शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

शिकाऊ उमेदवारांचे विद्यावेतन

By admin | Updated: January 10, 2015 00:15 IST

कंपन्यांतून चालढकल : व्यक्त केली जातेय नाराजी

शिरगाव : संपूर्ण देशभरातील विविध कंपन्या, महामंडळांमध्ये कार्यरत असणाऱ्या शिकाऊ उमेदवारांसाठी विद्यावेतन सुधारित दराने देण्याचा निर्णय केंद्र सरकारने २२ सप्टेंबर २०१४ च्या राजपत्रानुसार जाहीर केला आहे. मात्र, जिल्ह्यातील अनेक कंपन्यांतून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यास चालढकल होत असल्याने शिकाऊ उमेदवारांमधून नाराजी व्यक्त होत आहे. केंद्र शासन श्रम व रोजगार मंत्रालयामधून निघालेल्या अधिसूचनेनुसार औद्योगिक प्रशिक्षण केंद्रातील अभ्यासक्रम पूर्ण करुन शिकाऊ उमेदवार म्हणून आस्थापनेत दाखल पहिल्या वर्षी संबंधित राज्यात अर्धकुशल कामगाराला देण्यात येणाऱ्या वेतनाचे ७० टक्के वेतन देण्यात येणार आहे. दुसऱ्या वर्षी ८० टक्के, तर तिसऱ्या वर्षी ९० टक्के वेतन देण्याची तरतूद या सूचनेतून करण्यात आली आहे. प्रत्येक राज्यातील शासन निर्णयानुसार ते अर्धकुशल कामगारास देण्यात येणारे वेतन निश्चित करुन कंपन्यांना कळवले जाते. राष्ट्रीय परिषदेची मान्यता घेतलेल्या संस्थांमधील शिकाऊ उमेदवार यास पात्र ठरणार आहेत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. केंद्र सरकारच्या सप्टेंबरमधील अध्यादेशाची कार्यवाही करावी, यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य के. जी. पवार यांनी याबाबत अध्यादेशाची प्रत जोडून संबंधित आस्थापनांना त्या अनुषंगाने लेखी कळवले आहे. याबाबत अंमलबजावणी झाल्यास शिकाऊ उमेदवार नियुक्तीच्या ठिकाणी शासनाने अर्धकुशल कामगाराला ठरवलेले निश्चित वेतन व शिकाऊ उमेदवाराला पहिल्या वर्षी ७० टक्के संदर्भनिहाय वेतन दिल्यास विद्यावेतनात फरक पडणार आहे. तथापि अंमलबजावणीच नसल्याने उमेदवार संभ्रमात आहेत. आपल्या प्रशिक्षणाच्या कालावधीत वरिष्ठांशी संबंध बिघडू नयेत, या भीतीने त्यांनी केंद्रशासन अधिसूचना दाखवण्यापलिकडे काहीच कृती केली नाही. यासंदर्भात पोफळी महानिर्मिती कंपनीतील शिकाऊ उमेदवारांबाबत माहिती घेता तेथे ३ वर्षांची स्वतंत्र प्रशिक्षण योजना राबवण्यात आली आहे. त्यांना तिसऱ्या वर्षी केंद्र सरकारच्या अधिसूचनेनुसार विद्यावेतन दिले जाईल, अशी माहिती देण्यात आली. आजवरची शिकाऊ उमेदवारांची भरती प्रक्रिया ही आयटीआयनंतर एक किंवा दोन वर्षे अशा प्रकारे व एकाच आस्थापनेत सतत तीन वर्षे अशी आहे. आपल्या गावालगत तांत्रिक प्रशिक्षण पूर्ण करुन शिकाऊ उमेदवार म्हणून कमी विद्यावेतन असल्यामुळे संघर्ष करावा लागणाऱ्या उमेदवारांसाठीही आनंदाची बातमी असली तरी अंमलबजाणीतच त्यांचे घोडे अडल्याने नाराजी कायम आहे. (वार्ताहर)