शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

अतिवृष्टीतील नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

राजापूर : संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या अतिवृष्टीतील नुकसानाचे तत्काळ पंचनामे ...

राजापूर : संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या अतिवृष्टीतील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले आहेत.

राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा फटका शहरासह ग्रामीण भागाला बसला आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांचा पूर ओसरला असला तरी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाचा तडाखा तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला असून, कुवेशी येथील जयवंत भट, अनिल बावकर यांच्या घराची पडझड झाली आहे तर कणेरी येथील ऋतिका राणे यांच्या घराची भिंत कोसळली आहे. अणुसुरे येथील सुनीता संजय पंगेरकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. या अतिवृष्टीत झालेल्या घर, गोठे व अन्य मालमत्ता यांचे स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी, कृषी विभाग यांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.