शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
2
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
3
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
4
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
5
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
6
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
7
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
8
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
9
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
10
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
11
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
12
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
13
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
14
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
15
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
16
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
17
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
18
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
19
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
20
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!

आधी विद्यार्थ्यांची मानसिकता जपायला हवी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:22 IST

आधी विद्यार्थ्यांची मानसिकता जपायला हवी! कोरोना विषाणूच्या संसर्गाने आपल्यापैकी अनेकांच्या जीवाला घोर लावला आहे. इतकंच नाही तर या जागतिक ...

आधी विद्यार्थ्यांची मानसिकता जपायला हवी!

कोरोना विषाणूच्या संसर्गाने आपल्यापैकी अनेकांच्या जीवाला घोर लावला आहे. इतकंच नाही तर या जागतिक साथीचा लोकांच्या मनःस्वास्थ्यावर विपरित परिणाम होईल आणि हे आरोग्य संकट निघून गेल्यावरही त्यांना मानसिक समस्यांचा सामना करावा लागेल, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे. याचाच अर्थ या परिस्थितीचा लहान मुलांवरही तितकाच परिणाम होणार आहे. विद्यार्थ्यांवर तर होणारच आहे. शाळेतील मित्र, मैत्रीण, शिक्षक, शाळेचा परिसर आदींपासून दोन वर्षे अलिप्त राहिल्यानंतर त्यांच्या मनावर आघात होणारच आहे. ऑनलाईन शिक्षण आणि त्यामुळे आलेली जीवनशैली ज्या पद्धतीने मुलांच्या शारीरिक व मानसिक स्वास्थ्यावर परिणाम करत आहे, ते बघता याचा मुलांच्या आयुष्यावर दीर्घकाळ परिणाम होऊ शकतो. त्यासाठी शाळेतले शिक्षण गरजेचे आहे. मुळात शिक्षणाचे गांभीर्य शाळेतील वर्गात दडलेले आहे. शाळेतील वर्ग हा मनाला ताजेतवाने करणारा स्रोत आहे, याचा अनेकदा विसर पडतो. खरंतर आपल्याला पुढील पिढीने अशा पद्धतीने शिकणे व वाढणे अपेक्षित आहे का, हा प्रश्न पालकांनी व धोरणकर्त्यांनी स्वत:ला विचारायला हवा. विद्यार्थ्यांना कोविड उत्तर जगाशी जुळवून घेण्यात मदत करण्यासाठी पालक, शिक्षक व धोरणकर्त्यांचे एकत्रित प्रयत्न आवश्यक आहेत. परंतु, याबाबतीत विद्यार्थ्यांचा फार कोणी विचार करताना दिसत नाही. आज ऑनलाईन शिक्षण व त्यासाठी वाढीव शुल्क आकारले जात असताना शाळा व पालक यांच्यात खटके उडू लागले आहेत. एवढेच नव्हे तर शालेय शुल्क भरले नाही म्हणून विद्यार्थ्यांची गैरहजेरी लावणे, त्यांना विचारात न घेणे, त्यांची अभ्यासिका न तपासणे, त्यांचे म्हणणे ऐकून न घेणे, असे गंभीर प्रकार काही विद्यार्थ्यांच्या बाबतीत घडू लागले आहेत. आता पालकांनी शालेय शुल्क न भरल्याने विद्यार्थ्यांना अशी वागणूक मिळत असेल, तर तो घोर अन्यायच म्हणावा लागेल. पण तरीही समाजातील काही वर्ग शाळेच्या बाजूने, तर काही पालकांच्या भूमिकेशी सहमत दिसतो. परंतु, या वादाचा मुलांच्या मानसिकतेवर किती परिणाम होत असेल, याचा विचार कोणीही करताना दिसत नाही.

आजही कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात नाही. त्यासाठी पर्याय म्हणून ऑनलाईन शिक्षणाचा रेटा लावला जात आहे. परंतु, ऑनलाईन शिक्षणाचे जसे फायदे दिसताहेत तसेच त्याचे तोटेही जाणवू लागले आहेत. शाळा सुरु असताना खूप अभ्यास होत होता, पण आता तो अभ्यास होत नाही. मोबाईलवर शिकवलेलं समजत नाही, असा अनुभव अनेक विद्यार्थी मांडताना दिसतात. मुळात ऑनलाईन शिक्षण मूठभर सुदैवी मुलांनाच मिळत आहे, कारण आजही बहुतांशी कुटुंबांकडे स्मार्टफोन्स नाहीत. जे उपकरणे वापरत आहेत, त्यांच्या कुटुंबावर वारंवार डेटा पॅक रिचार्ज करण्याचा अतिरिक्त आर्थिक बोजाही पडत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांवर याचा ताण येत आहे. याशिवाय अनेक शिक्षक कोणत्याही मार्गाने अभ्यासक्रम पूर्ण करायच्या मागे लागले आहेत. शाळेत दिल्या जाणाऱ्या गृहपाठाहून खूप अधिक काम मुलांना दिले जात आहे. दररोज कोणत्या ना कोणत्या स्वरूपाचे काम दिले जात असल्याने शिक्षणाच्या या नवीन युगात केवळ शालेय अध्ययनावर अवलंबून राहणे क्वचितच घडते. नियमित शाळेसह खासगी शिकवण्या घेणे हे भारतीय शिक्षण व्यवस्थेचे वैशिष्ट्य आहे. बाहेर पडण्यावर निर्बंध आल्यामुळे खासगी शिकवण्याही व्हिडीओ आणि ऑडिओ व्याख्यानांच्या माध्यमातून ऑनलाईन घेतल्या जात आहेत. एकंदर स्क्रीनसमोरील कालावधी अचानक वाढल्यामुळे आणि सलग ऑनलाईन वर्गांमुळे मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. अर्थपूर्ण शिक्षणाचा संबंध अभ्यासक्रम पूर्ण करणे, विद्यार्थ्यांवर शाळेचे तास पूर्ण करण्याचा बोजा टाकणे, खासगी शिकवण्या, गृहपाठ आणि स्क्रीन्ससमोर दीर्घकाळ घालविण्याशी नक्कीच नाही. डिजिटल शिक्षणासाठी नियम तयार करण्याची प्रक्रिया सरकारने सुरू केली हे प्रोत्साहक आहे. पण हे नियम सरकारी व अनुदानित शाळांसोबत खासगी शाळांमध्येही लागू झाले पाहिजेत.

- संदीप बांद्रे, चिपळूण.