शहरं
Join us  
Trending Stories
1
CA नगराध्यक्ष सगळ्यांचा हिशेब ठेवतील अन् काहींचा 'हिशोब करतील'...; फडणवीसांचे सूचक विधान
2
माणिकराव कोकाटे यांना अखेर मोठा दणका; त्यांच्याकडची मंत्रिपदाची सर्व खाती अजित पवारांकडे!
3
U19 Asia Cup 2025 : ...तर आशिया कप जेतेपदासाठी भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
4
महागाईचा ‘रॉकेट’ वेग! चांदी २ लाखांच्या पार, तर सोने १.३७ लाखांवर... आतापर्यंत सर्व विक्रम मोडले
5
Lokmat Parliamentary Award 2025: सुधा मूर्ती ते दिग्विजय सिंह... 'लोकमत पार्लिमेंटरी अवार्ड २०२५'ने ८ प्रतिभावान खासदारांचा गौरव
6
IND vs SA T20I: पहिल्यांदाच असं घडलं! धुक्यामुळे भारत-दक्षिण आफ्रिका यांच्यातील चौथा सामना रद्द
7
मुंबई: कोस्टल रोड प्रवेशद्वारावर अचानक लागली भीषण आग; वाहनांच्या लांब रांगा, प्रवाशांचे हाल
8
धनंजय मुंडे परत मंत्री झाले तर...; अंजली दमानियांकडून भाजपा लक्ष्य; 'तो' फोटोही केला शेअर
9
"पंडित नेहरूंची पत्रे अजूनही सोनिया गांधींकडेच"; केंद्राचा खळबळजनक दावा; म्हणाले, 'हा देशाचा वारसा'
10
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
11
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
12
गुरुवारी मार्गशीर्ष शिवरात्रि २०२५: ‘असे’ करा व्रत, शिवाचे विशेष पूजन; काही कमी पडणार नाही!
13
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
14
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
15
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
16
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
17
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
18
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
19
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
20
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
Daily Top 2Weekly Top 5

शिक्षक आंतरजिल्हा बदलीने विद्यार्थ्यांचे हाल

By admin | Updated: December 8, 2015 00:35 IST

जिल्हा परिषद : लोकप्रतिनिधी ढीम्म, राजकीय दबाव टाकून प्रयत्न, परजिल्ह्यातील भरतीचे परिणाम

रहिम दलाल--- रत्नागिरी --जिल्ह्यात प्राथमिक शिक्षकांची पदे रिक्त असतानाही विद्यार्थ्यांचे नुकसान करुन आंतरजिल्हा बदलीने २६ शिक्षकांना सोडण्यात आले. त्याचे लोकप्रतिनिधींना काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे. या बदल्यांसाठी जिल्हा परिषद प्रशासनावर राजकीय दबाव टाकण्यात येत होता. जिल्हा परिषदेकडून होणारी शिक्षणसेवक भरती नेहमीच वादाची ठरली आहे. शिक्षणसेवक भरतीच्या वेळी स्थानिकांना प्राधान्य द्यावे, यासाठी सुरुवातीला शिवसेनेने आंदोलने केली. त्यानंतर स्थानिकांसाठी मनसेने आंदोलन उभारले होते. शिवसेना व मनसेने केलेल्या आंदोलनांमुळे परजिल्ह्यातील अनेक उमेदवार परीक्षेला आलेले नव्हते. डी. एड.धारक स्थानिक उमेदवारांनीही जेलभरो आंदोलन केले होते. त्यानंतरही शिक्षणसेवक भरती करण्यात आली होती. जिल्ह्याच्या ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदेच्या २७४८ प्राथमिक शाळा आहेत़ त्यामध्ये मराठी माध्यमाच्या २५७४, तर उर्दू माध्यमाच्या १७४ शाळांचा समावेश आहे़ यामध्ये सव्वा लाख विद्यार्थी अध्यापनाचे धडे घेत असून, सुमारे ९००० शिक्षक आहेत़ जिल्हा परिषदेच्या सुमारे १३०० प्राथमिक शाळांची स्थिती फार बिकट असून, त्या कधीही बंद होण्याची शक्यता नाकारता येत नाही़ त्यामध्ये मराठी माध्यमाच्या १ ते १० पटसंख्या असलेल्या शेकडो शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. प्रत्येक शिक्षणसेवक भरतीमध्ये परजिल्ह्यातील ९५ टक्के उमेदवारांचा भरणा करण्यात येतो. त्यामुळे स्थानिकांवर अन्याय होत असल्याची ओरड डी. एड.धारकांकडून करण्यात येते. अजूनही डी. एड.धारक स्थानिक बेरोजगारांचा शिक्षणसेवक नियुक्तीसाठी लढा सुरूच आहे. या आंतरजिल्हा बदल्यांसाठी नातेवाईकांचे खोटे दाखले जोडणाऱ्या शिक्षकांचा प्रताप सांगली जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी उघडकीस आणला होता. मात्र, या शिक्षकांनी आपण हे दाखले जोडले नसल्याचे सांगून खोटे बोलण्याचा कहरच केला आहे.मागील वर्षात शेकडो शिक्षक आंतरजिल्हा बदलीने अन्य जिल्ह्यात निघून गेले होते. सांगली, अहमदनगर, नाशिक, बीड या जिल्हा परिषदांच्या प्राथमिक शाळांमध्ये त्यांनी बदल्या करून घेतल्या. याप्रमाणे दरवर्षी शेकडो शिक्षक आंतरजिल्हा बदलीने निघून जात आहेत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षात शिक्षकांची सुमारे १०० पदे रिक्त असतानाही पुन्हा २६ शिक्षकांना आंतरजिल्हा बदलीने सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.याची जाणीव येथील लोकप्रतिनिधींना होणे आवश्यक आहे. मात्र, या आंतरजिल्हा बदलीसाठी अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकण्यात आल्यानेच अनेक दिवस रखडलेल्या आंतरजिल्हा बदल्यांसाठी प्रयत्न करत असलेल्या शिक्षकांना सोडण्यात आले. त्यामुळे डी. एड. बेरोजगारांमध्ये असंतोष कायमचा खदखदत राहणार आहे. शिक्षणसेवक नियुक्ती : परजिल्ह्यातील उमेदवारांना मिळते संधीशिक्षणसेवक नियुक्त झाल्यावर तीन वर्षांचा कालावधी पूर्ण केल्यानंतर दरवर्षी शेकडो शिक्षक जिल्हा बदली करुन निघून जातात. त्यामुळे येथील शिक्षकांच्या जागा रिक्त होऊन शिक्षणसेवक भरतीला पुन्हा जोर येऊन परजिल्ह्यातील उमेदवारांना त्यामध्ये प्राधान्याने संधी मिळते.चालू शैक्षणिक वर्षामध्ये शासनाकडून आयुक्त कार्यालयाकडून आंतरजिल्हा बदलीचे शिक्षकांचे प्रस्ताव माघारी पाठवण्यात आले होते. हे प्रस्ताव आयुक्त मंजुरीसाठी कार्यालयाकडे पाठवण्याकरिता लाखो रुपयांची सौदेबाजी झाल्याची चर्चा होती. गुरुजनांनी फसवलेआंतरजिल्हा बदलीसाठी प्रस्ताव सादर केलेल्या शिक्षकांनी आपल्या जोडीदाराचा दाखला खोटा जोडण्यात आल्याचे सांगली जिल्हा परिषदेने उघडकीस आणले होते. आंतरजिल्हा बदल्यांसाठी काही गुरुजनांकडून फसवणूक झाल्याने हा विषय सध्या गाजत आहे.