शहरं
Join us  
Trending Stories
1
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
2
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
3
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
4
IND A vs SA A : पंत कॅप्टन्सीसह कमबॅक करणार! रोहित-विराट मात्र 'या' वनडे मालिकेपासून दूरच राहणार?
5
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
6
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
7
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
8
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
9
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
10
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
11
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
12
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
13
Student Death: स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या सागरने आईच्या साडीनेच संपवले आयुष्य; एका तरुणीमुळे...
14
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
15
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
16
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...
17
भाजपाची महिला पदाधिकारी, नेत्यांना पुरवायची मुली; बिहार निवडणुकीत वरिष्ठांनी दिली जबाबदारी
18
श्रीदेवीचा सुपरहिट सिनेमा 'मॉम'च्या सीक्वेलमध्ये दिसणार 'ही' अभिनेत्री, सेटवरील फोटो लीक
19
लाडकी बहीण अन् काय काय...! वर्षात १२ राज्यांनी महिलांना वाटले तब्बल १.६८ लाख कोटी रुपये
20
तो, ती आणि प्रेमाची बहार! पांड्यानं शेअर केला गर्लफ्रेंडसोबतचा खास व्हिडिओ

अतिवृष्टीतील नुकसानाचे पंचनामे करून अहवाल सादर करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 20, 2021 04:21 IST

राजापूर : संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या अतिवृष्टीतील नुकसानाचे तत्काळ पंचनामे ...

राजापूर : संततधार पडणाऱ्या पावसामुळे तालुक्यातील ग्रामीण भागात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे. या अतिवृष्टीतील नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून अहवाल सादर करण्याचे आदेश तहसीलदार प्रतिभा वराळे यांनी दिले आहेत.

राजापूर शहर आणि तालुका परिसरात पावसाची संततधार सुरू आहे. या पावसाचा फटका शहरासह ग्रामीण भागाला बसला आहे. अर्जुना आणि कोदवली नद्यांचा पूर ओसरला असला तरी या दोन्ही नद्या दुथडी भरून वाहत आहेत. वादळी वाऱ्यासह होणाऱ्या पावसाचा तडाखा तालुक्यातील ग्रामीण भागाला बसला असून, कुवेशी येथील जयवंत भट, अनिल बावकर यांच्या घराची पडझड झाली आहे तर कणेरी येथील ऋतिका राणे यांच्या घराची भिंत कोसळली आहे. अणुसुरे येथील सुनीता संजय पंगेरकर यांच्या घराची भिंत कोसळून नुकसान झाले आहे. मात्र, कोठेही जीवितहानी झालेली नाही. या अतिवृष्टीत झालेल्या घर, गोठे व अन्य मालमत्ता यांचे स्थानिक पातळीवर मंडल अधिकारी, तलाठी, कृषी विभाग यांना पंचनामे करून अहवाल सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्याचे तहसीलदार वराळे यांनी सांगितले.