शहरं
Join us  
Trending Stories
1
बीड जिल्ह्यात मुसळधार पाऊस, नद्या-नाले तुडुंब; जीप वाहून सहा जण अडकल्याची भीषण घटना
2
कावड-पालखी सोहळ्यातील ट्रॅक्टरचा अकोला दगडीपुलाजवळ अपघात, २२ भाविक जखमी
3
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
4
कोल्हापूर सर्किट बेंच झाले, आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या; सरन्यायाधीश भूषण गवईंची सूचना
5
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
6
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
7
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
8
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
9
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
10
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
11
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
12
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
13
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
14
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
15
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
16
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
17
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
18
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
19
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
20
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन

विषय समित्यांचा ‘खेळ’ खल्लास!

By admin | Updated: January 4, 2017 22:53 IST

ठराव चिठ्ठीवर मंजूर : राजापूर नगरपरिषदेत केवळ स्थायी समिती राहणार

राजापूर : नगर परिषदेत समसमान मते पडल्याने थेट चिठ्ठीद्वारे घेतलेला कौल सत्ताधारी आघाडीच्या बाजूने पडला आणि नगर परिषदेत स्थायी समिती वगळता उर्वरित विषय समित्या निवडण्याचा निर्णय फेटाळण्यात आला. त्यामुळे राजापूर नगरपरिषद विषय समित्यांविना दिसणार आहे. नगराध्यक्ष हे स्थायी समितीचे पदसिद्ध अध्यक्ष असल्याने हनिफ काझी यांची या पदावर निवड झाली आहे. राजापूर नगरपरिषदेच्या विविध विषय समित्यांसाठी बुधवारी बैठक घेण्यात आली. पालिकेत शिवसेनेचे आठ व एक भाजप असे नऊ एवढे संख्याबळ असून, त्याचवेळी नगराध्यक्ष हनिफ काझी व काँग्रेसचे सात नगरसेवक असे एकूण आठ व एक राष्ट्रवादीचा सदस्य धरुन एकत्रित होणारे संख्याबळ नऊ असे समसमान होते. त्यामुळे कुणाला कोणती समिती मिळणार? याचीच उत्सुकता होती. बुधवारी सकाळी सभा सुरू होताच उपनगराध्यक्ष व काँग्रेसचे गटनेते अ‍ॅड. जमीर खलिफे यांनी केवळ स्थायी समिती वगळता बाकीच्या समित्या रद्द कराव्यात, असा ठराव मांडला. तो ठराव रद्द केला जावा व स्थायीसह सर्व समित्यांची निवड केली जावी, अशी उपसूचना सेनेचे गटनेते विनय गुरव यांनी मांडली.त्यावर सायंकाळी तो ठराव मतदानाला टाकण्यात आला; मात्र दोन्ही बाजूने झालेले मतदान समसमान पडले. त्यामुळे चिठ्ठीचा प्रयोग करण्यात आला व चिठ्ठीत नशिबाने सत्ताधारी काँग्रेसला साथ दिली.जमीर खलिफे यांचा ठराव मंजूर झाला व त्यानंतर स्थायी समितीची स्थापना करण्यात आली. त्या समितीचे अध्यक्ष नगराध्यक्ष हनिफ काझी असतील, तर सदस्यांमध्ये संजय ओगले, स्नेहा कुवेस्कर, प्रतीक्षा खडपे, गोविंद बाकाळकर व शुभांगी सोलगावकर यांचा समावेश आहे. नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष यासह आता समितीच्या निवडणुकीत सत्ताधारीआघाडीने विजय मिळविला आहे. (प्रतिनिधी)