काम युद्धपातळीवर केले जात आहे.

महावितरणच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांसह कंत्राटी कर्मचाऱ्यांची टीम शहरी तसेच ग्रामीण भागात कार्यरत आहे. वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी रात्री उशिरापर्यंत कर्मचारी काम करीत आहेत. जिल्ह्यातील सर्वच्या सर्व ५५ उपकेंद्रे सुरू आहेत. ७,५४८ ट्रान्सफाॅर्मरपैकी ७,०१७ ट्रान्सफाॅर्मर सुरू झाले असून, ५३१ ट्रान्सफाॅर्मर अद्याप दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. जिल्ह्यातील पाच लाख चार हजार ९२१ ग्राहकांपैकी पाच लाख १७ हजार ५६ ग्राहकांचा वीजपुरवठा सुरू झाला आहे. ३७ हजार ८६५ ग्राहक मात्र अद्याप अंधारात आहेत.

वादळामुळे उच्चदाबाचे एकूण ४८५ विजेचे खांब पडले होते. पैकी १२५ खांब आतापर्यंत उभे करण्यात आले असले तरी ३६० खांब उभे करण्याचे काम सुरू आहे. लघुदाबाचे एकूण १२३३ खांब पडले होते. पैकी १३३ खांब उभे करण्यात आले असले तरी ११०० खांब अद्याप उभे करणे बाकी आहे.

महावितरण कंपनीचे मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर, कार्यकारी अभियंता रामलिंग बेले, शिवतारे, कैलास लवेकर हे प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित राहून वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. जिल्ह्यातील चक्रीवादळामुळे खंडित झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी बऱ्यापैकी यश आले आहे. मात्र उर्वरित वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यात येणार असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले.