शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची मध्यरात्रीची शरणागती! शस्त्रसंधीसाठी पडद्यामागे काय घडले? अमेरिकेने का केली मध्यस्थी?
2
पाकिस्तानचे शेपूट वाकडे ते वाकडेच; सायंकाळी शस्त्रसंधी, रात्री उल्लंघन, ७ भारतीयांचा मृत्यू
3
आम्ही सज्ज, पुन्हा हल्ला झाला तर सडेतोड प्रत्युत्तर; पाकिस्तानला भारतीय लष्कराने दिली तंबी
4
३ डझन देशांसमोर पाकची विनवणी, मग भारताचा होकार; अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी घोषणा का केली?
5
चीन म्हणतो, “दोन्ही देशातील तणावाची आम्हाला चिंता वाटते आम्ही पाकिस्तानसोबत उभे राहू”
6
भारतावरील दहशतवादी हल्ला युद्धकृती मानून देणार चोख उत्तर; PM मोदींनी घेतल्या उच्चस्तरीय बैठका
7
ऑपरेशन सिंदूर: विमान अपहरणाचा कट रचणाऱ्यासह पाच टॉप वॉन्टेड दहशतवादी ठार
8
शस्त्रसंधी करणारे ते 'डीजीएमओ' कोण? भारत-पाकिस्तान संघर्षावर चर्चेतून शस्त्रसंधीचा तोडगा
9
पाकिस्तानकडून सायबर युद्धाला सुरुवात, 'या' लिंक्सवर क्लिक कराल तर पस्तवाल
10
एकनाथ शिंदेंनी ढासळवला जितेंद्र आव्हाडांचा बुरुज; शरद पवार गटाचे ४ माजी नगरसेवक शिवसेनेत
11
“भारताला युद्ध नको, पण...”; अजित डोवाल यांनी चीनच्या परराष्ट्र मंत्र्यांना स्पष्टच सांगितले
12
भारताने आमची शस्त्रास्त्रे, सैनिकी तळ उद्ध्वस्त केले, युद्धविरामानंतर शाहबाज शरीफ यांची कबुली
13
मोहम्मद युनूस यांचा मोठा निर्णय; शेख हसीन यांच्या ‘अवामी लीग’वर आणली बंदी
14
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
15
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
16
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
17
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
18
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
19
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
20
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."

विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाची गरज : संजय शिर्के

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 14, 2021 04:36 IST

लाेकमत न्यूज नेटवर्क चिपळूण : नैसर्गिक संपदेचा वारसा लाभलेल्या चिवेली गावात पर्यावरणाला सुद्धा एक नवीन संधी आहे. त्यामुळे ...

लाेकमत न्यूज नेटवर्क

चिपळूण : नैसर्गिक संपदेचा वारसा लाभलेल्या चिवेली गावात पर्यावरणाला सुद्धा एक नवीन संधी आहे. त्यामुळे येथील शिक्षण संस्थेने शिक्षणाबरोबरच स्वावलंबी बनवण्याकडे लक्ष द्यावे. यासाठी कौशल्य आधारीत शिक्षण दिले, तर विद्यार्थ्यांना यशाचा मार्ग लवकर सापडेल, अशा सल्ला रिगल कॉलेजचे संस्थापक संजय शिर्के यांनी चिवेली पंचक्रोशी विकास संस्थेच्या आयोजित सभेत दिला.

चिवेली आदर्श विद्यामंदिर येथे संस्थेने शैक्षणिक मार्गदर्शनपर संस्था आणि स्कूल कमिटीची सभा आयोजित केली होती. या सभेत संजय शिर्के बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष रमेश शिर्के, सल्लागार रघुनाथ शिर्के, संस्थेचे उपाध्यक्ष नरेंद्र वणे, कार्यवाह मंगेश शिर्के, अंबरनाथ येथील नगरसेवक राजेश शिर्के, स्कूल कमिटी चेअरमन यशवंत शिर्के आणि मुख्याध्यापक संजय चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमात पुढे संजय शिर्के म्हणाले की, छोटे-छोटे कोर्सेस सुरू केले तर नंतर उत्तम प्रतिसाद मिळू शकेल, हे आपण स्वतःच्या अनुभवावरून सांगत आहोत. मात्र, यासाठी शिक्षक व पालक यांची जबाबदारी मोठी आहे. मुलांमधील सुप्त गुण ओळखून त्यानुसार त्यांना मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यानंतर शाळेचे मुख्याध्यापक संजय चव्हाण यांची चिपळूण तालुका मुख्याध्यापक संघटनेच्या तालुकाध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल संस्थेच्या वतीने गौरविण्यात आले तर स्कूल कमिटीचे व्हाईसचेअरमन संतोष कुळे याना रत्नसिंधू संस्थेचा राज्यस्तरीय पत्रकार पुरस्कार मिळल्याबद्दल सन्मान करण्यात आला.

-------------------------------------

चिपळूण तालुक्यातील चिवेली येथील सभेत रिगल काॅलेजचे संस्थापक संजय शिर्के यांनी मार्गदर्शन केले. यावेळी संस्थेने अध्यक्ष रमेश शिर्के, रघुनाथ शिर्के, नरेंद्र वणे, मंगेश शिर्के, राजेश शिर्के, यशवंत शिर्के, संजय चव्हाण उपस्थित होते.

130721\img-20210713-wa0015.jpg

विद्यार्थ्यांना कौशल्य आधारित शिक्षणाची गरज - संजय शिर्के